
पालघर – मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शनिवारी सकाळी कारला झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले.
सकाळी साडे अकराच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद मार्गावरील मेदवान खिंड भागात हा अपघात घडला. अपघातात मृत झालेल्या या व्यक्ती एकाच कुटुंबातील होत्या. पुणे शहरातील ते रहिवासी होते. तर गंभीर जखमी झालेल्या व्यक्ती मुंबईतील रहिवासी आहेत.
अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटली नसून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
Archive for May 2nd, 2015
0
अपघातात एकाच कुटुंबातील तीन ठार
0
दाऊदला यायचे होते शरण

नवी दिल्ली – १९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोटानंतर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला शरण यायचे होते असा खळबळजनक खुलासा सीबीआयचे माजी महानिरीक्षक नीरज कुमार यांनी केला आहे.
जून १९९४ मध्ये माझे दाऊदशी तीनवेळा बोलणे झाले. त्याच्या बोलण्यावरुन त्याला शरण यायचे हे जाणवत होते. मात्र जर भारतात परतलो तर त्याच्याविरोधातील गँगस्टर त्याला मारुन टाकतील अशी भिती दाऊदला होती. त्याची सुरक्षा ही सीबीआयची जबाबदारी असेल असेही मी त्याला सांगितले होते. मात्र सीबीआयच्या वरिष्ठ अधिका-यांनी आपल्याला रोखले. त्यामुळे दाऊदशी पुढे बोलणे होऊ शकले नाही असे कुमार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीत सांगितले.दाऊदचा निकटवर्तीय मनीष लालाने नीरज कुमार आणि दाऊदचे बोलणे करवून दिले होते. मनीषने मला सांगितले होते की दाऊद स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी शरण येत बोता असे नीरज कुमार म्हणाले. चार वर्षांनंतर छोटा राजनच्या गँगने मनीष लालाची गोळ्या घालून हत्या केली नीरज कुमार आपल्या पोलीस सेवेतील ३७ वर्षाच्या कारकिर्दीतल टॉप १० तपास प्रकरणांबाबतचे पुस्तक सध्या लिहीत आहेत. दाऊदसोबत झालेल्या संभाषणाचा उल्लेखही या पुस्तकात करण्यात आला आहे. लवकरच हे पुस्तक प्रदर्शित होणार आहे.मुंबईवर १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचा तपास नीरज कुमार करत होते. या बॉम्बस्फोटात २५७ जण ठार झाले तर ७०० हून अधिक जण जखमी झाले होते.
0
शिक्षणक्रांती परिषद ३ मे रोजी

यवतमाळ – प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघाच्या वतीने ३ मे रोजी बचत भवनात एक दिवसीय शिक्षणक्रांती परिषदेचे आयोजन करण्यात आले असून, विविध विषयातून विचार मंथन होणार आहे. या परिषदेचे उद््घाटन डॉ. यशवंत मनोहर करतील. तर डॉ. अशोक पाळवेकर हे अध्यक्षस्थान भूषवतील. स्वागताध्यक्ष अॅड. रामदास राऊत हे आहेत.
सकाळी १० वाजता होणाºया उद््घाटनीय सत्रात मंचावर निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले , डॉ. अनिकेत भडके , महाराष्टÑ राज्य शिक्षक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अरुणकुमार हर्षबोधी ,सं.गा.बा. अमरावती विद्यापिठााचे सिनेट सदस्य डॉ. सुभाष गवई हे मान्यवर उपस्थित असतील. दुपारच्या शैक्षणिक सत्रामध्ये ‘वर्तमान शैक्षणिक धोरणाने समतामुलक, शोषणमुक्त समाज निर्माण शक्य आहे काय’ व ‘शिक्षणक्रांतीसाठी महिलांची भूमिका’ या दोन महत्त्वाच्या विषयावर अशोक बुरबुरे आणि डॉ. लिला भेले भाष्य करतील. अध्यक्ष म्हणून डॉ. सुभाष गवई हे आपली भूमिका मांडतील. समारोपीस सत्रामध्ये डॉ. अशोक पाळवेकर, देविदास घोडेस्वार, अरूणकुमार हर्षबोधी , शिक्षणाधिकारी (माध्य) चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी(प्राथ) डॉ. सुचिता पाटेकर व प्रा. सिध्दार्थ भगत हे मार्गदर्शन करतील. यापरिषदेच्या निमित्ताने चर्चासत्र, नाटिका, विविध क्षेत्रात काम करणाºया मान्यवरांचा सत्कार तसेच ठराव वाचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
बॉक्स …
काव्य गझल, मुशायºयाची मेजवानी
यवतमाळ प्रजासत्ताकशिक्षक कर्मचारी संघातर्फे ३ मे रोजी म्हणजे बुद्धपौणिर्मेच्या पूर्वसंध्येला सायंकाळी सहाला मराठी गझल, मुशायºयाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात आयोजित या मुशायºयामध्ये सुदाम सोनुले, किरणकुमार मडावी, अनंत चांदुरकर, विद्यानंद हाडके, आनंद शेख, अनिल कोसे, प्रमोद संबोधी, शशी थुल, सिध्दार्थ भगत यांची उपस्थिती असणार आहे. अध्यक्षस्थानी उर्दु शायर तथा नाटककार अशोक बुरबुरे राहणार असून या निशुल्क कार्यक्रमाचा रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षक कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष संजय गुजर यांनी केले आहे.









