
मुंबई- राज्यात स्थिर सरकार असावे म्हणून आम्ही भाजपाला पाठिंबा दिला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. खुशाल चौकशी करा. भाजप सरकार अस्थिर होऊ नये, राज्यात पुन्हा निवडणुका परवडणा-या नाहीत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला कोणतीही अपेक्षा न ठेवता पाठींबा देण्याचे जाहीर केले. मात्र आम्ही पाठींब्याबाबत कोणाशीही चर्चा केलेली नाही, सभागृहात मतदान करायचे की नाही, हे त्या दिवशी ठरवू, असे पवार म्हणाले. आम्ही कोणाला मतदान करावे आणि कोणाला पाठिंबा द्यायचा हा आमचा प्रश्न आहे, इतरांनी त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही आणि यासाठी दुस-यांनी आम्हाला सल्ला देऊ नये, असे पवार यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला हाणला. तसेच होय, ‘भगवा दहशतवाद’ हा शब्द माझाच आहे, असेही पवार यांनी ठामपणे सांगितले.
भाजप सरकारला पाठिंबा दिला असला तरी एखाद्या विधेयकाला विरोध असला तर आम्ही विरोधातही मतदान करू, असेही ते म्हणाले.









