
मुंबई – दुष्काळ, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतक-यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आज घेतला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील तब्बल दोन लाख २३ शेतकरी सावकारांच्या कर्जातून मुक्त होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतक-यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले १५६ कोटींचे कर्ज आणि त्यावरील १५ कोटींचे व्याज, असे तब्बल १७१ कोटी रुपये राज्य सरकार देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून अनेक संकटांचा सामना करणा-या शेतकऱ्यांना सावकारांच्या कर्जाच्या खाईतून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.









