
नवी दिल्ली – अल्पवयीन मुलांकडून महिलांवर होणारा अत्याचार, बलात्कारांच्या संख्येत गेल्या काही वर्षात मोठी वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलांकडून महिलांवर होणा-या अत्याचारात १३२ टक्क्यांपर्यत वाढ झाल्याचे अहवालात दिसून येत आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार २०१३मध्ये अल्पवयीन मुलांकडून महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केल्याच्या घटना घडल्या. २०१३ मध्ये अल्पवयीन मुलांकडून महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण १३२.३ टक्के होते तर विनयभंगाच्या घटनांचे प्रमाण ७०.३ टक्के तर बलात्काराच्या ६०.३ टक्के घटना घडल्या. भारतीय दंड विधानानुसार गुन्हेगार ठरवण्यात आलेली ६६.३ टक्के अल्पवयीन मुले ही १६-१८ वयोमर्यादेतील असतात. २०१३ मध्ये ३१ हजार ७२५ विविध गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश होता तर त्याआधी २०१२ मध्ये हेच प्रमाण २७ हजार ९३६ इतके होते. २०१२ च्या तुलनेत २०१३ मध्ये हे प्रमाण १३.६ टक्क्यांनी वाढले. विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या एकूण ४३हजार ५०६ अल्पवयीन मुलांपैकी आठ हजार ३९२ ही अशिक्षित आहेत तर १३ हजार ९८४ मुलांनी केवळ प्राथमिक शिक्षण घेतले आहे.
Archive for August 18th, 2014
0
अल्पवयीन मुलांकडून महिलांवर होणा-या अत्याचारात वाढ
0
फुटबॉल- भारताची विजयी सलामी

गलोर- भारताच्या २३ वर्षाखालील फुटबॉल संघाने मैत्रीपूर्ण मालिकेतील सलामीच्या लढतीत रविवारी पाकिस्तानचा १-० पराभव केला. पहिले सत्र संपायला काही सेकंद बाकी असताना कर्णधार सुनील छेत्रीने केलेला गोल मोलाचा ठरला.
भारताला सामन्यात मिळालेल्या गोलांच्या अनेक संधी पाहता मोठय़ा फरकाने विजय शक्य होता. मात्र भारताचे अन्य फुटबॉलपटू गोल करण्यात अपयशी ठरले. त्यातच ६९व्या मिनिटाला दुस-यांदा पिवळे कार्ड दाखवले गेल्यामुळे रॉबिन सिंगला मैदान सोडावे लागले. त्यामुळे उर्वरित २० मिनिटे १० जणांसह खेळण्याची वेळ यजमानांवर आली. अखेरच्या काही मिनिटांमध्ये कर्णधार कालीमुल्लासह पाकिस्तानलाही गोलच्या दोन संधी होत्या. मात्र भारताच्या बचावपटूंनी अभेद्य बचाव केला. गोलकीपर अमरिंदरनेही काही चांगले ‘सेव्ह’ केले. राल्टे, देसाई यांनीदेखील गोलसाठी काही चांगले प्रयत्न केले.
विजयी प्रारंभासह दोन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली. मालिकेतीव दुसरी लढत बुधवारी बंगलोर स्टेडियमवरच खेळण्यात येणार आहे. पुढील महिन्यात इन्चॉनमध्ये (दक्षिण कोरिया) होणाऱ्या एशियाडची तयारी म्हणून या दोन सामन्यांकडे पाहण्यात येत आहे. त्यातच भारत सुरुवातीपासून पाकिस्तानविरुद्ध विजयाचा दावेदार राहिला आहे. उभय संघांमध्ये येथील लढतीसह आतापर्यंत झालेल्या ३२ सामन्यांमध्ये भारताचे १९ विजय असून पाकिस्तानचे पाच विजय आहेत.
0
पाकिस्तानचा भारताच्या २० चौक्यांवर गोळीबार

जम्मू – पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असून, रविवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील वीस भारतीय चौक्यांवर आणि नागरी वस्त्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात एक गावकरी जखमी झाला आहे.
पाकिस्तानी रेंजर्सनी अर्निया आणि आरएस पूरा सेक्टरमधील भारतीय़ चौक्यांना लक्ष्य केले. पाकिस्तानने स्वयंचलित शस्त्रास्त्रांनी गोळीबार करताना उखळी तोफांचाही मारा केला अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिका-याने दिली. सीमेवर तैनात असणा-या बीएसएफ जवानांनीही स्वयंचलित शस्त्रास्त्रांचा वापर करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. रविवारी रात्री सुरु झालेला गोळीबार सोमवारी सकाळी साडेसहा वाजता थांबला. अतार सिंह हा गावकरी या गोळीबारात जखमी झाला. पाकिस्तानने चौक्यांबरोबर नागरी वसत्यांवरही गोळीबार केला. या वर्षात पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यातील हा सर्वात मोठा हल्ला केला. येत्या २५ ऑगस्टला भारत आणि पाकिस्तानमध्ये परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा होणार आहे. त्यापूर्वी पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. मागच्या दहा दिवसात पाकिस्तानने अकरावेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
0
दहीहंडी उत्सव, ३३ गोविंदा जखमी

मुंबई – दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे रचताना थरांवरुन कोसळून आतापर्यंत मुंबईतील ३३ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यातील ३२ गोविदांना केईएम आणि एका गोविंदाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी गोविंदांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी केईएम, सायन आणि नायर रुग्णालयात विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत.
‘बोल बजरंग बली की जय..अरे बोल बजरंग बली की जय’चा गल्लीबोळात घुमणारा नारा, सलामी दिल्यानंतर किंवा हंडी फोडल्यानंतर डिजेच्या तालावर थिरकरणारी पावले, उंचावर बांधलेली हंडी फोडण्यासाठी थरावर थर रचणारा गोविंदा आणि रस्त्यावर थांबून दहीहंडीचा थरार अनुभवणारे सर्वसामान्य हा सारा माहौल आहे मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीतला.
दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात सुरु आहे. गुरुपौर्णिमेपासून कसून सराव करणारी मंडळे लाखो रुपयांचे लोणी असलेल्या हंड्या फोडण्यासाठी बाहेर पडली आहेत. दहीहंडी उत्सवातील बालगोविदांचा सहभाग आणि लाखो रुपयांच्या बक्षीसांसाठी गोविंदा मंडळांमध्ये सुरु झालेली जीवघेणी स्पर्धा यामुळे यंदाचा दहीहंडी उत्सव वादाच्या भोव-यात सापडला होता.
कोपरी ठाणे पूर्व बाजारपेठेतील दहीहंडी महिला गोविंदा पथकाने फोडली..
मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवावर निर्बंध आणल्यानंतर काही प्रमुख आयोजकांनी आपल्या हंडया रद्द केल्याने यंदा दहीहंडी उत्सव होणार कि, नाही असा प्रश्न निर्माण झाला होता.
सराव करणारे गोविंदाही निराश झाले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्बंधाना वर्षभराची स्थगिती दिल्यानंतर उत्सवावरील अनिश्चिचतेचे सावट दूर झाले. मात्र बारावर्षाखालील मुलांना थरांवर चढवण्यास घातलेली बंदी कायम असून, डीजेच्या दणदणाटावरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. प्रसारमाध्यमांनी गोविंदांच्या सुरक्षेचा मुद्दा लावून धरल्याने यंदा प्रमुख आयोजकांनी गोविंदांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत. काही आयोजक वरच्या थरावर जाणा-या गोविंदांना सेफ्टी बेल्ट, हेल्मेट देणार आहेत. त्यामुळे दरवर्षी पेक्षा यंदा जखमी गोविंदाचे प्रमाण कमी असेल अशी अपेक्षा आहे. ठाण्यातील जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठान, वरळीमधील सचिनभाऊ अहिर यांची संकल्प प्रतिष्ठान आणि राम कदम यांची घाटकोपर येथील दहीहंडी या महत्वाच्या हंड्या समजल्या जातात. या हंड्यांमध्ये गोविदांना विक्रम रचण्याचे आव्हान देऊन लाखो रुपयांच्या बक्षीसांचे आमिष दाखवले जाते. यंदाच्या दहीहंडी उत्सवात सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर पोलिस ठाण्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. याशिवाय गोविंदा पथकांचा उत्साह व मोठय़ा हंड्य़ा पाहण्यासाठी येणा-या नागरिकांची संख्या लक्षात घेता ३० हजार मुंबई पोलिसांसह १२०० होम गार्ड व राज्य राखीव पोलिस दलाच्या चार कंपन्यांचीही मदत घेण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त (ऑपरेशन) संजय बारकुंड यांनी दिली.









