
मुंबई, दि. १८ – बँकाकमध्ये झालेल्या शक्तीशाली बाँबस्फोटातून अभिनेते रितेश व जेनेलिया देशमुख थोडक्यात बचावले आहेत.
ज्या मंदिराजवळ हा स्फोट झाला त्यावेळी ते दोघे तेथून अवघ्या काही अंतरावर असलेल्या मॉलमध्ये होते. जेनेलियाने या स्फोटाची माहिती देतानाच आपण सुरक्षित असल्याचेही म्हटले.
‘ आम्ही सध्या ज्या मॉलमध्ये आहोत त्यासमोर बाँबस्फोट झाला आहे. मदत कार्यासाठी आलेल्या यंत्रणांच्या सायरनचे आवाज इथे स्पष्ट ऐकू येत आहेत. इथे (मॉलमध्ये) आम्ही सुरक्षित असलो तरी या स्फोटात ज्यांना प्राण गमवावे लागले त्यांच्याबद्दल खूप दु:ख होत आहे’ असे ट्विट जेनेलियाने केले आहे.
काल संध्याकाळी हिंदू मंदिर एरावनच्या बाहेर झालेल्या या स्फोटात २७ ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. ब्रह्माचे हे मंदिर बाजारपेठेतून जाणा-या मुख्य रस्त्यावर असून त्याच्या भोवती तीन मुख्य शॉपिंग मॉल्स आहेत. त्यापैकी एका मॉलमध्येच रितेश -जेनेलिया शॉपिंग करत होते.
Archive for August 18th, 2015
0
स्फोटातून रितेश-जेनेलिया थोडक्यात बचावले
0
सुप्रीम कोर्ट बॉम्बने उडवण्याची धमकी

नवी दिल्ली – सुप्रीम कोर्ट बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल कोर्टाला मिळाल्याचे वृत्त असून या ई-मेलनंतर सुप्रीम कोर्टाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव इंटर्न वकीलांना कोर्टरूममध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
‘एनडीटीव्ही’ने सू्त्रांच्या हवाल्याने याबाबत वृत्त दिले आहे. हा मेल गेल्या आठवड्यात आला आहे. याबाबत दिल्ली पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांना सुरक्षेचा फेरआढावा घेतानाच जादा फौजफाटा कोर्टाच्या इमारतीभोवती तैनात केला आहे. याआधी सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश दीपक मिश्र यांना ७ ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्तीने चिठ्ठीद्वारे धमकी दिली होती. मिश्र यांच्या बंगल्याच्या मागच्या बाजूस सुरक्षा रक्षकाला हिंदीत लिहिलेली चिठ्ठी आढळली होती. ‘आपल्याभोवती सुरक्षा व्यवस्था असली तरी आम्ही तुम्हाला संपवू’, अशा आशयाचा मजकूर या चिठ्ठीत लिहिण्यात आला होता. गंभीर बाब म्हणजे १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी याकूब मेमनच्या फाशीवर सुप्रीम कोर्टाच्या ज्या पॅनलने अंतिम निर्णय दिला त्यात मिश्र यांचाही समावेश होता. मिश्र यांच्या पॅनलने ३० जुलै रोजी याकूबच्या फाशीला स्थगिती देण्यास नकार दिला होता. या निकालानंतरच मिश्र यांना धमकीची चिठ्ठी आली होती. या चिठ्ठीनंतर मिश्र यांच्याबरोबरच याकूब प्रकरण हाताळणाऱ्या सर्व न्यायाधीशांच्या सुरक्षेचा दिल्ली पोलिसांनी आढावा घेतला होता.
पुरंदरेंना हात लागला तर तांडव : राज ठाकरे
मुंबई – ‘याद राखा, बाबासाहेब पुरंदरे यांना हात जरी लागला तरी महाराष्ट्रात तांडव करेन’, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला. बाबासाहेबांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्यास विरोध करण्यामागे शरद पवार आणि भाजपमधील काही मंत्र्यांचं गलिच्छ राजकारण आहे, असा आरोपही राज यांनी केला.
बाबासाहेब पुरंदरे यांना उद्या राजभवनात छोटेखानी समारंभात ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पुरंदरे यांना हा पुरस्कार देण्यास अनेक संघटनांनी केलेला विरोध तसेच पुरस्कार वितरण सोहळा उधळून लावण्याची दिलेली धमकी या पार्श्वभूमीवर राज यांनी आज मैदानात उतरत पुरंदरेविरोधकांना ‘आवाज’ दिला.
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजपमधीलच काही मंत्र्यांनी मिळून हे सगळं कुभांड रचलं आहे. मला फडणवीस यांची बाजू घ्यायची नाही मात्र ते खुर्चीवर बसल्यापासूनच हे राजकारण सुरू झाले आहे. पवारांना भाजपमधील कोण कोण सामिल आहेत ते मला महित आहेत पण मी त्यांची नावे सांगणार नाही. फडणवीस ज्युनियर आहेत. ब्राम्हण आहेत. म्हणूनच हे जातीचं राजकारण चाललंय. पवारच विष कालवण्याचे काम करत आहेत’, अशी तोफ राज यांनी डागली.
बाबासाहेबांच्या शिवचरित्रात जिजाऊंचा अपमान झाल्याचा साक्षात्कार आता ५० वर्षांनतर कसा काय झाला?, असा सवाल राज यांनी केला. शरद पवार यांनी बाबासाहेबांचा सत्कार केला होता. आत्ता आत्ता महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतरही पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांनी त्यांचं अभिनंदन केलं. अजित पवारही त्यांचा आदर करतात. मग आता अचानक हे घुमजाव कशासाठी?, असा सवालही राज यानी विचारला. केवळ एखाद्या वाक्यासाठी संपूर्ण शिवचरित्रावर आक्षेप घेणे योग्य नाही. त्यातही जे आक्षेप आहेत त्यावर खुली चर्चा होऊ शकते. त्यासाठी एवढा गदारोळ माजवण्याची गरज नाही, असे राज यांनी ठणकावले. राज यांनी कृष्णनीतीचाही यावेळी दाखला दिला. कृष्णाच्या १६ हजार बायका होत्या यावर चर्चा करत बसायचं की कृष्णनीतीचं आचरण करायचं?, असा सवाल राज यांनी केला.
जितेंद्र आव्हाड यांचाही राज यांनी समाचार घेतला. पवारांच्या गलिच्छ राजकारणामुळेच जितेंद्र आव्हाड यांच्यात एवढं बोलण्याची हिम्मत आली आहे. पवारांनीच आव्हाड यांना फूस लावली आहे, असा आरोप राज यांनी केला. माझ्या आजोबांच्या पुस्तकातील दाखले आव्हाडांनी देऊ नयेत, असेही राज यांनी सुनावले.
नेमाडे यांच्यावरही टीका
पुरंदरे यांना पुरस्कार देण्यास विरोध करणारे ज्ञानपीठप्राप्त भालचंद्र नेमाडे यांच्यावरही राज यांनी टीका केली. ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर कसं वागावं याचे धडे नेमाडेंनी कुसुमाग्रज वा विंदांच्या आचरणातून घ्यायला हवेत, असा टोला राज यांनी लगावला. नेमाडे यांना ज्ञानपीठ देण्यासही विरोध झाला होता तरीही त्यांनी तो पुरस्कार स्वीकारलाच ना, असा मुद्दाही राज यांनी उपस्थित केला.
0
केतन आंबेडकरी कवितेतील ‘सॉक्रेटीस’
यवतमाळकरांची मार्शलला भावपूर्ण श्रद्धांजली
यवतमाळ दि. १८ – विलक्षण प्रतिभा असलेले केतन पिंपळापुरे यांची साहित्य निर्मिती जागतिक साहित्याच्या दालनात झेपावत होती. ‘हेमलॉक’ हा कवितासंग्रह त्यांच्या जगण्याची भीषणता चितारणारा होता. सत्याचे कडू घोट घेत त्यांनी ‘नोबल ट्रूथ’ वैश्विक उंचीचा सृजनात्मक अविष्कार घडविला. आंबेडकरी साहित्यात नवे सौंदर्यशास्त्र जन्मास घालणारा केतन आंबेडकरी कवितेतील ‘सॉक्रेटीस’ होय, अशा शब्दात यवतमाळकरांनी मार्शलला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
स्थानिक लॉर्ड बुद्धा टीव्ही कार्यालयात समता सैनिक दलाच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी डॉ. सूरज ढाले तर प्रमुख अतिथी म्हणून महाकवी वामनदादा कर्डक महाकाव्याचे चरित्रकार डॉ. सागर जाधव, चित्रकार बळी खैरे उपस्थित होते. आपल्या विलक्षण काव्यप्रतिभेने केतन पिंपळापुरे यांनी मराठी साहित्याचे अंतरंग ढवळून काढले. श्रद्धांजली सभेत केतन पिंपळापुरे यांच्या चौफेर लेखन व कार्यकर्तुत्वाच्या शैलीवर उपस्थितांनी प्रकाश टाकला. डॉ. सागर जाधव म्हणाले की, कार्यकर्ता, आंदोलक म्हणून केतनने सर्व आघाड्यांवर रणशिंग फुंकले होते. आंबेडकरी अस्मितेचा धगधगता ज्वालामुखी म्हणून समता सैनिक दलाची कमान आपल्या खांद्यावर घेतली होती. ‘सूर्यकंकण’ हाताशी बांधून व्यवस्थेच्या तटबंधीला घाम फोडत धावत निघालेली केतनची कविता प्रबुद्ध जगाचे नेतृत्व करणारी होती. एका योद्ध्याची कणखर भूमिका ती बजावत होती. चळवळीचा सेनापती म्हणून आपल्या घरादाराची पर्वा न करता त्यांनी आंबेडकरी आंदोलन गतिमान केले. समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा, भारतीय रिपब्लिकन पक्ष या मातृसंस्थांना समर्पित होऊन कार्य करणे आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना जपणे, हीच केतनला खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन डॉ. जाधव यांनी केले. सोबतच बळी खैरे, डॉ. सूरज ढाले, प्रा. प्रकाश दातार, कवी विनोद बुरबुरे, भास्कर चव्हाण, डॉ. अशोक कांबळे, मन्सूर एजाज जोश, प्रा. सिद्धार्थ भगत, योगानंद टेंभुर्णे आदींनी केतन पिंपळापुरे यांच्यातील कवी, आंदोलक, पत्रकार, चित्रकार, शिल्पकार, विचारवंत आदी पैलूंवर विचार व्यक्त करीत आठवणींना उजाळा दिला. संचालन जगदिश भगत यांनी तर आभार विलास नरांजे यांनी मानले. सभेला समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक नरेश ताकसांडे, पद्माकर घायवान, विजय वासनिक, विजय तोडेकर, देवानंद भगत, सूरज पाटील, राहुल पाते, गौतम कांबळे, चंद्रबोधी घायवटे, शांतरक्षित गावंडे, प्रा. नीलेश भगत, विजयकुमार गाडगे यांच्यासह सर्वच क्षेत्रातील यवतमाळकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.










