पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for February 26th, 2016

गंगाजल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा 0

गंगाजल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा

 

2016-02-24-1-priyanka_nsराष्ट्रगीत म्हटलं की सर्वसामान्यांचं देशप्रेम उफाळून येतं, याचाच फायदा घेत प्रकाश झा यांनी गंगाजलच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा वापर केला आहे. पोलीस दलातील महिलांना मानवंदना असं सांगत प्रियांका चोप्रा, स्वत: प्रकाश झा आणि पोलीसांच्या वेशातील अन्य जन गण मन गातात, असं या राष्ट्रगीताचे स्वरुप आहे.

राष्ट्रगीताचा आदर राखणे आणि ते सुरू असताना प्रत्येकानं उठून उभे राहणे हे आवश्यकच आहे. परंतु राष्ट्रगीताचा वापर गंगाजल या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी, प्रमोशनसाठी करावा का हा प्रश्न आहे. कारण, हे राष्ट्रगीत संपल्यानंतर जय गंगाजल अशी चित्रपटाची जाहिरातही याच व्हिडीयोमध्ये येते.

राष्ट्रगीत हा इतका संवेदनशील विषय आहे की, जे मान देत नाहीत, त्यांना देशद्रोही ठरवण्यास खूपजण मोकळे होतात, परंतु राष्ट्रगीताचा असा व्यावसायिक कारणासाठी वापर करणं योग्य ठरतं का प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

February 26, 2016 in मनोरंजन
गंगाजल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा वापर योग्य वाटतो का 0

गंगाजल चित्रपटाच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा वापर योग्य वाटतो का

2016-02-24-1-priyanka_ns

राष्ट्रगीत म्हटलं की सर्वसामान्यांचं देशप्रेम उफाळून येतं, याचाच फायदा घेत प्रकाश झा यांनी गंगाजलच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा वापर केला आहे. पोलीस दलातील महिलांना मानवंदना असं सांगत प्रियांका चोप्रा, स्वत: प्रकाश झा आणि पोलीसांच्या वेशातील अन्य जन गण मन गातात, असं या राष्ट्रगीताचे स्वरुप आहे.

राष्ट्रगीताचा आदर राखणे आणि ते सुरू असताना प्रत्येकानं उठून उभे राहणे हे आवश्यकच आहे. परंतु राष्ट्रगीताचा वापर गंगाजल या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी, प्रमोशनसाठी करावा का हा प्रश्न आहे. कारण, हे राष्ट्रगीत संपल्यानंतर जय गंगाजल अशी चित्रपटाची जाहिरातही याच व्हिडीयोमध्ये येते.

राष्ट्रगीत हा इतका संवेदनशील विषय आहे की, जे मान देत नाहीत, त्यांना देशद्रोही ठरवण्यास खूपजण मोकळे होतात, परंतु राष्ट्रगीताचा असा व्यावसायिक कारणासाठी वापर करणं योग्य ठरतं का प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

हा व्हिडीयो प्रियांका चोप्राने 26 जानेवारी रोजी शेअर केला होता. हाच व्हिडीयो अनेक मल्टिप्लेक्समध्ये दाखवण्यात येत आहे. त्यात एक शक्यता आहे की हे गंगाजलची जाहिरात करणारे राष्ट्रगीत दाखवण्यासाठी मल्टिप्लेक्सही चांगलीच किंमत वसूल करत असणार.

गंगाजलमध्ये पोलीस सुपरिटेंडेंटच्या भूमिकेत प्रियांका चोप्रा झळकत असून प्रकाश झांचं दिग्दर्शन आहे. हा विषय अत्यंत चांगला आहे यात काही वाद नाही, परंतु हा व्हिडीयो प्रकाश झा प्रॉडक्शनने देशभक्ती दाखवण्यासाठी चित्रपटगृहात दाखवलाय की चित्रपटाची जाहिरात करण्यासाठी हा प्रश्न शिल्लक राहतोच.

 

February 26, 2016 in मनोरंजन
मुंबईची पहिल्या दिवशी सौराष्ट्रावर आघाडी 0

मुंबईची पहिल्या दिवशी सौराष्ट्रावर आघाडी

2016-02-24-Untitled-1_ns

पुणे, दि. २४ –  रणजी स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या मुंबईने रणजी सामन्यात्या पहिल्याच दिवशी सौराष्ट्रावर आघाडी मिळवत ४१ व्या रणची चषकावर नाव कोरण्याची तयारी केली आहे.

मुंबईने नानेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्विकारले. कर्णधाराचा हा निर्णय गोलंदाजानी अचूक ठरलवा.

पहिल्याच दिवशी मुंबईच्या गोलंदाजानी सौराष्ट्रावर मात केली. शेवटचे वृत हाती आले तेंव्हा ५८ षटकात ७ गड्याच्या मोबदल्यात १२६ धावा करण्यात सौराष्ट्राला यश आले होते. सौराष्ट्राकडून  अर्पित वासवदा ५९ आणि कर्णधार जयदेव शहा १३ धावावर खेळत आहेत. अवि बारोत १४,  अनुभवी चेतेश्वर पुजारा ४, चिराग जानी १३ वाधांचे योगदान दिले आहे. मुंबईकडून कुलकर्णी ने ३ ठाकूरने २ नायर आणि साधूने प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.

 

दोन्ही संघात विजेतेपदासाठी पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर लढत सुरु  आहे. हा ‘रन’संग्राम कोण जिंकेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईचा संघ ४५ व्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. मुंबईने ४० वेळा रणजी चषक पटकावला आहे. सौराष्ट्राचा संघ दुसऱ्यांचा अंतिम फेरीत स्थान मिळविण्यात यशस्वी ठरला आहे.

हे दोन्ही संघ २०१२-१३ मध्ये अंतिम फेरीत समोरासमोर आले होते. त्यात मुंबईने सौराष्ट्रला एक डाव व १२५ धावांनी पराभूत करीत ४० वा किताब नावावर केला होता.

 

रणजीच्या ८२ वर्षांच्या इतिहासात मुंबईने ४० वेळा किताब नावावर केला आहे. चार वेळा ते उपविजेते राहिले आहेत. मुंबई १९९१ नंतर खेळलेल्या दहा अंतिम सामन्यांत एकदाही हरलेली नाही. मुंबईची मदार ही फलंदाजांवर असेल. श्रेयस

प्रतिस्पर्धी संघ –

मुंबई : आदित्य तारे (कर्णधार-यष्टीरक्षक), सुर्यकुमार यादव, अभिषेक नायर, अखिल हेरवाडकर, श्रेयस अय्यर, निखिल पाटील, शार्दुल ठाकुर, सिद्धेश लाड, धवल कुलकर्णी, विशाल दाभोलकर, इक्बाल अब्दुल्ला, बद्रे आलम, भाविन ठक्कर, सुफियान शेख, बलविंदर सिंग संधु.

सौराष्ट्र : जयदेव शहा (कर्णधार), शेल्डन जॅक्सन, अवि बारोत, चेतेश्वर पुजारा, चिराग जानी, जयदेव उनादकट, प्रेरक मनजाद, कमलेश मकवाना, धर्मेंद्रसिंह जडेजा, वंदित जीवराजानी, अर्पित वासवदा, दिपक पुनिया, हार्दिक राठोड, मोहसिन दोडिया, सागर जोगियानी (यष्टीरक्षक).

 

February 26, 2016 in क्रीडा