
मुंबई/पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्चमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत राज्याचा एकूण निकाल ९१.४६ टक्के लागला आहे. पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मंडळाकडून ही माहिती देण्यात आली.
नेहमीप्रमाणे यंदाही कोकण विभागाचे सलग चौथ्या वर्षी पहिला क्रमांक पटकावला आहे. या परिक्षेत मुलींनीच बाजी मारली असून तब्बल ९२.९४ टक्के मुली तर ९०.१८ टक्के मुले दहावीच्या परीक्षेत यशस्वी झाली आहेत. राज्याचा एकूण निकाल ९१.४६ टक्के लागला आहे. गेल्या वर्षी राज्याचा एकूण निकाल ८८.३२ टक्के लागला होता. गेल्या चार वर्षापासून दहावीच्या निकालात निर्माण केलेला ‘कोकण पॅटर्न’चा दबदबा यंदाही कायम असून बारावीप्रमाणे दहावीतही कोकण विभागाने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. सर्वाधिक निकालाचा मान राज्यात कोकण विभागाने (९६.५४ टक्के) मिळवला तर लातूर विभागाचा सर्वात कमी ८६.३८ टक्के निकाल लागला.राज्यात ४७३१ शाळांचा निकाल १०० टक्के लागला असून २१ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल ८७.४६ टक्के लागला. यंदा मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतून १७ लाख ३२ हजार ८९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
Archive for June 8th, 2015
0
दहावीचा निकाल जाहीर
0
पालघरजवळ भीषण अपघातात, चार महिलांचा मृत्यू

मुंबई- अहमदाबाद महामार्गावर सोमवारी पहाटे टाटा मॅजिक आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघात चार महिलांचा मृत्यू झाला.
पालघर येथील नवझे गावातील एका गरोदर महिलेच्या पोटात दुखू लागल्यामुळे तिला तात्काळ उपचारासाठी टाटा मॅजिक रिक्षातून रुग्णालयात नेण्यात येत होते. त्यावेळी चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने रिक्षा वरई रस्त्यावरील गुंदावे येथे रस्त्याकडेला उभ्या असलेल्या रेतीच्या ट्रकवर जाऊन आदळली. पहाटे साडेतीनच्या सुमारास झालेल्या या अपघातात गर्भवती महिलेसह अन्य तीन महिलांचा मृत्यू झाला.भारती भरत पाटील (आशा), भानुमती भाऊ लाबड, संगीता कल्पेश चिमडा आणि यमुना उध-या दोड अशी या अपघातात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत.
0
चित्त थरारक स्टंट
यवतमाळ – येथील ब्रदर्स एट आर्म्स या तरुणांच्या ग्रुप ने रविवारी दिनांक ७ जून रोजी नन्दूरकर महाविद्यालयाच्या मैदानावर यवतमालकरांसाठी बाइक्स वरील चित्त थरारक स्टंट सादर केले हे स्टंट बघण्यासाठी शहरातील मोठ्या प्रमाणात युवक आणि युवतींनी येथे गर्दी केली होती राहुल राठोड तसेच आकाश गणवीर यांनी हे स्टंट सादर केले। छायाचित्र अनिकेत भागवते










