संघाच्या तालावर भाजप नाचतोय -सोनिया गांधी

rss
मोरादाबाद- यंदाची लोकसभा निवडणूक ही संपूर्ण दोन विचारसरणीदरम्यान लढली जात आहे. भाजप हा पक्ष संकुचित विचारसरणीच्या आणि जहालमतवादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) तालावर नाचत आहे, अशी खरमरीत टीका काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केली. येथील प्रचारसभेत त्या सोमवारी बोलत होत्या.
आपल्या जहालमतवादाने आणि संकुचित विचारसरणीच्या सहाय्याने समाजामध्ये फुटीचे काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत आहे. अनेक वर्षापासून जपून ठेवलेली देशाची मूल्ये आणि रीतीरिवाज तोडण्याचे काम ते करत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला. त्यांच्या भूलथापांना बळी न पडता जनता त्यांना नक्कीच पराभूत करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपची विचारसरणी देशासाठी घातक असून काँग्रेसच फक्त देशाला एक स्थिर आणि भक्कम सरकार देईल, असे त्या म्हणाल्या. देशातील अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठी काँग्रेसने सरकारने वेगळ्या मंत्रालयाची तसेच राष्ट्रीय वक्फ विकास महामंडळाची स्थापना करून एक ऐतिहासिक पाऊल उचलले. महात्मा गांधी, मौलाना आझाद आणि त्यांच्यासारख्या अनेक त्याग केलेल्या नेत्यांमुळे काँग्रेस पक्ष आतापर्यंत खंबीरपणे उभा आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका, काँग्रेसच देशाला कणखर आणि स्थिर सरकार देऊ शकते, असेही त्या म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


six × 1 =