
यवतमाळ, दि. ३० – खानावळमध्ये महिलेचा विनयभंग करणाºया आरोपीस एक वर्ष शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधिश एम.पी. असीम यांनी आज शुक्रवारी हा निकाल दिला. राजू मनोहर देशपांडे (३८) रा. सिद्घेश्वर नगर वाघापूर असे आरोपीचे नाव आहे.
वाघापूर येथील पंचशिलनगरमधील महिला त्याच भागातील खानावळमध्ये काम करत होती. अशातच १० मे २०१४ रोजी आरोपीने मागील दाराने खानावळीत प्रवेश करून त्या महिलेचा विनयभंग केला. यावेळी महिलेने आरडाओरड केली असता आरोपीने तोंड दाबुन आवाज करू नका अशी तंबी दिली. सदर महिलेच्या आवाज ऐकुन दुसºया खानावळीतील दोन महिला मदतीसाठी धावून आल्या. त्यांनाही आरोपीने अश्लिल व जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३५४, ३५४ (अ), ५०४, ५०६ व अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदणे यांनी तपासपूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. सत्र न्यायाधिश एम.ची. असीम याच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. सरकारी पक्षाच्या वतीने एकुण पाच साक्षदार तपासण्यात आल्या. यामध्ये दोषसिद्घ झाल्याने आरोपी राजू देशपांडे यास भादंवि कलम ३५४ अंतर्गत १ वर्ष कारावास आणि ३५४ (अ) व ५०४ मध्ये प्रत्येकी तीन महिने शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील मंगेश गंगलवार यांनी काम पाहिले.









