
यवतमाळ – शिवसैनिकांनी गाव, विभागाच्या सेनापतीची जबाबदारी घेऊन लोक सभेचा किल्ला लढवून महायुतीच्या उमेदवार भावना गवळी यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन आ. संजय राठोड यांनी केले.
मातोश्री विमलबाई चिरडे मंगल कार्यालय दिग्रस आयोजीत कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी भाजप जिल्हाध्यक्ष राजु डांगे, नामदेव खोब्रागडे, सुधाकर तायडे, परमानंद अग्रवाल, अजय बिहाडे, बाळासाहेब मुनगिनवार, मोहन भोयर, जितेंद्र महाराज, राजेंद्र पडगिलवार, महादेव सुपारे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, ६० वर्षात काँग्रेसने रोटी, कपडा और मकान चा प्रश्न कायम ठेवला. महिला अत्याचारांच्या घटनेत वाढ झाली आहे. शेतकरी-शेतमजुर आत्महत्या करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी महायुतीच्या उमेदवार भावना गवळी बोलतांना म्हणाल्या की, मिडीयाच्या माध्यमातून जनता जागृत झाली असून काँग्रेसचे पितळ उघडे पडत असल्याने काँग्रेस नेते नैराश्याच्या गर्तेत सापडल्याचेही त्या म्हणाल्या. तर भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे म्हणाले की, देशात खरी लोक शाही आणण्यासाठी काँग्रेस आघाडी सरकारला उलथविण्याचा संकल्प करा. नरेंद्र मोंदीना पंतप्रधान करायचे असेल तर २७२ खासदारांच्या आकड्या पर्यंत पोहचण्यासाठी आवर्जुन मतदान करा असे आवाहनही त्यांनी केले.









