साधना सरगम यांच्या सुरमयी मैफलीने यवतमाळकर मंत्रमुग्ध

41
यवतमाळ ,दि. ९ – समता मैदानातील हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत स्वरसम्राज्ञी साधना सरगम यांच्या ‘म्यूझिक इंडिया’ नाईक ने येथील येथील समता मैदानात सप्तसुरांचा पाऊस पाडला. सायं. ६ वाजता समता मंचावर साधना सरगम यांच्या आगमन होताच, त्यांच्या चाहत्यांनी एकच जल्लोश केला. पार्श्वगायिका साधना सरगम यांनी प्रेक्षकांना हात उंचावून ‘जयभीम, जय ज्योती’चा उद्घोष केला. यावेळी अख्खे समता मैदान आनंदाने भारावून गेले. साधना सरगम यांच्या ‘नमस्कार घ्यावा अहो बुध्द देव, घुमे प्रार्थना अंतरी दीप लावा’ या समधूर गिताने ‘म्यूझिकल नाईट’ चा प्रारंभ झाला. पुढे त्यांच्या सोबत आलेल्या कलावंतनी, ‘छाती ठोक हे सांगू जगाला’ असा विद्वान होणार नाही’ या भीमगीताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीतील नवोदित पार्श्वगायिका प्रभा अत्रे या गायीकेने ‘उमर मे छोटी, भोली भाली भीमराज की बेटी मै तो जयभी वालू हूँ’ हे गीत सादर करताच, समता मैदानात टाळ््यांचा पाऊस पडला. याप्रसंगी साधना सरगम यांचा समना प्रतिष्ठानच्या वतीने सदस्य सत्कार करण्यात आले.
साधना सरगम यांच्या जादुई आवाजाने यवतमाळकरांना भूरळ घातली. दरम्यान पावसाचे वातावरण तयार झाले. क्षणार्धात पावसाच्या सरी कोसळून लागल्या. या स्थितीतही मैदारातील प्रेक्षकांनी खुर्च्या डोक्यावर घेऊन मैफलीचा आनंद लुटला. पावसाचा जोर वाढल्याने काही काळ कार्यक्रमाला ब्रेक देण्यात आला. मात्र लगेच पाऊस थांबल्या बरोबर परत स्वरसम्राज्ञी साधाना सरगम यांचे मंचावर आगमण झाले. दरम्यान त्यांनी संगितप्रेमी जिल्हाधिकारी राहूल रंजन महिलाव यांना गीत सादर करण्यासाठी मंचावर आमंत्रित केले. ‘जब काई बात बन जाये’ हे साधनाचे गीत, स्वत: साधना सरगम व जिल्हाधिकारी महिवाल यांनी गायले. रोमॅटीक काही गीते त्यांनी यावेळी प्रस्तूत केली. याप्रसंगी समता मैदानातील वातावरणे काही काळ रोमॅटीक बनून गेले.
पार्श्वगायिला साधना सरगम यांच्या म्यूझिकल इंडीया या कार्यक्रमासाठी पुणे येथील संदीप पंचवटकर यांना खास निमंत्रिक करण्यात आले होते. त्यांच्या संचनाने प्रेक्षकांची मने जिंकली. ‘जब कोई बात बन जाये’, ‘पहला नशा’, ‘सात समंदर पार मै तेरे पिछे पिछे आगयी’, ‘मेरे ख्वाबो मे जो आये’, ‘.. हो जा रंगीलारे’, ‘ढोल बजने लगा’ या एकापेक्षा एक सरस गाण्यांनी प्रेक्षकांच्या मानावर अधिराज्य गाजवले. शेवट ‘मिले सुरू तेरा मेरा तो सुर बने हमारा’ हे भारतीय एकात्मता जागविणारे गीत गावून सरगम यांनी यवतमाळ करांना ही रात्री ‘खुबसुरत’ करण्याबाबत मनापासून धन्यवाद दिले. यवतमाळच्या प्रेमला मी कधीही विसरणार नाही हे सांगतानाच त्यांची ‘बस आज की रात है जिंदगी, कल हम कहा तुम कहा’ हे गित प्रस्तूत केले. शेवटी ए.आर. रहमान यांनी सांगित बध्द केलेल्या सुपरहिट ‘जय हो’ गिताने, त्यांनी मैफलीचा विरोध घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समता पर्व प्रतिष्अीनच्या अध्यक्षा मंगला दिघाडे, राखी भगत, उज्वला इंगोले, अर्चना खरतडे, रविता भोवते, एकता वाणी, अंजली मेश्राम, स्मिता उके, अनिल आडे, मधुकर भैसारे, प्रज्ञा फुलझेले, जया मनवर, जयश्री भगत, प्रिया वाकडे, लोपमृदा पाटील, माया गोबरे, सुनिता काळे, किशोर भगत, दिपक नगराळे, विनोद बुरबूरे, नारायण थूल, अंकूश वाकडे, धीरज वाणी आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


nine − 3 =