वीज बिलाची होळी

IMG_20150227_113742
उमरखेड , दि. २७ – महाराष्टÑ वीज ग्राहक संघटनेच्या वतीने वीज दरवाडी विरोधात संतप्त वीज ग्राहकांनी स्थानिक गांधी चौकात वीज बिलांची होळी केली.
राज्यातील ३०० युनिटच्या आतील सर्व सामान्य घरगुती व व्यावसायीक विद्युत ग्राहकावर २०१४ मध्ये सबसिडी रद्द केली. त्यावर २० टक्केदरवाढीचा बोजा लादण्यात आला. आता पुन्हा १२ टक्के दरवाढ होण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे यंत्रमाग धारक व उद्योजक या सर्व वित्त ग्राहकांचे वीज दर शेजारच्या राज्याच्या तुलनेत दिड ते दुप्पट झाले आहे. सदर दरवाढ सर्व सामान्य व्यक्तीला परवडणारी नाही. त्यामुळे शासनाने किमान दोन वर्षापासाठी वीजदर स्थिर ठेवावे. शेजारील राज्याप्रमाणे दर ठेवावे अशी मागणी मुख्यमंत्री, उर्जामंत्र ी महाराष्टÑ राज्य यांचंकडे संघटनेने केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष साजीद जागीरदार, सचिव राजू जयस्वाल, ओम सारड, इनायतुला जनाब, नंदकिशोर अग्रवाल, मझर टेलर, प्रमोद रुडे, इसराज, प्रेम बाहेती, राठोड याच्यासह वीज ग्राहक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 + = sixteen