
पांढरकवडा – कापूस खरेदी दरम्यान व्यापाºयांनी भाव पाडल्याने आक्रमक झालेल्या शेतकºयांनी कापूस खरेदी बंद पाडली. शेतकºयांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी बाजार समितीच्या संचालकांसह पदाधिकारी न फिरकल्याने तीव्र शब्दात रोष व्यक्त करण्यात आला.
मार्केट यार्डवर आज ५० ते ६० च्या आसपास वाहन व तेवढ्याच बैलंबंडी कापूस खरेदीच्या प्रतिक्षेत उभ्या होत्या. सकाळी ११ वाजता कापूस खरेदीच्या हर्रासास सुरुवात झाली. परंतु वाहनातील कापूस ३९०० ते ३९५० भावाने खरेदी केला. तर बैलबंडी मधील कापूस ३८०० ते ३८५० असा भावाने खरेदी करणे सुरू केले. व्यापाºयांच्या दुजाभावाला शेतकºयांनी विरोध दर्शवित खरेदी बंद पाडली. आक्रमक झालेल्या शेतकºयांनी मार्केट यार्डचे प्रवेशद्वार बंद करून वाहनास बाहेर जिनिंगमध्ये जाण्यास मज्जाव केला. जोपर्यंत समाधानकारक भाव मिळणार नाही, तोपर्यंत खरेदी सुरू होऊ देणार नाही, असा पवित्रा शेतकºयांनी घेतला. शेतकरी नेते मोहन मामीडवार यांनी शेतकºयांचे गाºहाणे ऐकूण व्यापाºयांशी चर्चा केली. यावेळी बाजार समितीचे एकही संचालक यावेळी उपस्थित नव्हते. सचिवाचे एकूण घेण्यास खासगी व्यापारी तयार नव्हते. मामीडवार यांनी सभापती प्रकाश मानकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता ते खासगी कामात व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. व्यापाºयांनी कापूस खरेदीत अक्षरश: लूट चालविली असताना या प्रश्नावर बोलण्यास कुणीही तयार नाही. कापसाच्या उत्पन्नात घट झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्यात बाजारात व्यापाºयांकडून अशी लूट सुरू आहे. भेदभाव न करता कापूस खरेदी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर खरेदी पूर्ववत सुरू करण्यात आली. मात्र राजकीय पुढारी शेतकºयांच्या प्रश्नावर बोलत नसल्याने रोष व्यक्त करण्यात आला.









