२४ पोलीस अधिकाºयांवर बदलीचे गंडातर
निवडणूक आयोगाचा दणका
यवतमाळ
दि. ३१ (स्थानिक प्रतिनिधी)
…………………………..
लोकसभा निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर निवडणूक आयोगाकडून आलेल्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील तीन वर्षे पूर्ण झालेल्या पोलिस अधिकाºयांच्या बदल्या कराव्या लागणार आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशाने जिल्ह्यातील २४ पोलीस अधिकाºयांवर बदलीचे गंडातर आले आहे.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पोलिसांसाठी एक परिपत्रक जाहिर केले. त्यामध्ये म्हटले आहे की, गृह (स्वत:च्या) जिल्ह्यात नियुक्तीस असलेले आणि ३१ मे २०१४ रोजी एका जिल्ह्यात तीन वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाºयायांची जिल्हाबाहेर बदली करावी. त्यानुसार माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात यानुसार बदल्या झाल्यास सुमारे १६ पोलीस निरीक्षक व ८ सहा. पोलीस निरीक्षक जिल्ह्याबाहेर बदलून जाण्याची शक्यता आहे. या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे काही अधिकाºयांचे म्हणणे आहे. त्यांच्या मतानुसार एक पोलिस ठाणे म्हणजे एक पद गृहित धरले जावे. एका पदावर तीन वर्षे पूर्ण झाली असतील, तर बदली करावी. त्यांना जिल्ह्याबाहेर बदलता कामा नये. असे झाले तरी या अधिकाºयांनी आणखी एक भीती व्यक्त केली आहे. ती म्हणजे अशा पद्धतीने बदल्या झाल्या तर गोंधळ उडणार आहे. त्या भागाची माहिती झालेले अधिकारी बदलून गेल्याने नव्या अधिकाºयांना तेथे माहिती घेऊन काम करणे कठीण जाणार आहे. त्याचा परिणाम कायदा व सुव्यवस्थेवर होऊ शकतो. अशा बदल्या करायच्या असतील तर त्या किमान एक वर्षे आधी केल्या जाव्यात, अशीही अधिकाºयांची अपेक्षा आहे.सध्या पोलिस अधिकाºयांमध्ये याच एका विषयाची चर्चा सुरू आहे. लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्याने पूर्व तयारी म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई आणि गोपनीय माहिती काढण्याचे काम केले जाते. मात्र, आपली बदली होणार आहे, तर कशाला पूर्व तयारी करा, अशा भावनेतून अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. याचा परिणाम निवडणूक काळातील कायदा व सुव्यवस्थेवर होऊ शकतो. राज्य सरकारने ठरविलेल्या धोरणानुसार कनिष्ठ अधिकाºयांच्या बदल्यांचे अधिकार पोलिस महासंचालकांना आहेत. त्यामुळे या बदल्यांचा प्रस्ताव महासंचालक तयार करून तो अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे पाठवितील. केंद्रीय निवडणूक आयोगाचे परिपत्रक आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात तीन वर्षे पूर्ण होणाºया अधिकाºयांची माहिती मागविली आहे. १५ फेबु्रवारीपूर्वी पोलिस निरीक्षक, सहा. पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करून अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवावा अशा सुचनाही दिल्या आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाने जिल्ह्यातील २४ पोलीस अधिकाºयांवर बदलीचे गंडातर आले आहे.









