
यवतमाळ,दि. १० – विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषन आहार शिजविणाºया कामगारांना मानधन देण्यात न दिल्यामुळे राज्य शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या नेतृत्वात स्वयंपाकी व मदतनिसांनी आज मंगळकवारी १० मार्च रोजी जिल्हा परिषदेवर लाठी मोर्चा काढून लक्ष वेधले.
पोषण आहार शिजविणारे स्वयंपाकी, मदतनिसांना दरमहा तुटपुंजे एक हजार रुपये मानधन मिळत आहे. कामगारांचे मानधन पंचायत समितीस्तरावरून अद्यापही वितरीत करण्यात आले नाही. त्यामुळे दिवाळी, दसरा यासारखे सण साजरे करता आले नाही. पैसे असून देखील मानधन मिळत नसल्यामुळे शिक्षणाधिकारी व अधीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी शिक्षण सभापती नरेंद्र ठाकरे यांच्याकडे शिष्टमंडळाने केली. दोन वर्षापूर्वी खाते काढण्यात आले. मात्र मानधन मुख्याध्यापकांच्या खात्यात जमा केल्या जाते. यापुढे कामगारांच्या खात्यातच मानधन जमा करण्यात यावे, मानधन वाटपात होणारी दिरंगाई टाळण्यात यावी, कामगारांना रजा मंजूर करण्यात यावी, शिक्षक कामगारांना अतिरिक्त काम करायला लावतात. हा प्रकार थांबविण्याची मागणी यावेळी करण्यात आली. लाठी मोर्चात पी.पी. घाडगे, विजय ठाकरे, दिवाकर नागपूरे, संजय भालेराव, ज्योती रत्नपारखी, संगीता बागडे, शमा शेख, शमीम शहा, नसीम शहा, संगीता खंडाळकर, विशाखा ठोंबरे, शशिकला मस्के, शारदा तोटेवाड, सया पोलारकर, सुशिला मेडके, सागर जाधव, चेतना चव्हाण, लता कांबळे, मिरा कामळे, जयवंती डेहणकर यांच्यासह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.









