साखर संकुलावर दगडफेक, गाडीही पेटवली

Swabhimani Shetkari Sanghatana protest
पुणे दि. १२ – ऊसाला एफआरपीनुसार दर न देणा-या कारखान्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत साखर संकुलाची तोडफोड केल्याचा प्रकार सोमवारी पुण्यात घडला. साखर संकुलातील गाडयाही पेटवून दिल्या. तसेच सरकारच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या गेल्या, असे असतानाही खासदार राजू शेट्टींनी केलेल्या या आंदोलनाबाबत शेतक-यांमध्ये शंकाच आहे. कारण ऊस दराच्या प्रश्नावर गेल्या दोन महिन्यापासून राजू शेट्टी मूग गिळून बसले होते का ? असा सवाल शेतकरी विचारत आहेत. परंतु, खासदार राजु शेट्टींनी केलेले आंदोलन हा केवळ दिखावा आहे की उद्रेक आहे, हे आठवडाभरात स्पष्ट होईल.
गेल्या दोन महिन्यापासून गाजत असलेल्या ऊसदराच्या प्रश्नावर भाजप सरकार काहीच भूमिका घेत नसल्याचे लक्षात येताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरु केले.
दरम्यान, साखर आयुक्त बिपीनकुमार शर्मा यांनी दुपारी एक वाजताची वेळ दिली होती. आयुक्तांच्या केबिनमध्ये न जाता आयुक्तांनीच शेतकरी संघटनेच्या कार्यकत्रे आणि नेत्यांपुढे येऊन म्हणणे ऐकूण घ्यावे, अशी कार्यकर्त्यांनी अपेक्षा होती. मात्र, शर्मा यांनी केवळ खासदार शेट्टी आणि त्यांचा प्रतिनिधी अशा दोनच व्यक्तींनी आपल्या केबिनमध्ये यावे, असा निरोप पाठवला. आयुक्त शर्मा यांनी खाली येण्यास नकार दिल्याने कार्यकत्रे चिडले आणि साखर संकुलची तोडफोड केली. सरकारविरोधात घोषणाबाजी करीत त्यांनी आवारातील गाडीही पेटवून दिली. अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


7 + = ten