
यवतमाळ: निर्मल भारत मिशन अंतर्गत विविध शासकीय कार्यालय व गावस्तरावर विशेष कृती आराखडा तयार करून त्याप्रमाणे स्वच्छतेची मोहिम निरंतर कशी सुरु राहतील यासाठी त्या त्या विभागाने नियोजन करून मिशन राबवावे, अशा सुचना जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्व विभाग प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उमरखेडचे उपविभागीय अधिकारी दिपक सिंगला यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सदर स्वच्छ भारत अभियान शासकीय कार्यालयांसोबतच गाव व ग्रामपंचायत स्तरावरही राबवायचे आहे. त्यासाठी संबंधीत नियंत्रन अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालयांसाठी उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून काम करतील अशा सुचना त्यांनी केल्या.
नगर परिषद स्तरावर राबविण्यात येणाऱ्या मिशनची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. वैयक्तीक स्वच्छतेसोबतच परिसर व नंतर संपुर्ण गाव स्वच्छ करणे या मोहिमेचे उदि्दष्ठ असल्याने त्याप्रमाणे कृती आराखडा करून कामाला लागण्याचा सुचना त्यांनी केल्या.मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात दिनांक 14 नोव्हेंबर बालक दिन ते 19 नोंव्हेंबर जागतीक शौचालय दिन यादरम्यान सप्ताह राबविण्यात येणार आहे. अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये दिनांक 14 नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची मते सांगुन परिसराची स्वच्छता. दिनांक 15 नोव्हेंबर रोजी वैयक्तीक स्वच्छता, हात धुणे, नखे काढणे, दातांची स्वच्छता याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते. 16 नोव्हेंबर रोजी स्वच्छतेबाबत कार्यशाळा घेण्यात येतील. 17 नोव्हेंबर रोजी घर, परिसर, गाव व शहराची स्वच्छता याचे महत्व पटवून दिल्या जातील. 18 नोव्हेंबर रोजी शाळेतील मुतारी, शौचालय, स्वच्छतागृह याच्या स्वच्छतेचे महत्व व त्यापासून होणाऱ्या रोगराईबाबत परावृत्त कसे राहायचे याबाबत सांगितल्या जाणार आहे. तर शेवटच्या दिवशी 19 नोव्हेंबर स्वच्छता या विषयावर निबंध, चित्रकला स्पर्धा, वर्गखोली स्वच्छता व सजावट स्पर्धा आदी स्पर्धा आयोजित केल्या जातील. यावेळी निरंतर स्वच्छतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सुचना केल्या.









