
कळंब, दि. ३ – दहाविची परिक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना राजूर येथे सोमवारी घडली.रविंद्र मोहन वैद्य (१६) रा. वरुड जहागिरपूर असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
गतवर्षी तो दहावीच्या परीक्षेत नापास झाला होता. त्यानंतर तो यावर्षीही परीक्षेला बसला असून मामाच्या गावी राजूर येथे आला होता. अशातच २ मार्च रोजी सायंकाळी त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छदनासाठी रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.









