युवक कॉंग्रेसच्या लोकसभा क्षेत्रीय अध्यक्षपदी राहुल ठाकरे
युवक कॉंग्रेस निवडणूक
यतवमाळ – यवतमाळ-वाशीम लोकसभा क्षेत्रात आज शुक्रवारी पार पडलेल्या युवक कॉंग्रेस पदाधिकाºयांच्या निवडणुकीत पुनश्च राहुल ठाकरे विराजमान झाले़ तब्बल १ हजार ४४ बुथस्तरीय युवक मतदारांनी ठाकरे यांना भरीव मते देत आपली पसंती दिली़
कॉंग्रेसमध्ये लोकशाही रुजावी म्हणून राहुल गांधी यांनी युवक कॉंग्रेसच्या पदाधिकाºयांची निवड निवडणुकीद्वारे करण्याचा पायंडा पाडला आहे़ त्या पार्श्वभूमीवर आज यवतमाळ-वाशीम लोकसभा क्षेत्रीय युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीचे मतदान घेण्यात आले़ राहुल ठाकरे यांना पुनश्च ४४० बुथस्तरीय युवक मतदारांनी आपली मते दिल्याने ते अध्यक्षपदी विराजमान झाले़ वाशीम येथील गजानन भगत यांना १६० मते पडली असून, ते युवक कॉंग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवडले गेले आहे़ यवतमाळातील अॅड़ रोहीत देशमुख यांना तिसºया पसंतीची १३५ मते पडल्याने लोकसभा क्षेत्राच्या महासचिवपदी ते निवडले गेले आहे़ मंगरुळपीर येथील श्रीहरी इंगोले यांना ८१, अनुसूचित जाती प्रवर्गातून नितीन गुघाने यांना ७५, वैभव जवादे ३५ तर मोहदा येथील रिजवान शेख यांना अल्पसंख्यांकाच्या प्रवर्गातून ३३ मते मिळाल्याने या सर्वांना युवक कॉंग्रेसचे सरचिटणीसपदी विराजमान होता आले़
Archive for January 31st, 2014
युवक कॉंग्रेसच्या लोकसभा क्षेत्रीय अध्यक्षपदी राहुल ठाकरे
युवतीचा विवाह मोडण्याचा प्रयत्न
युवतीचा विवाह मोडण्याचा प्रयत्न
तथाकथीत प्रियकराविरूद्घ गुन्हा
नेर – तालुक्यातील बाणगाव येथील एका युवतीचा विवाह मोडण्याचा प्रयत्न तथाकथीत प्रियकराकडून केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. तीच्या भावी पतीसोबत संपर्क साधून सदर मुलीसोबत माझे प्रेम असून ती माझी बायको होणार आहे अशी बतावणी केली. पोलिस ह्या तथाकथीत प्रियकराचा शोध घेत आहे.
बाणगाव येथील एका युवतीला बघण्यासाठी अकोला जिल्ह्यातील पातुर येथील दिनेश नामक युवक आला होता. सदर युवती पसंत आल्याचे सांगून तो आपल्या गावी परत गेला. दरम्यान काल गुरुवारी एका तथाकथीत प्रियकराने दिनेशला फोन करून माझे त्या युवतीसोबत माझे प्रेमप्रकरण सुरु असून ती माझी पत्नी आहे. तु तीच्यासोबत लग्न केले तर चांगले होणार नाही. तीचे वडील दारु पिणारे व जुगारी असून सदर सबंध मोडून टाका अशी धमकी दिली. दरम्यान आज दिनेशच्या कुटुंबीयानी हा प्रकार युवतीच्या वडीलांना सांगितला. याप्रकरणी नेर पोलिसांनी तथाकथीत प्रियकराविरूद्घ भादंवि कलम ५०९,६६ (अ), ६६ (ड) अंतर्गत गुन्हा दाखल केला. अधिक तपास प्रभारी ठाणेदार दिलीप वडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार शालीक लडके करीत आहे. या प्रकाराने युवतीची प्रकृती बिघडली असून आरोपीचा शोध घेऊन अटक करा अशी मागणी नागरिकांनी केली.
आरोपीस तीन वर्ष सक्तमजुरी
प्राणघातक हल्ला;आरोपीस तीन वर्ष सक्तमजुरी
पांढरकवडा – झरी तालुक्यातील खरबडा येथील व्यक्तीवर प्राणघातक हल्ला करणाºया एका आरोपीला तीन वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. पांढरकवडा येथील सत्र न्यायाधिश पी. एम. दुनेवार यांनी आज हा निकाल दिला.
संतोष नरसिंग जागरतवार रा. खरबडा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. १२ आॅगस्ट २००७ रोजी सकाळी ९.३० वाजताचे दरम्यान आरोपी संतोष व त्याचे वडील नरसिंग जागरतवार हे दोघे बैलबंडीने जात होते. अशातच शेख फकीर महंमद यांचे घराचे भिंतीला लागून बैल गाडी गेल्याने त्याच्यात वाद निर्माण झाला. यावेळी संतोषने शेख फकीर यांना मारहाण केली व त्याचे वडील नरसिंग याने मारहाण करण्यास चिथावनी दिली. यामध्ये शेख याना गंभीर दुखापत होऊन ते कोमात गेले होते. याप्रकरणी पाटण पोलिसांनी आरोपीविरुद्घ भादंवि कलम ३०७, ५०६,५०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. पांढरकवडा येथील सत्र न्यायाधिश पी. एम. दुनेवार यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने एकुण १० साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाचे साक्ष पुरावा व युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी संतोष यास दोषी मानुन भादविचे कलम ३२५ अंतर्गत तीन वर्ष सक्तमजुरी व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी अभियोक्ता प्रशांत मानकर यांनी काम पाहिले.
महिलेचा मृतदेह आढळला
महिलेचा मृतदेह आढळला
घातपाताची शक्यता
पांढरकवडा – पाटणबोरी येथील शर्मा नगरातील महिलेचा स्वत:च्या घरामागेच रक्ताच्या थारोळ््यात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून घातपात झाल्याची चर्चा आहे.
वाणी सुभाष गांजुलवार (३०) रा. शर्मा नगर असे मृतकचे नाव आहे. तीचे पती सुभाष खुशाल गांगुलवार (३५) हे राजीव विद्यालय कारेगाव पारंबा येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. सुभाष व वाणी ह्यांचा विवाह ११ वर्षापूर्वी झाला असून मृतकचे माहेर पाटण येथील आईटवार कुटुंबात आहे. दरम्यान आज सकाळी स्वत:च्या घरामागेच रक्ताच्या थारोळ््यात या महिलेचा मृतदेह आढळला. या महिलेला सकाळी घरी काम करतांना शेजारच्यांनी पाहिले असून सकाळी ८ ते ८.३० वाजताच्या दरम्यान ही घटना घडल्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मिळताच पाटणबोरी चौकी व पांढरकवडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून घातपात झाल्याची शक्यता वर्तवली आहे. गांजुलवार यांना १० वर्षाची मुलगी व ८ वर्षाचा मुलगा असून त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली असून हळहळ व्यकत होत आहे.
२४ पोलीस अधिकाºयांवर बदलीचे गंडातर
२४ पोलीस अधिकाºयांवर बदलीचे गंडातर
निवडणूक आयोगाचा दणका
यवतमाळ
दि. ३१ (स्थानिक प्रतिनिधी)
…………………………..
लोकसभा निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर निवडणूक आयोगाकडून आलेल्या परिपत्रकानुसार जिल्ह्यातील तीन वर्षे पूर्ण झालेल्या पोलिस अधिकाºयांच्या बदल्या कराव्या लागणार आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशाने जिल्ह्यातील २४ पोलीस अधिकाºयांवर बदलीचे गंडातर आले आहे.
आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पोलिसांसाठी एक परिपत्रक जाहिर केले. त्यामध्ये म्हटले आहे की, गृह (स्वत:च्या) जिल्ह्यात नियुक्तीस असलेले आणि ३१ मे २०१४ रोजी एका जिल्ह्यात तीन वर्षे पूर्ण झालेल्या अधिकाºयायांची जिल्हाबाहेर बदली करावी. त्यानुसार माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात यानुसार बदल्या झाल्यास सुमारे १६ पोलीस निरीक्षक व ८ सहा. पोलीस निरीक्षक जिल्ह्याबाहेर बदलून जाण्याची शक्यता आहे. या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावला जात असल्याचे काही अधिकाºयांचे म्हणणे आहे. त्यांच्या मतानुसार एक पोलिस ठाणे म्हणजे एक पद गृहित धरले जावे. एका पदावर तीन वर्षे पूर्ण झाली असतील, तर बदली करावी. त्यांना जिल्ह्याबाहेर बदलता कामा नये. असे झाले तरी या अधिकाºयांनी आणखी एक भीती व्यक्त केली आहे. ती म्हणजे अशा पद्धतीने बदल्या झाल्या तर गोंधळ उडणार आहे. त्या भागाची माहिती झालेले अधिकारी बदलून गेल्याने नव्या अधिकाºयांना तेथे माहिती घेऊन काम करणे कठीण जाणार आहे. त्याचा परिणाम कायदा व सुव्यवस्थेवर होऊ शकतो. अशा बदल्या करायच्या असतील तर त्या किमान एक वर्षे आधी केल्या जाव्यात, अशीही अधिकाºयांची अपेक्षा आहे.सध्या पोलिस अधिकाºयांमध्ये याच एका विषयाची चर्चा सुरू आहे. लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्याने पूर्व तयारी म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई आणि गोपनीय माहिती काढण्याचे काम केले जाते. मात्र, आपली बदली होणार आहे, तर कशाला पूर्व तयारी करा, अशा भावनेतून अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. याचा परिणाम निवडणूक काळातील कायदा व सुव्यवस्थेवर होऊ शकतो. राज्य सरकारने ठरविलेल्या धोरणानुसार कनिष्ठ अधिकाºयांच्या बदल्यांचे अधिकार पोलिस महासंचालकांना आहेत. त्यामुळे या बदल्यांचा प्रस्ताव महासंचालक तयार करून तो अंतिम मंजुरीसाठी सरकारकडे पाठवितील. केंद्रीय निवडणूक आयोगाचे परिपत्रक आले आहे. त्यानुसार जिल्ह्यात तीन वर्षे पूर्ण होणाºया अधिकाºयांची माहिती मागविली आहे. १५ फेबु्रवारीपूर्वी पोलिस निरीक्षक, सहा. पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्या करून अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवावा अशा सुचनाही दिल्या आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशाने जिल्ह्यातील २४ पोलीस अधिकाºयांवर बदलीचे गंडातर आले आहे.
प्रशासकीय अधिका-यांची एकाच ठिकाणी दोन वर्षे नियुक्ती
प्रशासकीय अधिका-यांची एकाच ठिकाणी दोन वर्षे नियुक्ती
नवी दिल्ली : प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामातील राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी आएएस, आयपीएस आणि आयएफओएस या तिन्ही सेवांमधील अधिकाऱ्यांना यापुढे एकाच ठिकाणी दोन वर्षे काम करणे बंधनकारक केले आहे. तसेच दोन वर्षांपूर्वी बदली आणि नियुक्ती राज्य सरकारने नियुक्त केलेल्या नागरी सेवा मंडळामार्फत केल्या जातील, असे केंद्र सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीत स्पष्ट केले आहे.
पर्सनल आणि ट्रेनिंग मंत्रालयाने याबाबत सर्व विभागांना परिपत्रक पाठविले आहे. बदली अथवा बढती किंवा निवृत्ती किंवा राज्याबाहेर नियुक्ती अथवा दोन महिन्यांपेक्षा अधिक काळासाठी प्रशिक्षणासाठी न पाठविल्यास कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्यास त्याला नियुक्त केलेल्या पदावर दोन वर्षे काम करता येणार आहे. दोन वर्षांच्या आत अधिकाऱ्याची बदली करायची झाल्यास केंद्र किंवा राज्य सरकारला नागरी सेवा मंडळाची शिफारस आवश्यक आहे. यासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली असे मंडळ स्थापन करावे लागणार आहे.मात्र, कारण दाखवून मंडळाची शिफारस नाकारण्याचा अधिकारही दिला आहे. पोलिस सेवांसाठी या मंडळात गृह खात्याचे सचिव आणि पोलिस महासंचालकांचा समावेश असेल.
मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह याचा राजीनामा
मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह याचा राजीनामा
मुंबई- मुंबईचे पोलिस आयुक्त सत्यपाल सिंह याचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी शुक्रवारी सांगितले. नव्या आयुक्तांची नियुक्ती होईपर्यंत हेंमत नगराळे यांच्याकडे तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे.
सिंह हे पुढील वर्षी निवृत्त होणार होते. मात्र येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून उभे राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिला आहे.१९८०च्या तुकडीचे आयपीएस अधिकारी असलेले सिंह यांनी गुरुवारी राज्य गृह मंत्रालयाकडे राजीनामा सोपवला. तेथून सिंह यांचा राजीनामा मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे.सिंह हे मुंबई किंवा त्यांचे मूळ राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. सिंह यांना भारतीय जनता पक्ष आणि आम आदमी पक्षाकडून लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
न्यूझीलंडने मालिका ४-० ने जिंकली
न्यूझीलंडने मालिका ४-० ने जिंकली
वेलिंग्टन – दक्षिणआफ्रिके पाठोपाठ न्यूझीलंडमध्येही भारतीय संघाचा धुव्वा उडाला आहे. अखेरचा एकदिवसीय सामना ८७ धावांनी जिंकून न्यूझीलंडने मालिकेत ४-० असे निर्भेळ यश मिळवले.
न्यूझीलंडच्या ३०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव २१६ धावांवर संपुष्टात आला. भारतीय संघाने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही आघाडयांवर सपशेल निराशा केली. विराट कोहली (८२) आणि कर्णधार महेंद्रसिंह ढोणी (४७) वगळता अन्य फलंदाजांनी न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर नांगी टाकली. न्यूझीलंडकडून एमजे हेनरीने सर्वाधिक चार गडी बाद केले. त्याला केन विल्यमसन आणि मिल्सने प्रत्येकी दोन गडी बाद करुन चांगली साथ दिली. भारतीय गोलंदाजांनी धावा उधळल्यानंतर निदान फलंदाज तरी प्रतिकार करतील अशी अपेक्षा होती. मात्र फलंदाजांनीही गुडघे टेकले.या मालिकेतील तिसरा सामना वगळता एकाही सामन्यात भारतीय संघाला आपली कामगिरी उंचावता आली नाही. भारताने आधीच मालिका गमावल्यामुळे हा सामना फार महत्वाचा नव्हता मात्र प्रतिष्ठा वाचवण्यासाठी तर भारत हा सामना जिंकेल अशी अपेक्षा होती.तत्पूर्वी मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी ३०४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. रॉस टेलरने (१०२) मालिकेतील सलग दुसरे शतक झळकवताना केन विल्यमसन (८८) सोबत तिस-या गडयासाठी १५२ धावांची भागीदारी केली. मागच्या सामन्याप्रमाणे याही लढतीत केन विल्यमसन आणि रॉस टेलरने भारतीय गोलंदाजीची हवा काढून टाकली. मार्टीन गुप्टिल आणि जेसी रायडर झटपट बाद झाल्यानंतर टेलर आणि विल्यमसन जोडीने सामन्याची सारी सूत्रे आपल्या हाती घेत न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला.भारतीय गोलंदाजांनी या सामन्यातही सपशेल निराशा केली. न्यूझीलंडच्या फलंदाजांना वेसण घालण्यात भारतीय गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. भारताकडून वरुण अॅरॉनने दोन गडी बाद केले. भुवनेश्वर कुमार, मोहोम्मद शामी आणि विराट कोहलीने प्रत्येकी एक गडी बाद केला.दरम्यान भारताने आज नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने आधीच मालिका गमावल्यामुळे हा सामना फार महत्वाचा नाही मात्र प्रतिष्ठा वाचवण्यासाठी तरी भारताने हा सामना जिंकणे आवश्यक आहे.
उत्तराखंडचे मुख्यमंत्री बहुगुणा यांचा राजीनामा
उत्तराखंडचे मुख्यमंत्री बहुगुणा यांचा राजीनामा
डेहराडून- उत्तराखंडचे मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. पक्षातील वरिष्ठांच्या इच्छेनुसार मी राजीनामा देत असल्याचे बहुगुणा यांनी यावेळी सांगितले. बहुगुणा यांनी राज्यपाल अजीझ कुरेशी यांची भेट घेऊन राजीनामा दिला. तसेच कार्यवाहक प्रदेश अध्यक्ष यशपाल आर्या यांच्याकडेही राजीनामा सोपवला आहे.
बहुगुणा यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागणार याची ब-याच दिवसांपासून चर्चा होती. गेल्या दोन वर्षांपासून उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून ते निष्प्रभ ठरले होते. विजय बहुगुणा यांच्या जागी केंद्रीय मंत्री हरीश रावत, खासदार सतपाल महाराज किंवा ज्येष्ठ मंत्री असलेल्या इंदिरा ह्रदयेश यांची मुख्यमंत्रीपदी निवड होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री हरीश रावत यांचा पत्ता कट झाल्यास ते राज्यातील कॅबिनेट मंत्री प्रीतम सिंह यांच्या नावाची शिफारस करण्याची शक्यता आहे.
‘याहू’चे २७ कोटीहून अधिक ईमेल पासवर्ड हॅक
न्यूयॉर्क- ‘याहू’ संकेतस्थळावरील ईमेलचे यूझरनेम आणि पासवर्ड हॅक झाल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पासवर्ड हॅक झाल्याच्या वृत्ताला याहू कंपनीने दुजोरा दिला असला तरी नेमके किती इमेलचे पासवर्ड हॅक करण्यात आले आहेत त्याबद्दल मात्र याहूने कोणताही माहीती दिली नाही.
गुगलच्या जी-मेलपाठोपाठ ‘याहू’च्या मेल वापरणा-यांचा जगात दुसरा क्रमांक आहे. जगभरात २७ कोटी ३० लाख लोक याहू मेलचा वापर करतात. एकट्या अमेरिकेत आठ कोटी दहा लाख ई-मेलधारक असल्याचे फर्मस्कोर या संस्थेने केलेल्या संशोधनात आढळले आहे. हॅकर्स बनावट मॅसेज पाठवून इमेलचे पासवर्ड हॅक करत असल्याचे निदर्शनास आले आहे.
‘याहू’ने आपल्या अधिकृत ब्लॉगवर याची माहिती दिली. पासवर्ड हॅक केलेल्यांनी ‘याहू’च्या ईमेल अकाऊंटमधील नावे आणि ईमेल आयडी बघितले आहेत. तसेच या अकाऊंटमधून पाठवण्यात आलेले मेल्सही या चोरट्यांनी तपासले आहेत. तसेच ईमेल अकाऊंटधारकांकडून अधिक माहिती मिळवण्यासाठी हे चोरटे बनावट मेल पाठवू शकतात अशी शक्यताही आहे. त्यामुळे कोणत्याही मेलला उत्तर देताना सावधगिरी बाळगावी असे याहूकडून स्पष्ट करण्यात आले आहे.










