वादळी वाºयासह पाऊस, वीज कोसळून एक ठार, तीन जखमी

Digras 5
यवतमाळ, दि. २८ – वादळी वाºयासह गारपीटीने जिल्ह्याला आज दुपारी चांगलेच झोडपून काढले.बिटरगाव येथे वीज कोसळल्याने एक ठार झाला असून, दोन जण जखमी झाले. महागाव तालुक्यातील वनोली येथील युवकाच्या अंगावर भिंत कोसळली. दिग्रसमध्ये घरांची पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले. यवतमाळातही वादळी वारा व गारपीटीमुळे भाजी विक्रेत्यांचे नुकसान झाले. रब्बी पिकांना व फळबागांना गारपीटीचा व वादळी वाºयाचा सर्वाधिक फटका बसला असून, पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे.
शहरात दुपारी ३ वाजताच्या सुामारास वादळी वाºयासह गारपीट झाली. यामध्ये दत्त चौकालगत असलेल्या भाजी व फ्रु ट विक्रेत्यांची पळापळ झाली. दुकानाचे शेड उडाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले. तहसील चौक, नेताजी चौक, बसस्थानक चौकासह अन्य मार्गावरील झाडे कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. वादळी वारा व गारपीटीमुळे विद्यूत तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. तहसील चौकानजीक असलेल्या कारागृहावरील टिनपत्रे उडाली. उमरखेड तालुक्यातील बिटरगाव येथील शेतकरी पांडूरंग चिकने (४५) आपल्या दोन मुलासह शेतातून परतत असताना, अचानक आलेल्या वादळी वाºयामुळे व विजेच्या कडकडाटीमुळे त्यांनी झाडाचा आडोशा घेतला. यावेळी रतननगरनजीक पांडूंरंग चिकने यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर विशाल व मनोज ही दोन मुले जखमी झाली आहे. महागाव तालुक्यातील वनोली येथील पवन प्रकाश चव्हाण (१६) या युवकावर शेतातील कोठ्याची भिंत पडल्याने तो जखमी झाला आहे. दिग्रस येथील होलटेक पुरा, शनिमंदिर चौकातील राजा तिलावार यांचे घरावरील टिनाची कैची पुर्ण पणे उडून एका उंच झाडावर अडकली. देवनगर परिसरातील नारायणराव चिरडे यांचे घरावरील टिनपत्रे उडाल्याने त्यावरील फाड्या (दगड) घरात पडले. रमेश ठाकुर यांचा लाकूड फाटा व वर अंथरलेल्या टिनाचे संपूर्ण घर खाली कोसळले. तालुक्यातील विठोली, कांदळी, तुपटाकळी, लाख (रा) परिसरातील गहु, संत्रा पिकाचे नुकसान झाले. वादळी वारा व गारपीटीमुळे गहु, हरबºयासोबतच फळबागांचेही नुकसान झाले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


3 × nine =