शेतकºयांनी केली वचननाम्याची होळी

pakej holi1
यवतमाळ , दि ११ (प्रतिनिधी) -महाराष्ट्राच्या युती सरकारने व केंद्रात सत्ता प्राप्तीसाठी पिक कर्ज माफी व वाढीव हमी भाव देऊ असे वचननाम्यात जाहिर केले होते. केंद्रात भाजपाची व राज्यातही युतीची सत्ता असून शेतकºयांच्या प्रश्नाबाबत गंभीर नाही. त्यामुळे नापिकीचे प्रती हेक्टरी अनुदान, संपुर्ण पीक कर्जमाफी व लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव कापसाला, सोयाबीनला, तुर व धानाला द्या या मागणीसाठी १४ शेतकºयांनी आत्महत्या केलेल्या दहेली येथे आज गुरूवारी युतीच्या वचननाम्याची होळी करून शासनाचे लक्ष वेधले.
विदर्भ जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी याच्या नेतृत्वात शेतकरी नेते प्रेम चव्हाण, मारेश्वर वातीले, अंकित नैताम,  शेखर जोशी, भीमराव नैताम, दहेलीचे जयकुमार चौधरी, सरपंच वासुदेव भोयर, नंदकिशोर मानकर, रामभाऊ एलादे, योगेश मानकर, अशोक बोंद्रे, संदीप चौधरी, बेबी मेश्राम, रेखा बोंद्रे, सुचिता ठाकरे, सतीश भोयर, अमर पांडे, दीपक येरावार यांच्यासह शेतकरी मोठ्या प्रमाणात शामील झाले होते. यावेळी बोलतांना किशोर तिवारी म्हणाले की, दुष्काळग्रस्त शेतकयार्ना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये अनुदान, कर्जमाफी व नव्याने पीककर्ज देण्याची योजना लागू केली नाही. सर्व उपासमारीला तोंड देत असलेल्या शेतकरी व शेतमजुरांना अंत्योदय योजना तत्काळ लागू केली नाही. सर्व दुष्काळग्रस्त शेतकºयांना व शेतमजुरांना मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा व मुलीच्या लग्नासाठी अनुदान तात्काळ द्यावे ह्या मागण्या यावेळी केली. मागील १२ वषार्पासून तेच अधिकारी पॅकेज तयार करीत असुन हजारो कोटी रुपये पाण्यात जात आहेत असे ते म्हणाले. कर्जावरील व्याजमाफी व कर्जाचे पुर्नवसन हे थोतांड असुन खाजगी सावकारांचे कर्जमाफी सरकार कोणत्या नोंदीवरून करणार कारण सध्या गावात कृषीकेंद्र मालक, शिक्षक, पोलिस व अन्ना कोणताही परवाना न घेता कर्ज देत आहे. हे सरकार जे करायेचे आहे ते करीत नसुन पॅकेज बाजार मांडून शेतकरी आत्महत्यांना आमंत्रण देत आहे असा आरोपही तिवारी यांनी केला. ज्योपर्यंत महाराष्ट्राच्या युती सरकारने केंद्रात व राज्यात सत्ता प्राप्तीसाठी दिलेले वचन पुर्ण करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फार्मुल्याप्रमाणे लागवड खर्च अधिक ५० टक्के नफा असा हमीभाव कापसाला, सोयाबीनला, तुर व धानाला देणार शेतकरी आत्महत्या थांबणार नाही. त्यामुळे  सरकारने शेतकºयांना वाचविण्यासाठी आपले वचन पुर्ण करावे अशी मागणीही तिवारी यांनी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


eight × 1 =