
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकºयांकडील थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सक्तीची कारवाई सुरू केली आहे. शेतकºयांची जंगम, स्थावर मालमत्ता जमीन विक्री करून वसुली करण्याची जाहीर नोटीस दिली. ही सक्तीची कर्जवसुली थांबविण्यात यावी, या मागणीचे निवेदन राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या महसूल विभागाने यापूर्वी शेतीशी निवडीत कर्जाची वसुली करण्यात येवू नये, अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. तशा सूचना बँकाना देण्यात आलेल्या आहेत. तरी देखील जिल्हा मध्यवर्ती बँकेने सक्तीची कर्जवसुली करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात शेतकºयांच्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या झालेल्या असतानाही शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून बँकेकडून करण्यात येणारी कारवाई योग्य नाही. प्रशासनाने सक्तीची कर्जवसुली थांबवून शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी राहुलरंजन महिवाल यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी संदीप बाजोरीया, माजी जि.प.अध्यक्ष प्रवीण देशमुख, राकाँचे जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले, बाळासाहेब चौधरी, सुरेश चिंचोळकर, आशीष मानकर आदी उपस्थित होते.









