१५व्या लोकसभेचे अखेरचे अधिवेशन बुधवारपासून

नवी दिल्ली- १५ व्या लोकसभेचे अखेरचे अधिवेशन बुधवारपासून सुरू होणार आहे. तेलंगण राज्यनिर्मितीसह विविध ३९ विधेयके या अधिवेशनात मांडली जाणार आहेत.
पाच ते २१ फेब्रुवारी दरम्यान होणा-या या अधिवेशनात लेखानुदान आणि हंगामी रेल्वे अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी संसदीय कार्यमंत्री कमलनाथ यांनी सर्व पक्षीय नेत्यांना आवाहन केले आहे.या अधिवेशनात ३९ विधेयके सादर केली जाणार आहेत. यात जातीय हिंसाचार, तेलंगण राज्य निर्मिती विधेयक आदी महत्त्वाच्या विधेयकांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ five = 7