विदर्भासाठी रिपाई (ए)चे धरणे आंदोलन

यवतमाळ- वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सातत्याने दुर्लक्ष करण्यात येत आहे. या मागणीकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रिपाई (ए)च्या वतीने २४ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यात आली. मात्र विदर्भाची मागणी जुणी असूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आले. रिपाईचे जिल्हाध्यक्ष मोहन भोयर यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन गोविंद मेश्राम, नवनित महाजन, महेंद्र मानकर, अ‍ॅड.रवींद्र अलोणे, वसूर्केत पाटील, सदाशिव मनवर, रामदास बनकर, अ‍ॅड.भारती मेश्राम, जि.प.सदस्या सुलोचना भोयर, वनिता मिसळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


three × = 6