
मुंबई – पॅरोलची मुदत संपल्याने अभिनेता संजय दत्त पुन्हा एकदा येरवडा तुरुंगात दाखल झाला आहे. पत्नी मान्यता आजारी असल्याने त्याला पॅरोल देण्यात आली होती. तब्बल दोनवेळा पॅरोलची मुदत वाढवल्याने जोरदार टीकाही झाली होती. मुंबई १९९३साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट दरम्यान बेकायदा शस्त्रे बाळगल्याप्रकरणी संजयला दोषी ठरवण्यात आले होते. मात्र पत्नी मान्यता आजारी असल्याने त्याला सगल तीन वेळा पॅरोल मंजूर करण्यात आला होता. संजय दत्त २१ डिसेंबर २०१३पासून पॅरोलवर तुंरुगाबाहेर आहे.दरम्यान, तुरुंगात जाताना मुंबईतील घराबाहेर आणि येरवडा तुरुंगाबाहेर निदर्शने करण्यात आली.









