व्यापाऱ्याची हत्या,तिघांना अटक

index
मुंबई -पाच महिन्यांपूर्वी बेपत्ता झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे अपहरण आण‌ि हत्या केल्याप्रकरणी प्रकरणात मुंबई पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. सायन येथे राहणाऱ्या व्यापाराचे अपहरण करून त्याच्या सुटकेसाठी ३० लाखांची खंडणी मागण्यात आली होती. परंतु, खंडणी माग‌तिल्यानंतर लगेचच या अपहरणकर्त्यांनी व्यापाऱ्याची हत्या करून मृतदेह माळशेज घाटात फेकून दिला होता. सायन येथे राहणाऱ्या स्वामीनारायण सत्वानी (६५) या भंगार विक्रेत्याचे जून २०१३ मध्ये अपहरण करण्यात आले होते. त्यांच्या अपहरणाची तक्रार सायन पोलिस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आली. क्राइम ब्रँचच्या युनिट चारनेही या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला होता. काही दिवसांनी अपहरणकर्त्यांनी सत्वानी यांच्या मोबाइलवरून जोधपूर येथे राहणाऱ्या सत्वानी यांच्या कुटुंबियांना फोन करून त्यांच्या सुटकेसाठी ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. सत्वानींच्या कुटुंबियांनी तातडीने याची तक्रार जोधपूर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. दरम्यान, अपहरणकर्ते सत्वानी यांना घेऊन सतत आपला ठावठिकाणा बदलत होते. ते दिल्लीलाही गेले आण‌ि त्यानंतर माळशेज घाटात नेऊन अपहरणकर्त्यांनी सत्वानी यांची हत्या केली. अपहरकर्त्यांना पाहणाऱ्या एका साक्षीदाराने क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांना त्याविषयी माहिती दिली त्यावरून त्यांचे स्केच काढण्यात आले. स्केचच्याच आधारे पोलिसांनी बदलापूर-वांगणी येथून विशाल दुगाडे (२९), आबिद अन्वर महाबले (३६), मिथुन उन्नीकृष्णन प‌ल्लिई (३३) यांना अटक केली. अन्वर सिद्दीकी हा चौथा आरोपी फरार आहे. दरम्यान, सत्वानी यांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


three + = 11