नाशिक : नाशिकमधील सावकरनगर परिसरातील वात्सल या शासकीय वसतीगृहातून १७ मुली आज (बुधवार) पहाटे फरार झाल्याचे समोर आले आहे. यामुळे वसतीगृह प्रशासनाचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. १७ मुलींपैंकी ८ मुली सापडल्या असून ९ मुली अद्यापही बेपत्ता असल्याचे समजते आहे.
महिलांच्या या शासकीय वसतीगृहातील असुविधांना कंटाळून १७ मुलींनीं आज अखेर येथून पळ काढला. पहाटेच्या वेळेस वसतीगृहाच्या गेटवरून उड्या मारुन या मुली पसार झाल्या. सकाळी ही गोष्ट उघड झाल्यानंतर मुलींचा शोध सुरु झाला. त्यानंतर ८ मुली सापडल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. गेले अनेक दिवस वसतीगृहात असुविधा असल्याच्या तक्रारी वारंवार येथील मुलींकडून करण्यात येत होत्या. मात्र तरीही येथील प्रशासनाने या तक्ररांरीकडे कानाडोळा केल्यामुळे अखेर मुलींनी हा मार्ग पत्करला असल्याची चर्चा सुरु आहे.









