– २८ जुलैपासून आमरण उपोषण
प्रतिनिधी / नागपूर
वर्धा जिल्हा अंतर्गत येणाºया हिंगणघाट येथील कृषि उत्पन्न बाजार समिती चे सभापती यांचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समिती येथे इलेक्ट्रिशियन पदावर कार्यरत असलेल्या अनंता साटोणे यांना समितीने तडकाफडकी बडतर्फ केल्यामुळे त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची पाळी आलेली आहे. त्वरित बाजार समितीने साटोणे यांना कामावर रूजू न केल्यास वर्धा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २८ जुलैपासून साटोणे हे कुटुंबासह आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा समितीचे पीडित कर्मचारी अनंता साटोणे यांनी आज पत्रपरिषदेद्वारे दिला.
अनंता साटोणे हे १६ आॅक्टोबर १९९७ साली हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती येथे इलेक्ट्रिशियन पदावर कार्यरत झाले. त्यांनी कामावर असताना वरिष्ठांनी सांगितलेले कामे प्रामाणिकपणे केली. परंतु हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांनी मनमानी करीत कोणतेही कारण नसताना ७ जुलै २०१४ रोजी बडतर्फ करण्याची कारवाई केली.
वास्तविक अनंत साठवणे यांनी २००० पासून पाचव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी व २००८ पर्यंतचे एरियर्स देण्यात यावे. तसेच सहावा वेतन आयोग लागू करण्याची मागणी अनंता साटोणे यांनी केली होती. यासाठी वरिष्ठांकडे अर्ज विनंत्या केल्या होत्या. आपल्याला न्याय मिळण्यासाठी अनंता साटोणे यांनी प्रयत्न केले असता सभापती सुधीर कोठारी यांनी कोणतेही महत्वाचे कारण नसताना बडतर्फीची कारवाई केली आहे.
यापूर्वीही सुधीर कोठारी हे नगराध्यक्ष असताना त्यांनी घराचे प्रकरण उकरून काढून व अतिक्रमण करून घर बांधले असल्याचा आरोप करीत घर पाडण्यासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी पाठविण्यात आले होते. परंतु या गोष्टीला विरोध करताच त्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत स्थायी कर्मचारी असताना अनंता साटोणे यांना बडतर्फ केले होते. कोठारी यांची ही ‘मेरी मर्जी’चा कारभार असून त्यांच्या विरोधात कोणी बोलू नये व आपला हक्कही मागू नये यासाठी ही सूडभावनेतून कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप अनंता साटोणे यांनी केला आहे.
२२ फेब्रुवारी २०१३ रोजी ड्युटीचा वेळ संपताच सायंकाळी ७.१५ वाजता अनंता साटोणे हे घरी गेले. यांचा कामाचा वेळ सकाळी १० ते ६ वाजेपर्यंत आहे. २२ फेब्रुवारी बाजार निरीक्षक येथील वीज पुरवठा खंडित झालेला होता. बाजार निरीक्षक राठोड यांनी यासंदर्भात साटोणे यांना कळविले. माहिती मिळताच साटोणे बाजार निरीक्षक कार्यालयात हजर झाले व राठोड यांची भेट घेतली. यादरम्यान राठोड यांनी कुठलाही विचार न करता साटोणे यांना अश्लिल शिविगाळ केली व कुठल्याही प्रकरणात फसवून बडतर्फ करणार असल्याची धमकी दिली. यासंदर्भात राठोड यांनी समिती तयार करून खोटानाटा अहवाल वरिष्ठांकडे सादर केला व त्या आधारे ७ जुलै २०१४ रोजी साटोणे यांना बडतर्फे करण्यात आले. कुठल्याही कृषी उत्पन्न समितीने आपल्या कर्मचाºयांवर उत्पन्नाच्या ३५ टक्के खर्च करावा असा राज्य शासनाचा स्पष्ट आदेश असतानाही हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समिती कर्मचाºयांवर मात्र ८ टक्के खर्च करीत असल्याचे साटोणे यांनी सांगितले. या समितीच्या सभापतीने कर्मचाºयांचे शोषण करायला प्रारंभ केला असून त्यांनी समितीच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचार केलेला आहे. त्यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर येऊ नये म्हणून त्यांच्या इशाºयावरून साटोने कुठलेही कारण समोर करून बडतर्फ करण्यात आल्याचा आरोप साटोणे यांनी केला. हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समितीने साटोणे यांना कामावर रूजु न केल्यास साटोणे हे २८ जुलैपासून वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.
सुधीर कोठारीची मनमानी
बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांचा मनमानी कारभार सुरू असून कर्मचाºयांना दहशतीत ठेवण्यासाठी त्यांना बडतर्फ करणे, याशिवाय बाजार समितीतील अनेक कर्मचाºयांना घरकामगारासारखे घरातील वैयक्तिक काम करण्यासाठी राबविण्यात येत आहे.









