पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for October 28th, 2014

परदेशात काळा पैसा ठेवणा-यांची नावे सादर करा - सुप्रीम कोर्ट 0

परदेशात काळा पैसा ठेवणा-यांची नावे सादर करा – सुप्रीम कोर्ट

4704912094925880088_Org01_10_2012-scindia
नवी दिल्ली – परदेशातील बँकांमध्ये काळा पैसा दडवणा-या सर्व खातेधारकांची नावे उद्यापर्यंत बंद लिफाफ्यात कोर्टासमोर सादर करा असे आदेश सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. काळा पैशाप्रकरणी केंद्र सरकारने फक्त तीन खातेधारकांची नावे जाहीर केल्यावरुनही सुप्रीम कोर्टाने चांगलेच फटकारले आहे.
सुप्रीम कोर्टाने मंगळवारी केंद्र सरकारला काळा पैशावरुन धारेवर धरले. युपीए सरकारने काळा पैशाप्रकरणातील सर्व खातेधारकांची नावं जाहीर करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन केले. आता एनडीए सरकार सुप्रीम कोर्टाच्या आदेशाला विरोध दर्शवू शकत नाही असे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. काळा पैसा दडवणा-या खातेधारकांची चौकशी झाल्यावरच नावे जाहीर करु अशी भूमिका अ‍ॅटर्नी जनरल मुकूल रोहतगी यांनी मांडली. तसेच केंद्र सरकारकडे या प्रकरणात तब्बल ५०० हून अधिक खातेधारकांची नावे मिळाल्याचे रोहतगी यांनी खंडपीठाला सांगितले. अ‍ॅटर्नी जनरल यांनी केलेला युक्तीवादही सुप्रीम कोर्टाने अमान्य केला. तुम्ही आम्हाला सर्व खातेधारकांची यादी द्या, आम्ही त्यासंदर्भात पुढील चौकशीचे आदेश देऊ असे कोर्टाने सांगितले.
खातेधारकांची नावे जाहीर केल्यास गोपनीयतेचा भंग होईल असे रोहतगी यांनी कोर्टाला सांगितले असता तुम्ही खातेधारकांचे हित बघू नका,हे सर्व विशेष तपास पथक बघेल असेही खंडपीठाने सुनावले.

October 28, 2014 in मुख्य पान
शीख दंगलीप्रकरणी अमिताभ बच्चनना समन्स 0

शीख दंगलीप्रकरणी अमिताभ बच्चनना समन्स

11_03_2014-11amit
मुंबई – माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीदरम्यान चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेता अमिताभ बच्चन यांना लॉस एँजिलिस न्यायालयाने समन्स बजावले आहे. तसेच याप्रकरणी स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांना २१ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
१९८४ साली माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्या शीख सुरक्षारक्षकांनी हत्या केल्यानंतर देशभरात दंगली उसळल्या होत्या. त्यावेळी बच्चन यांनी ‘खून का बदला खून से लेंगे’ असे वक्तव्य केले होते.याप्रकरणी शिख फऑर जस्टिसचे कायदेशीर सल्लागार गुरपतवंतसिंग यांनी अमिताभ बच्चन यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने बच्चन यांना समन्स बजावले आहे.

October 28, 2014 in मुख्य पान
राज्याला विकासाकडे नेणार - फडणवीस 0

राज्याला विकासाकडे नेणार – फडणवीस

df-jpg

मुंबई – महाराष्ट्राच्या जनतेचे प्रतिनिधी म्हणून आम्ही राज्याला पारदर्शी आणि विकासाकडे देणारे सरकार देऊ अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्रीपदावर निवड झाल्यावर आज गोपीनाथ मुंडेंची आठवण येत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
मंगळवारी भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदावर निवड झाली. या निवडीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, आम्ही राज्यातील जनतेचे प्रतिनिधी असून हे ‘जनतेचं सरकार’ असेल असे आश्वासन मी जनतेला देतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवलेल्या मार्गावर चालताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहीलेल्या संविधानाला अनुसरुन राज्याचा कारभार चालेल अशी ग्वाही त्यांनी दिली. मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा देणा-या सर्व आमदार आणि पक्ष नेत्यांचेही त्यांनी आभार मानले.

October 28, 2014 in मुख्य पान
परीक्षेत मार्क वाढवण्यासाठी केली मित्राच्या आईची हत्या 0

परीक्षेत मार्क वाढवण्यासाठी केली मित्राच्या आईची हत्या

images.jpeg00
अंबरनाथ : परीक्षेत मार्क वाढवून घेण्यासाठीतसेच मौजमजेसाठी पैशांचीगरज भासल्याने तिघा मित्रांनीआपल्याच मित्राच्या आईचीहत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकरणातील तिघा आरोपींना अटक केलीअसून, त्यातील एक आरोपी अल्पवयीन आहे.
आरोपी वीरेंद्र नायडू (२२), अश्‍विनी सिंग (२२) आणि विशाल भोसले (१७) हे एकत्र शिकत होते. आदित्य उमरोटकर याच्यासोबत त्यांचीमैत्रीहोती. आदित्यची आई स्नेहल उमरोटकर (५२) या १८ ऑक्टोबरला घरात एकट्याच असताना त्यांची हत्या करण्यात आली. त्यांनी चॅट करताना आदित्यची आई घरात एकटीअसल्याची माहिती काढली आणि त्याचे घर गाठले. क्लोरोफॉर्मने बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्नेहल यांनी प्रतिकार केल्याने या तिघांनी कटरच्या साहाय्याने त्यांची हत्या केली. त्यांनी २0 हजार रुपये आणि मंगळसूत्र चोरले. मार्क वाढवून घेण्यासाठीआरोपींना पैशांची गरज असल्याने आणि मजा करण्यासाठी या पैशांचा वापर ते करणार होते.

October 28, 2014 in मुख्य पान
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 0

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री

dev
मुंबई – स्वतंत्र विदर्भाचे कट्टर समर्थक, भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहे. आज, मंगळवारी विधानभवनात पार पडलेल्या भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्यात आली. केंद्रीय निरीक्षक म्हणून मुंबईत आलेले गृहमंत्री राजनाथ सिंह आणि राज्याचे प्रभारी जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची सूचना केली. तर माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि आमदार पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिले अशी माहिती नड्डा यांनी पत्रकारांनी दिली. त्यानंतर उपस्थित सर्व आमदारांनी या निवडीवर होकार दर्शवला असल्याचे नड्डा म्हणाले. या प्रक्रियेनंतर बैठकीत राजनाथ सिंह यांनी फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली. आज, संध्याकाळी सव्वा सहा वाजता राज्यपाल विद्यासागर राव यांना भेटून सरकार स्थापन करण्यासाठी दावा करणार असल्याचं तावडे यांनी सांगितले.
फडणवीस यांचा परिचय
मुंबई –  फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपूर जिल्ह्यात झाला. देवेंद्र फडणवीस यांनी एल.एल.बी., बिझनेस मॅनेजमेंट व डी.एस.ई तसंच बर्लिनमधून मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट इत्यादी विषयात पदविका प्राप्त केल्या आहेत.फडणवीस हे चंद्रपूर जिल्ह्यातील मालगुजार कुटुंब. त्यांची भरपूर शेती आजही आहे. साहजिकच आई सरिता यांची इच्छा होती, की देवेंद्रने बीएस्सी अ‍ॅग्रीकल्चर करून प्रगतशील शेतकरी व्हावे. बारावीत चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर देवेंद्रने घरी घोषणाच करून टाकली, ‘मी बाबांसारखा राजकारणातच जाणार. राजकारण अन् कायदा सोबत चालतात म्हणून मी वकील होणार’. पुढे हा मुलगा लॉमध्ये गोल्ड मेडलिस्ट झाला. काळा कोट घातला नाही, पण लोकप्रतिनिधी म्हणून व्यापक अर्थाने जनतेची वकिली केली. त्याला प्रचंड अभ्यास, अजोड वक्तृत्वाची जोड दिली. नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये तेव्हा एनएसयूआयचा दबदबा होता. डॉ. श्रीकांत जिचकार यांना मानणारी लॉबी वजनदार होती. त्यांना टक्कर देण्यासाठी देवेंद्रच्या नेतृत्वात अभाविपचे पॅनेल असायचे. ज्या लॉ कॉलेजच्या राजकारणात देवेंद्र यांना यश आले नाही ते कॉलेज ज्या मतदारसंघात आहे, तिथूनच ते आमदार झाले.
सलग दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले देवेंद्र फडणवीस यांनी कमी वयातच नागपूरचे महापौरपद भूषवले. यानंतर १९९७ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. नागपूरमधील दक्षिण – पश्चिम नागपूर मतदार संघातून ते निवडून येतात. विधानसभेत अभ्यासू नेते म्हणून प्रसिद्ध असलेले फडणवीस यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून समर्थपणे धूरा सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला यंदाच्या निवडणुकीत १२२ जागांवर विजय मिळाला.
फडणवीस यांनी नव्वदच्या दशकात राजकीय कारकि‍र्दीला प्रारंभ केला. राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी काम केले आहे. १९९२ आणि १९९७ साली ते दोन वेळा नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. लहान वयात नागपूरचे महापौर पद भूषविले, सर्वात कमी वयाचे ते देशातील दुसरे महापौर होते.
विधानसभेसाठी १९९९ मध्ये नागपुरातून त्यांना पक्षाने उमेदवारी दिली व ते आमदार झाले. सलग १३ वर्षे विधानसभेत असताना त्यांनी अंदाज समिती, गृह व नगरविकास खात्यांची स्थायी समिती, कायदा समिती ,सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी क्षेत्रात काम केले आहे. विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
मुंबई – स्वतंत्र विदर्भाचे कट्टर समर्थक, भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहे. आज, मंगळवारी विधानभवनात पार पडलेल्या भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीस यांची नेतेपदी निवड करण्यात आली. केंद्रीय निरीक्षक म्हणून मुंबईत आलेले गृहमंत्री राजनाथ सिंह आणि राज्याचे प्रभारी जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेले ज्येष्ठ भाजप नेते एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची सूचना केली. तर माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि आमदार पंकजा मुंडे यांनी फडणवीस यांच्या नावाला अनुमोदन दिले अशी माहिती नड्डा यांनी पत्रकारांनी दिली. त्यानंतर उपस्थित सर्व आमदारांनी या निवडीवर होकार दर्शवला असल्याचे नड्डा म्हणाले. या प्रक्रियेनंतर बैठकीत राजनाथ सिंह यांनी फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली. आज, संध्याकाळी सव्वा सहा वाजता राज्यपाल विद्यासागर राव यांना भेटून सरकार स्थापन करण्यासाठी दावा करणार असल्याचं तावडे यांनी सांगितले.
फडणवीस यांचा परिचय
मुंबई –  फडणवीस यांचा जन्म २२ जुलै १९७० रोजी नागपूर जिल्ह्यात झाला. देवेंद्र फडणवीस यांनी एल.एल.बी., बिझनेस मॅनेजमेंट व डी.एस.ई तसंच बर्लिनमधून मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट इत्यादी विषयात पदविका प्राप्त केल्या आहेत.फडणवीस हे चंद्रपूर जिल्ह्यातील मालगुजार कुटुंब. त्यांची भरपूर शेती आजही आहे. साहजिकच आई सरिता यांची इच्छा होती, की देवेंद्रने बीएस्सी अ‍ॅग्रीकल्चर करून प्रगतशील शेतकरी व्हावे. बारावीत चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर देवेंद्रने घरी घोषणाच करून टाकली, ‘मी बाबांसारखा राजकारणातच जाणार. राजकारण अन् कायदा सोबत चालतात म्हणून मी वकील होणार’. पुढे हा मुलगा लॉमध्ये गोल्ड मेडलिस्ट झाला. काळा कोट घातला नाही, पण लोकप्रतिनिधी म्हणून व्यापक अर्थाने जनतेची वकिली केली. त्याला प्रचंड अभ्यास, अजोड वक्तृत्वाची जोड दिली. नागपूर विद्यापीठाच्या लॉ कॉलेजमध्ये तेव्हा एनएसयूआयचा दबदबा होता. डॉ. श्रीकांत जिचकार यांना मानणारी लॉबी वजनदार होती. त्यांना टक्कर देण्यासाठी देवेंद्रच्या नेतृत्वात अभाविपचे पॅनेल असायचे. ज्या लॉ कॉलेजच्या राजकारणात देवेंद्र यांना यश आले नाही ते कॉलेज ज्या मतदारसंघात आहे, तिथूनच ते आमदार झाले.
सलग दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले देवेंद्र फडणवीस यांनी कमी वयातच नागपूरचे महापौरपद भूषवले. यानंतर १९९७ मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. नागपूरमधील दक्षिण – पश्चिम नागपूर मतदार संघातून ते निवडून येतात. विधानसभेत अभ्यासू नेते म्हणून प्रसिद्ध असलेले फडणवीस यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून समर्थपणे धूरा सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला यंदाच्या निवडणुकीत १२२ जागांवर विजय मिळाला.
फडणवीस यांनी नव्वदच्या दशकात राजकीय कारकि‍र्दीला प्रारंभ केला. राजकीय पक्ष आणि लोकप्रतिनिधी अशा दोन्ही आघाड्यांवर त्यांनी काम केले आहे. १९९२ आणि १९९७ साली ते दोन वेळा नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. लहान वयात नागपूरचे महापौर पद भूषविले, सर्वात कमी वयाचे ते देशातील दुसरे महापौर होते.
विधानसभेसाठी १९९९ मध्ये नागपुरातून त्यांना पक्षाने उमेदवारी दिली व ते आमदार झाले. सलग १३ वर्षे विधानसभेत असताना त्यांनी अंदाज समिती, गृह व नगरविकास खात्यांची स्थायी समिती, कायदा समिती ,सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी क्षेत्रात काम केले आहे. विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी यामुळे कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशनचा सर्वोत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.