२६ विद्यार्थ्यांना विष बाधा

 

भिवंडी – भिंवडी येथील एका आश्रम शाळेतील २६ विद्यार्थ्यांना विष बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. २६ विद्यार्थ्यांपैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना ठाणे येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार शाळेतील काही विद्यार्थ्यांनी दुपारच्या वेळात विहिरीतील पाणी प्यायले. त्यानंतर थोड्याच वेळात या विद्यार्थ्यांना मळमळ, पोटदु:खीचा त्रास जाणवू लागला. एका पाठोपाठ एक असे २६ जण शिक्षकांकडे गेले. तिथे उपस्थित शिक्षकांनी तत्काळ विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये हलवले. २६ पैकी दोन विद्यार्थ्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना ठाणे येथील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्याचे कळते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ four = 12