पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for June, 2015

कुलरचा शॉक लागून बालकाचा मृत्यू 0

कुलरचा शॉक लागून बालकाचा मृत्यू

2015-04-15-Electrocution-300x263_ns
यवतमाळ, दि. १ – कुलरला स्पर्श झाल्याने शॉक लागल्याने बालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी दुपारी २ वाजता शिरभाते प्लॉट येथे उघडकीस आली. यशांत कैलास नगराळे (५) रा. शिरभाते प्लॉट यवतमाळ असे मृत बालकाचे नाव आहे. आज दुपारी तो आपल्या घरी खेळत होता. अशातच त्याचा कुलरला स्पर्श झाल्याने तो बेशुद्घ पडला होता. ही बाब लक्षात येताच त्याच्या कुटुंबीयांनी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी यशांतला मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.

 

June 01, 2015 in विदर्भ
क्रिकेट खेळण्यावरून मारहाण , १२ जणांविरुद्घ गुन्हे 0

क्रिकेट खेळण्यावरून मारहाण , १२ जणांविरुद्घ गुन्हे

images
यवतमाळ, दि. १ – क्रिकेट खेळण्यावरून पराभव होण्याच्या मार्गावर असलेल्या खेळाडूंनी विजयी होणाºया संघातील खेळाडूंना मारहाण केल्याची घटना रविवारी पोस्टल मैदानात ही घटना घडली. रविवारी येथील पोस्टल मैदानावर क्रिकेट सामन्याचे आयोजन केले होते. सायंकाळी शिवनेरी व एस.आर.सी.सी. संघामध्ये सामना सुरू होता. अशातच शिवनेरी संघ विजयी होण्याच्या मार्गावर होता. त्यामुळे चिडून एसआरसीसी संघाचे खेळाडू मोहसीन, सोहेल देशमुख, शान अहेमद, सहेजाद, हर्षल, नकीब, शकीब राज, शारीक, रेहान, जुबेर, नसीम व अन्य दोन सर्व रा. कळंब चौक यानी शिवनेरी संघाचे आकाश सुरेश सोगे (२३) रा. सत्यनारायण ले आऊट व अन्य खेळाडूसोबत वाद केला. त्यानंतर बॅट व स्टम्पने बेदम मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेने पोस्टल मैदानावर खेळाडू सैरावैरा पळाले. या घटनेने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच आरोपी खेळाडू तेथून पसार झाले. घटनेनंतर पोलिस ठाण्यातही जमावाने गर्दी केली होती. आकाश सोगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपीविरूद्घ एसआरसीसी संघाच्या १२ ही खेळाडूविरुद्घ भादंवि कलम १४३, १४७,१४८, १९९, ३२३,५०४,५०७ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

गुरु मंदिराच्या देणगीत ३७ कोटींचा अपहार 0

गुरु मंदिराच्या देणगीत ३७ कोटींचा अपहार

gurumandir-vashim-300x144
वाशिम – कारंजा लाड येथील श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिराच्या विश्‍वस्तांनी संगनमत करून कोट्यवधी रुपयांच्या देणगीचा अपहार केल्याची तक्रार शेखर पुरुषोत्तम काण्णव यांनी रविवारला कारंजा शहर पोलिसांकडे केली आहे. या तक्रारीवरून पोलीसांनी विश्‍वस्तांसह नऊ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
शेखर काण्णव यांनी दिलेल्या तक्रारीत असे नमूद केले आहे, की कारंजा येथील राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिराच्या विश्‍वस्तांनी सन २०००-२००१ ते सन २०१०- २०११ या १० वर्षांच्या कालावधीत संगनमत करून संस्थानला देणगी स्वरूपात मिळालेल्या पैशांचा बनावट लेखा अहवाल तयार केला. तसेच सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयात खोटे व बनावट लेखा अहवाल दाखल करून अंदाजे ३६ कोटी ३७ लाख ७९ हजार ८३३ रुपयांची अफरातफर केली आहे. कारंजा शहर पोलिसांनी तक्रारीवरून नारायण गणपत खेडकर (८०), वसंत महादेव सस्तकर (७७), उमाकांत पुरुषोत्तम पांडे (७०), दिगांबर राजाराम बर्डे (८०), विनायक दिगांबर सोनटक्के (६५), श्रीपाद यशवंत पळसोकर, प्रकाश वसंत घुडे सर्व रा. कारंजा, सुभाष विनायक मुंगी (लेखापरीक्षक) रा. अकोला व संजय एस. खांडेकर (सनदी लेखापाल) रा. अमरावती यांच्याविरुद्ध अपराध नं. ७२/१५ भादंविच्या कलम ४२०, ४६५, ४६८, ४०८, ४७१, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
कारंजा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुंभार, पोलीस हेडकॉन्स्टेबल शैलेश महाजन, शिपाई नीलेश जयसिंगवार व गणेश जाधव हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

June 01, 2015 in मुख्य पान
सचिन, सौरव, लक्ष्मण बीसीसीआयच्या सल्लागार समितीत 0

सचिन, सौरव, लक्ष्मण बीसीसीआयच्या सल्लागार समितीत

bcci-logo
नवी दिल्ली – भारताचे महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार सौरव गांगुली आणि शैलीदार फलंदाज व्ही.व्ही.एस लक्ष्मण लवकरच आपल्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये सल्लागाराच्या नव्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत.
भारतात क्रिकेटच्या विकासासाठी बीसीसीआयने तयार केलेल्या उच्चस्तरीय सल्लागार समितीमध्ये या तिघांचा समावेश करण्यात आला आहे. हे तिघेही जण बीसीसीआयला क्रिकेटशी संबंधित विषयामध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी टि्वटरवरुन ही माहिती दिली. बीसीसीआय अध्यक्ष जनमोहन दालमिया आणि अनुराग ठाकूर या त्रिसदस्यीय समितीशी चर्चा केल्यानंतरच भारतीय क्रिकेटशी संबंधित महत्वपूर्ण निर्णय घेतील अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
सौरव गांगुलीला भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले जाईल अशी जोरदार चर्चा होती. मात्र गांगुलीचा सल्लागार समितीमध्ये समावेश झाल्याने, रवी शास्त्री संघ संचालकपदावर कायम रहातील अशी शक्यता आहे.
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक नियुक्त करताना तसेच देशांतर्गत क्रिकेटचा दर्जा सुधारण्यामध्ये या समितीची भूमिका महत्वाची असेल. संघ आणि बोर्डामध्ये ही समिती समन्वय ठेवण्याचेही काम करेल.

 

June 01, 2015 in क्रीडा