
यवतमाळ , दि. १४ (राहुल वासनिक )- शैक्षणिक सहल हा सहशालेय उपक्रमाचा महत्वपूर्ण भाग असून प्रत्येक शैक्षणिक वर्षात शैक्षणिक सहल आयोजित करणे गरजेचे आहे. हि शैक्षणिक सल नेतांना मामंडळाची बस, रक्त गट व शिक्षणाधिकाºयाचा परवाणा आवश्यक आहे. असे असताना खाजगी शाळेतील मुख्याध्यापकांनी शिक्षाणाधिकाºयाचा परवाना न घेतना शैक्षणिक सहलीचे आयोजन करून चक्क खाजगी वाहनामध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांना कोंबून नेण्याचा प्रकार चालविला असून सहलीत विद्यार्थ्यांच्या पैशावर मजा मारणाºया मुख्याध्यापक व शिक्षकांवर करडी नरज ठेवावी अशी मागणी पालकांनी केली आहे.
मागील शैक्षणिक वर्षात प्राथमिक शिक्षण विभागातून एकाही सहलीची परवानगी घेतली नसून आयोजन केले नाही. परंतु जिल्हा परिषदच्या प्राथमिक विभागाकडून जवळपासचया स्थळांना खाजगी गाड्यांनी विद्यार्थी कोंबून नेऊन शैक्षणिक सहलीचा आनंद लुटल्या गेला आहे. माध्यमिक विभागात सहल परवाना मागच्या सत्रात १४ शाळांनी घेतला. परंतू जवळपास शंभर शाळांनी खाजगी वाहनांनी शैक्षणिक सहली आटोल्या. विद्यार्थ्यांच्या पैशावर शिक्षकांनी मौजमजा केली आहे. बºयाच सहलीच्या विद्यार्थ्यांयाी संपर्क साधल्यावर तीनशे े चारशे किमीचे अंतर असतांना अक्षरक्ष: कोंबुन वाहनातून प्रवास करावा लागला. तर खाजगी होटलात थांबने, रात्रीच्यावेळी बिअरबार शोधने व असुरक्षित ठिकाणी ठेवणे असा प्रकारही झाल्याचे बोलल्या जात आहे.
गतवर्षी खाजगी गाड्याचे सहलीचे अपघात १६ झाले असून त्यामध्ये दोन विद्यार्थ्यांनी प्राणही गमावले आहे. एक रायगड जिल्ह्यातील ही घटना तर अंगावर शहारे आणणारी होती. परंतू शासनाचा परवाणा नसल्याने त्याना कोणतीही सुरक्षा पुरविण्यात आली नाही. उलट मुख्याध्यापकांनीही हात वर केले. सध्या खाजगी गाड्याचा सिझन हा स्लॅक असून खाजगी वाहन चालकांनी भाड्यांसाठी शैक्षणिक सहलीचा नवा मार्ग अवलंबवीला आहे. तरी या प्रकारात पालक भरडल्या जात असून या खाजगी शैक्षणिक सहलीला आळा बसावा अशी मागणी पालकांनी केली आहे.









