
नागपूर- सन २०१४ मध्ये पडलेल्या अल्पपावसामुळे खरीप हंगामातील आणेवारी ५० पैसापेक्षा कमी निकाली. त्यामुळे सरकारने शेतकºयांना दुष्काळी पॅकेज जाहीर करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र पीक कर्जासाठी बँकांनी शेतकºयांकडे तकादा लावल्याने या संकटात भर पडली होती. अखेर सहकार व पणन विभागाने शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती देण्याचे आदेश काढले.
जिल्ह्यातील २०५० गावातील अंतिम आणेवारी ५० पैशापेक्षा कमी निघाल्याने यापूर्वीच टंचाईसदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात येऊन विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. सहकार विभागाशी संबंधित निगडीत सहकार कर्जाचे रुपांतरण व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगीती देण्यात आली आहे. जिल्ह्यातील गावांमध्ये टंचाई परिस्थिती जाहीर केली आहे. त्या सर्व गावातील अल्पमुदत कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रुपांतरण व शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती देण्यात येणार आहे. महाराष्टÑ राज्य सहकारी बँक लि.मुंबई व जिल्हा मध्यवर्ती बँकानी आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.









