
मुंबई-(सतिष राठोड /महाराष्ट्र न्यूज नेटवर्क) – मुख्यमंत्री व राज्याचे वित्तमंत्री हे विदर्भाहून अाहेत,त्यामुळे याचा पडसाद राज्याचा बजेटवर दिसेल.विजय केळकर समितीच्या अाग्रहानुसार विदर्भासाठी महत्वाची घोषणा होणार अाहे,अशी माहिती वित्त विभागाच्या सुत्रांनि दिली अाहे.तसेच या बजेटमध्ये एलबीटी रद्द होण्याचे संकेत अाहेत,बजेटमध्ये अारोग्य,शिक्षण,जलसिंचन,रस्ते, या विषयावर विशेष भर देण्यात येणार असून,९ मार्च पासून सुरु होणार्या विधानसभा अधिवेशनामध्ये १७ ते १९ मार्च दरम्यान बजेट मांडण्यात येईल.राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची बजेट मांडण्याची पहिलीच वेळ अाहे,तसेच महसुल वाढविण्यासाठी नविन कर लावणे किंवा जुन्या करात वाढ करण्याच्या एैवजी सरकारी खर्च कमी करण्यावर जोर देणार असल्याची माहिती प्राप्त झाली अाहे.









