शेतकºयाची आत्महत्या

उमरखेड – सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपनाला कंटाळून युवा शेतकºयाने आत्महत्या केल्याची घटना साखरा येथे बुधवारी घडली. किसन शेषराव वानखेडे (२२) रा. साखरा असे शेतकºयाचे नाव आहे. खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकरी हवालदिल झाला होता. आता पुन्हा रब्बी हंगामातही अवकाळी पाऊस व गारपिट झाल्याने शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. वानखेडे याच्याकडे सात एकर शेती असून त्याने ग्रामीण क्षेत्री बँकेचे दिड लाख रुपये कर्ज घेतले होते. नापिकीमुळे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत तो राहत होता. फेबु्रवारी महिन्यात लग्न असलेल्या या युवा शेतकºयाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून अकस्मात मृत्यूची नोंद केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 2 = eighteen