पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for October 6th, 2014

पाकिस्तानच्या गोळीबारात पाच ठार, ३४ जखमी 0

पाकिस्तानच्या गोळीबारात पाच ठार, ३४ जखमी

Firing from Pakistan side

श्रीनगर – सीमावर्ती भागात पाकिस्तान भारतीय सुरक्षा चौक्यांबरोबर नागरी वस्त्यांनाही लक्ष्य करत आहे. सोमवारी पहाटे पाकिस्तानने जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर केलेल्या गोळीबारात पाच गावक-यांचा मृत्यू झाला असून, ३४ जण जखमी झाले आहेत.जम्मूमधील अर्णिया सेक्टरमधील भारतीय चौक्या आणि नागरी वस्त्यांवर पाकिस्तानी रेंजर्सनी अंदाधुंद गोळीबार करताना उखळी तोफांचाही मारा केल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने दिली.

रविवारी रात्री दहा वाजल्यापासून पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानने छोटया, स्वयंचलित शस्त्रांसह उखळी तोफांचा वापर केला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या गोळीबाराल चोख प्रत्युत्तर दिले. अजूनही या भागात दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरु आहे.

पंचवीस जखमींना जम्मूच्या जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबारात अनेक घरांचे नुकसान झाले आहे असे पोलिस पथकाचे नेतृत्व करणा-या सिंह यांनी सांगितले. गोळीबार सुरु असताना, सिंह यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक धोका पत्करुन घटनास्थळी पोहोचले व जखमींना रुग्णालयात हलवले.

सीमावर्ती भागातील नागरीकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गोळीबारात भारताचा एकही जवान जखमी झाला नसल्याची माहिती बीएसएफच्या प्रवक्त्याने दिली. मागच्या चार दिवसात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची ही अकरावी वेळ आहे.

October 06, 2014 in मुख्य पान
  डॉ. रविंद्र देशमुख यांचा झंझावात 0

डॉ. रविंद्र देशमुख यांचा झंझावात

Ravindra_Dheshmukh 4

यवतमाळ – यवतमाळ विधानसभा मतदार संघातून शेतकरी कामगार विकास आघाडी तर्फे आपली उमेदवारी कायम ठेवणाºया डॉ. रविंद्र देशमुख यांच्या प्रचाराचा झंझावात शहरी व ग्रामीण भागात जोर धरत आहे.
३० वर्षाच्या कामगार चळवळीचा अनुभव, विविध संघटनांचा पाठींबा, व्यापक जनसंपर्क ह्या डॉ. रविंद्र देशमुख यांच्या जमेच्या बाजु आहेत. या शिवाय सहकार क्षेत्रामधील त्यांचा २० वर्षाचा अनुभव व सहकार क्षेत्रातील त्यांच्या संपर्कात असलेली मंडळी त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळे एक प्रमुख दावेदार म्हणून डॉ. रविंद्र देशमुखांचे नाव पुढे येत आहे. यवतमाळ विधानसभा मतदार संघात बाहेरच्या मतदार संघातील प्रमुख उमेदवार तसेच वारंवार हार पत्करुन पुन्हा नशिब अजमाविणारे उमेदवार प्रमुख पक्षांनी उभे केल्याने मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात क्षोभ निर्माण झाला आहे. त्यामुळे या सुप्त असलेल्या नाराजीला तोंड फुटत आहे. या दृष्टीने चळवळीचा भक्कम वारसा लाभलेले डॉ. रविंद्र देशमुख यांना मदत करणार आहे.

October 06, 2014 in मुख्य पान