
यवतमाळ – दिग्रस व दारव्हा तालुक्यात बोगस बियाणे विक्रीचे प्रकरण उघड झाल्यानंतर औरंगाबाद कंपनीच्या जनरल मॅनेजरने पुसद तालुक्यातील शेतकºयाची पाच लाखाने फसवणूक केल्याची बाब समोर आली आहे.
औरंगाबादच्या व्हर्जीन सिड कंपनीने जिल्ह्यातील शेतकºयांना कपाशीचे बोगस बियाणे विक्री केल्यानंतर त्याची पेरणी केल्यावर बियाणे उगवलेच नसल्याच्या शेतकºयांनी तक्रारी केल्या होत्या. पूसद तालुक्यातील शेतकºयाने ४ लाख ९९ हजार २५९ रुपयांचे बियाणे खरेदी केले होते. ते न उगवल्याने जिल्हा गुणवत्ता नियंत्रण विभागाकडे तक्रार केली होती. याप्रकरणी सुभाष उलेमाले यांच्या तक्रारीवरून पुसद ग्रामीण पोलिसांनी जनरल मॅनेजर विष्णू जोशीविरुद्घ गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.









