शिवकालीन शस्त्रांनी उलगडली शौर्यगाथा

यवतमाळ, दि. १७ – शिवकाळामध्ये शस्त्रांना महत्त्व अनन्यसाधारण होते. शिवाजी महाराजांनी दारुगोळा आणि शस्त्र निर्मिती कारखाने उभारले होते अफझलखान विरुद्धच्या लढाईत झालेला चिलखत, बिचवा यांचा प्रभावी वापर, शंभूकाळात झालेला धनुष्य बानाचा वापर, यात शस्त्रांची भूमिका प्रभावी राहिली आहे.येथील गुरुदेव मंगल कार्यालयात शिवकालीन शस्त्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास गाजविलेल्या शस्त्रांचे दर्शन यवतमाळांनी घेतले.
शिवरायांच्या कतृत्वाने संपूर्ण महाराष्टÑात स्वराज्य स्थापन झाले. ज्या शस्त्रांच्या भरवशावर बुद्धीचातुर्याने शिवाजी महाराजांनी इतिहास घडविला. तेच राजांचा स्पर्श लाभलेले ऐतिहासिक साक्ष देणारे दूर्मिळ शस्त्रास्त्र यवतमाळकरांना बुधवारपर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ वाजतापर्यंत बघता येणार आहे. या प्रदर्शनात २२५ प्रकारच्या शस्त्रांचा खजिना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला. मराठा धोप, पट्टा, दांडपट्यासह तलवारी, ढाली, गुप्ती, कट्यार, खंजीर, जंबिया, बिचव्यापासून ते अंगरख्यापर्यंत असलेल्या सर्व शस्त्रांचे दर्शन यवतमाळकरांना घडले. शिवकालीन शस्त्रप्रदर्शन बघण्यासाठी शाळकरी विद्यार्थी, शिवसैनिक, शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या प्रदर्शनीत शिवाजी महाराज यांच्या तलवारीच्या चित्रासह मावळ््यांनी वापरलेली विविध प्रकारची शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. मराठा तलवारीसोबतच राजस्थानी, मुघल, नायर तलवार, गर्ज, भाले, कुºहाड, धातूच्या चर्मढाली, गुप्त्याचे विविध प्रकार, ठासणीचे पिस्तूल, धनुष्यबान, संगीन आदी शस्त्रास्त्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. शस्त्रांची बारकाईने पाहणी करण्याबरोबरच विद्यार्थी व आबालवृद्धांनी माहिती देखील जाणून घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− 6 = one