६७ वर्षांनी २७२ जण प्रथमच मतदान करणार

Lok-Sabha-Constituencies-of-Meghalaya-01-300x149
उंखबव(मेघालय)- देशाला स्वतंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल ६७ वर्षांनी आणि मेघालयला राज्याच्या दर्जा मिळाल्यानंतर ४० वर्षांनी येथील २७२ जण प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील हे नागरीक आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथम मतदान करतील.
भारत आणि बांगलादेश सीमाभागात असणा-या १४ गावातील तब्बल सात हजारहून अधिक नागरीकांची मतदार म्हणून नोंदच नसल्यामुळे आजवर त्यांना कोणत्याही निवडणुकीत मतदान करता आले नव्हते. मात्र यातील २७२ जणांना निवडणूक आयोगाने ईपीआयसी कार्ड दिले असून ते लोकसभा निवडणूकीत प्रथमच मतदान करतील. या २७२ जणांनी याआधी राज्य विधानसभा निवडणुकीत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मतदान केले होते. मतदानाचा अधिकार अद्याप न मिळालेल्यांची संख्या या भागात मोठी असल्याचे निवडणूक अधिका-यांनी सांगितले. १९७१च्या बांगलादेश युद्धानंतर हे सर्व नागरिक विस्थापीत झाले होते. भारत आणि बांगलादेश सीमाभागात हे सर्वजण अनेक वर्षांपासून राहतात. त्यामुळे त्याच्यापर्यंत अद्याप अनेक सुविधा पोहचलेल्या नाहीत. या भागातील अनेक जण ब्रिटीशांच्या आधीपासून येथे राहतात. या १४ गावातील अनेकांकडे मनरेगाची कार्ड आहेत. मात्र या भागात अद्याप पिण्याचे शुद्ध पाणी देखील उपलब्ध नसल्याचे सेंटू संगमा या एका नागरिकाने सांगितले. विशेष म्हणजे ज्या २७२ जण प्रथमच लोकसभेसाठी मतदान करणार आहेत त्यांना अद्याप उमेदारांची नावे देखील माहित नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


6 × nine =