पांढरकवडा – निसर्गाच्या लहरिपणामुळे तालुक्यातील वाढोडा येथील शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी ११ जुलै रोजी दुपारी २ वाजता घडली. शालीक चंपत गेडाम (४१) रा. वाढोडा असे मृतकाचे नाव आहे. गेडाम यांच्या वडीलाच्या नावे गट नं. २९/११ मध्ये ०.०२ हेक्टर आर जमीन आहे. त्याचेवर अडणी येथील सोसायटीचे १० हजार ८७६ रुपये कर्ज आहे. मृगनक्षत्रात पाऊस बरसल्याने शेतकºयांनी शेतात बियाणे लागवड व पेरणी केली होती. मात्र तब्बल २० दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पिक करपल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे गेडाम सतत विवंचनेत राहत होता. दरम्यान दोन दिवसापासून तो घरुन बेपत्ता झाला होता. नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली असता शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्याच्या मागे पत्नी, तीन मुली, १ मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे. याप्रकरणी मृतकचे जावाई सुरेश महादेव मेश्राम रा. सायखेडा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.









