पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for July, 2015

जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांच्या मदतीचा विशेष पथदर्शी कार्यक्रम घोषित

पालकमंत्री संजय राठोड यांच्या पाठपूराव्याला यश
यवतमाळ, दि. 12 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्यासोबतच शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा प्रभावीपणे लाभ देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत अतिशय महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांना मदतीचा विशेष पथदर्शी कार्यक्रम राबविण्यासोबतच बळीराजा चेतना अभियान, सिंचनासाठी विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री संजय राठोड यांनी यासाठी सातत्याने पाठपूरावा केला होता.
आज झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत केवळ यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यांसाठी हा महत्वपुर्ण कार्यक्रम घोषित करण्यात आला असून यामुळे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम राबविण्यासाठी शासनाकडे विविध प्रस्ताव आपण सादर केले होते. यातील बहुतांश प्रस्तावांचा स्विकार होवून हा कार्यक्रम घोषित झाला असल्याचे ते म्हणाले. आज घोषित करण्यात आलेला कार्यक्रम तिन वर्षासाठी दोन जिल्ह्यात राबविला जाईल. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या प्रमुखतेत विशेष कक्ष स्थापन केल्या जाणार आहे. हा कक्ष शासनाच्या शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे समन्वयन करुन या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना देण्यासाठी काम करणार आहे. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना किंवा धोरनात्मक बाबींमध्ये बदल आवश्यक असतील तर या कक्षाच्या माध्यमातून असे बदल परस्पर करण्याचे अधिकार विभागनिहाय नेमण्यात आलेल्या सचिवस्तरीय सात अधिकाऱ्यांना आजच्या निर्णयान्वये देण्यात आले आहे. जिल्हास्तरावरील हा कक्ष कार्यक्रमाच्या अंमलबजावणी सोबतच शेतकरी योजनांचे समन्वयन व आत्महत्याग्रस्तांचा सर्वे, योजनांची माहिती, सामुहिक भजन किर्तनाव्दारे जनजागृती व ग्रामसमित्यांचा आढावा घेण्याचे काम करतील. या समितीत जिल्हाधिकारी अध्यक्ष तर निवासी उपजिल्हाधिकारी सदस्य सचिव राहतील. मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षकांसह जिल्ह्यातील महत्वपूर्ण अधिकाऱ्यांचा सदस्य म्हणून समितीत समावेश राहणार आहे. ही समिती जिल्हा नियोजन समितीला उत्तरदायी राहतील. पालकमंत्री वेळोवेळी समितीच्या कामकाजाचा आढावा घेतील. समितीच्या कामकाजासाठी शासनाने 10 केाटी रुपयेही आजच्या बैठकीत मंजूर केले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
ग्रामस्तरावरही सरपंचांच्या अध्यक्षतेत समित्या स्थापन केल्या जातील. गावातील प्रमुख शासकीय कर्मचाऱ्यांसह गावात असल्यास डॉक्टर, वकील तसेच बचतगट अध्यक्ष या समितीत राहतील. ग्रामसमितीला कार्यक्रम राबविण्यासाठी प्रत्येकी 1 लाख रुपये या प्रमाणे जिल्ह्यातील 1207 ग्रामपंचायतींसाठी 12 कोटी 7 लक्ष रुपयेही मंजूर करण्यात आले आहे. विशेष प्रसंगी आजारपण किंवा कर्ज परतफेडीचा एक हप्ता भरण्यासोबतच जनजागृतीसाठी ही रक्कम वापरता येईल. शासनाने आत्महत्या थांबविण्यासाठी जिल्ह्यात सात उपविभागात सात सचिव दर्जाचे अधिकारी नेमले आहे. शासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या योजनांमध्ये उणीवा असल्यास त्या परस्पर दुरुस्त करण्याचे अधिकार या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. जिल्ह्यात आत्महत्या झाल्यास सदर आत्महत्या थांबविता आली नसती का या बाबतची कारण मिमांसा करुन पंधरा दिवसात सदर सचिवांना मुख्यमंत्र्यास अहवाल सादर करावा लागतील. तशी बाब आजच्या निर्णयात नोंदविण्यात आली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी बळीराजा चेतना अभियानाची घोषणाही करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी नाटक, प्रवचन, पथनाट्य, किर्तन, पोवाडे आदीव्दारे जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जातील. पालकमंत्री या अभियानाचे अध्यक्ष राहणार असून जिल्हधिकारी सदस्य सचिव तर बहुतांश सर्व अधिकारी सदस्य राहतील. अभियानाअंतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कारही देण्यात येणार आहे.
पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत बळीराजा चेतना अभियान
सिंचनासाठी तीन वर्षात 687 कोटी सिंचन प्रकल्पांव्दारे शेतकऱ्यांना ओलीताची सोय उपलब्ध करुन देण्याअंतर्गत जिल्ह्यातील सोळा प्रकल्पांना या वर्षासह पुढील तिन वर्षात 687 केाटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. या वर्षी 198 कोटी रुपये दिले जातील. 2016-17 मध्ये 274 कोटी तर 2017-18 मध्ये 213 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले जाणार आहे. नापिकी व कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यांची आर्थीक स्थिती चांगली नाही. त्यामुळे त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम जाणविण्याची शक्यता आहे. अशा शेतकऱ्यांना धिर देण्यासाठी जिल्हास्तरावर एक व ग्रामीण रुग्णालयांमध्ये प्रत्येकी एक कंत्राटीपध्दतीवर मानसोपचार तज्ञ नेमण्यात येणार आहे. चर्चेव्दारे त्यांना मानसिक आधार देण्याचे काम हे मानसोपचार तज्ञ करतील. या नियुक्तीसाठीही आर्थीक तरतूद करण्यात आली असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

 

July 12, 2015 in मुख्य पान
मुसळधार पावसामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत 0

मुसळधार पावसामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळीत

Rains in Delhi
नवी दिल्ली – सलग चौथ्या दिवशी कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे राजधानी दिल्लीतील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. पावसाच्या संततधारेमुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे.
गेल्या ३६ तासांत दिल्लीत सुमारे २०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत कमी ठिकाणी पाणी साचले आहे. अशी माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विटरवरुन दिली.
पुढील २४ तासांत दिल्लीत मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान ढगाळ राहील. अनेक भागात विजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत दिल्लीत १४७.८ मिमी पावसाची नोंद झाल्याचे हवामान खात्याने सांगितले.
दक्षिण दिल्ली, मध्य दिल्ली आणि पूर्व दिल्लीतील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने त्याचा वाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
बिहारमध्ये भिंत कोसळली, तीन ठार
बिहारमधील कैमुर जिल्ह्यात घराची भिंत कोसळल्याने झालेल्या अपघातात एकाच घरातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे.
राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे गेहून गावातील एका घराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत एकाच कुंटुंबातील तीन महिला ठार झाल्या तर एक महिला जखमी आहे.
उत्तर प्रदेशमध्ये भिंत कोसळल्याच्या दुर्घटनेत तीन ठार
उत्तर प्रदेशमध्ये विविध ठिकाणी भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दहा वर्षाच्या मुलाचा समावेश आहे.

July 12, 2015 in मुख्य पान
आसाराम प्रकरणातील साक्षीदाराचा गोळीबारात मृत्यू 0

आसाराम प्रकरणातील साक्षीदाराचा गोळीबारात मृत्यू

Gujarat police take custody of Asaram Bapu
बरैली(उत्तर प्रदेश) – लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू प्रकरणातील साक्षीदार कृपाल सिंह याचा शनिवारी रात्री मृत्यू झाला.
शुक्रवारी रात्री कृपाल सिंह घरी परतत असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर गोळीबार केला होता. यात तो मोठ्या प्रमाणात जखमी झाला होता. त्याच्यावर बरैली येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. अखेर शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला.गेल्या काही दिवसांपासून आसाराम यांच्याशी संबंधित लोकांकडून आपल्याला धमकीचे फोन येत होते अशी माहिती कृपाल यांनी आपल्या जबानीत दिल्याचे अतिरिक्त शहर दंडाधिका-यांनी सांगितले.आसाराम प्रकरणातील नऊ साक्षीदारांवर आतापर्यंत हल्ले करण्यात आले. तर तीन जणांचा यात मृत्यू झाला आहे.

July 12, 2015 in मुख्य पान
0

AP7_12_2015_000157A हरारे – कर्णधार अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने झिम्बाब्वेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामन्यात तब्बल ६२ धावांनी शानदार विजय मिळवला. गोलंदाजी आणि फलंदाजी या दोनही आघाड्यांवर भारतीय संघाने चांगल्या कामगिरीचे प्रदर्शन केले. या विजयासोबतच भारताने तीन सामन्यांची मालिका २-१ ने जिंकली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करत आठ बाद २७१ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल झिम्बाब्वेला केवळ २०९ धावा करता आल्या. भुवनेश्वर कुमारने चार बळी घेत विजयात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. भारताने विजयासाठी ठेवलेल्या २७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संपूर्ण डाव ४९ षटकांत अवघ्या २०९ धावांत संपुष्टात आला. झिम्बाब्वेकडून सलामीवीर छामू चिभाभाने सर्वाधिक ७२ धावा केल्या. मात्र बाकी फलंदाज साफ अपयशी ठरले. तत्पूर्वी, झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. सलामीवीर अजिंक्य रहाणे आणि मुरली विजय यांनी साकारलेल्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ५० षटकांत आठ बाद २७१ धावा केल्या. भारताची सुरुवात चांगली झाली. पहिल्या सामन्यात मोठी भागीदारी करण्यात अपयशी ठरलेल्या मुरली आणि रहाणेने दमदार सुरवात करुन दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी रचली. रहाणेने ८३ चेंडूत ६३ धावा केल्या. तर विजयने ९५ चेंडूत ७२ धावा केल्या. पहिल्या सामन्यात शतकी खेळी करणा-या अंबाती रायडूला मात्र या सामन्यात अर्धशतकही पूर्ण करता आले नाही. त्याने केवळ ४१ धावा केल्या. रायडूपाठोपाठ मनोज तिवारी २२ धावा करुन तंबूत परतला. यापूर्वीच्या सामन्यात धावा करण्यात अपयशी ठरलेल्या रॉबिन उथप्पाला या सामन्यातही चांगली खेळी करण्यात अपयश आले. त्याने केवळ १३ धावा केल्या. तर अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीने २५ धावा केल्या. पहिल्या ४२ षटकांमध्ये द्विशतक पूर्ण करणा-या भारतीय संघाने अखेरच्या काही षटकांमध्ये झिम्बाब्वेची जोरदार धुलाई केली. शेवटच्या १० षटकांत भारतीय संघाने ७७ धावा ठोकल्या. तर अखेरच्या दोन षटकांत भारताचे तीन गडी बाद करण्यात झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना यश आले. संक्षिप्त धावफलक भारत – आठ बाद २७१(मुरली विजय ७२, अजिंक्य रहाणे ६३, नेविला मदझिवा ४९/४) झिम्बाब्वे – सर्वबाद २०९(चिभाभा ७२, भुवनेश्वर कुमार ३३/४) सामनावीर – मुरली विजय

July 12, 2015 in क्रीडा

ट्रक अपघातात दोन ठार

यवतमाळ, दि. १०  – भरधाव ट्रक नाल्यात पलटी झाल्याने दोन जण ठार झाल्याची घटना पांढरकवडा तालुक्यातील कोंघारा येथे आज सकाळी ६ वाजता घडली. चालक संदिप महेश यादव (२१) रा. घुगरी कसाई शिवणी, सुनील दिम्मु यादव (२६) रा. ठामरी मध्यप्रदेश अशी मृतकांची नावे आहे. जबलपूर येथून एम.पी. २० / एच.बी. ४९१५ क्रमांकाचा ट्रक हैद्राबाद येथे सिमेंट विट घेऊन जात होता. अशातच पांढरकवडा येथून चार किमी अंतरावर असलेल्या कोंघारा या गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक नाल्यात कोसळला. यामध्ये चालक संदिप यादव, सुनील यादव हे दोघेंही जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक संतोष माने, खंडागळे, राठोड यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. नागरिकांच्या मदतीने मृतकांना बाहेर काढून शवविच्छदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

July 10, 2015 in विदर्भ

बाभूळगावच्या सराफा व्यावसायीकाला लुटले

यवतमाळ , दि. १० – दुचाकीने जाणाºया सराफा व्यावसायीकावर प्राणघातक हल्ला करून सोन्या चांदीचे दागिन्यासह मुद्देमाल लुटल्याची घटना आज १० जलुै रोजी रात्री ८ वाजताच्या बाभूळगाव पंचायत समिती जवळ घडली.
सराफा व्यावसायीक सुधीर देविदास रोकडे (४०) यांचे मेनलाईनमध्ये दुकान आहे. त्याच्याकडे उमेश रोकडे (२७) हा कामगार म्हणून कार्यरत आहे. १० जुलै रोजी रात्री ८ वाजता दुकान बंद करून ते दुचाकीने घरी जात होते. अशातच पंचायत समिती व ग्रामीण रुग्णालयाच्या जवळ पाच ते सहा लुटारुंनी दुचाकी अडवून रोकडे यांच्यावर फायटर हल्ला वढविला. ते खाली पडताच त्यांच्या जवळील पिशवीतील १० ते १५ किलो चांदी व सोन्याचे दागिने घेऊन पसार झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविले. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार महिपालसिंग चांदा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून आरोपींची शोधमोहीम सुरू केली.

 

विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शेषराव मोरेंची निवड 0

विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शेषराव मोरेंची निवड

2015-07-10-marathi_ns

पुणे, दि. १० – स्वांत्र्यवीर सावरकर यांच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांचे औचित्य साधून अंदमान येथे होणा-या चौथ्या विश्व साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शेषराव मोरे यांची निवड करण्यात आली आहे. ५ व ६ सप्टेंबर रोजी अंदमान येथे चौथे साहित्य संमेलन पार पडेल असे साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचे अभ्यासक असणा-या मोरे यांनी सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरग, काँग्रेस व गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?, सावरकरांचा बुद्धिवाद व हिंदुत्ववाद अशी अनेक पुस्तके लिहीली आहेत.
या संमेलनाला निधी देण्यास शासनाने दिलेला नकार, कॅनडाचे संमेलन रद्द करण्याची ओढावलेली नामुष्की, दक्षिण आफ्रिकेकडून आलेला प्रस्ताव, आर्थिक सहकार्याशिवाय आयोजकांची संमेलन घेण्याची असमर्थता असा इतिहास असताना हे संमेलन होणार, की नाही? याबाबत साहित्य वर्तुळात उत्सुकता होती. मात्र हे संमेलन घेण्यावर महामंडळाने शिक्कामोर्तब करत ते अंदमान घेण्यात येणार असल्याची घोषणा गेल्या आठवड्यात केली. पोर्टब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळ आणि आॅफबीट डेस्टिनेशन या संस्थेच्या वतीने हे संमेलन सप्टेंबर महिन्यात होणार आहे.

 

July 10, 2015 in मुख्य पान
भारताचा झिम्बाब्वेवर चार धावांनी विजय 0

भारताचा झिम्बाब्वेवर चार धावांनी विजय

AP7_10_2015_000199A

हरारे – शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत शुक्रवारी झिम्बाब्वेवर ४ धावांनी मात करताना भारताने तीन लढतींच्या मालिकेत विजयी सलामी दिली. मुंबईकर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील पाहुण्यांचा हा पहिलाच विजय आहे. अंबाती रायुडूने दमदार शतकासह स्टुअर्ट बिन्नीसोबत केलेली १६० धावांची भागीदारी भारताच्या विजयाचे प्रमुख वैशिष्टय़ ठरले.
भारताच्या २५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला ७ बाद २५१ धावा करता आल्या. कर्णधार इल्टन चिगुंबुराच्या (१०४) नाबाद शतकामुळे यजमानांनी चुरस दिली. त्याला सिकंदर रझा (३७) आणि हॅमिल्टन मॅसॅकद्झाची (३४) चांगली साथ लाभली. या त्रिकुटाच्या चांगल्या फलंदाजीनंतरही भारताने पारडे जड वाटत होते.
मात्र कर्णधार चिगुंबुराने विकेट कायम ठेवल्याने यजमानांची धुगधुगी कायम होती. १८ चेंडूंत जिंकण्यासाठी ३२ धावा हव्या असताना चिगुंबुरा-क्रीमरने भुवनेश्वर कुमारच्या आठव्या आणि डावातील ४४व्या षटकात १४ धावा वसूल केल्याने भारताच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले. धवल कुलकर्णीने त्याच्या षटकात ८ धावा दिल्याने शेवटच्या षटकात सामना गेला. ६ चेंडूंत १० धावांची असताना भुवनेश्वरने मागील चुका टाळताना फक्त ५ धावा देत भारताला ४ धावांनी जिंकून दिले.
तत्पूर्वी, भारताने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २५५ धावांची मजल मारली. त्याचे श्रेय अंबाती रायुडूसह अष्टपैलू स्टुअर्ट बिन्नीला जाते. रायुडूने ४६.४ षटके मैदानावर टिकून राहताना नाबाद १२४ धावांची जबाबदार खेळी केली.
१३३ चेंडूंमधील त्याच्या दुस-या शतकात १२ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. रायुडूला बिन्नीची सुरेख साथ लाभली. या जोडीने सहाव्या विकेटसाठी १६० धावांची भागीदारी करताना भारताला अडीचशेपार पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला. बिन्नीने ७६ चेंडूंत ६ चौकार आणि दोन षटकारांसह ७७ धावांची उपयुक्त खेळी केली. त्याची कारकीर्दीतील ही सर्वाधिक खेळी आहे.
२५ षटकांत निम्मा संघ ८९ धावांत परतल्यानंतर भारत प्रतिस्पर्ध्यासमोर अडीचशेहून अधिक धावा करेल, असे वाटले नव्हते. मात्र रायुडू आणि बिन्नीमुळे पुढील २५ षटकांत १६६ धावा निघाल्या. या जोडीने २४.३ षटके खेळून काढताना विक्रमी १६० धावा जोडल्या.
भारतातर्फे झिम्बाब्वेत झालेली सहाव्या विकेटसाठीची ही सर्वाधिक भागीदारी आहे. पाहुण्या फलंदाजांनी शेवटच्या १० षटकांत ९० धावा झोडपून काढल्या. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा झिम्बाब्वेचा कर्णधार इल्टन चिगुंबुराचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी योग्य ठरवला. तिस-याच षटकात मध्यमगती ब्रायन व्हिटोरीने सलामीवीर मुरली विजयला (१) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.
कर्णधार अजिंक्य रहाणेने (३४) ‘वनडाऊन’ रायुडूसह दुस-या विकेटसाठी ५१ धावा जोडताना भारताला सावरले तरी अजिंक्यनंतर मनोज तिवारी (२), रॉबिन उथप्पा (०) आणि केदार जाधवमध्ये (५) बाद होण्याची स्पर्धा लागल्याने ५ बाद ८७ धावा अशी भारताची दयनीय अवस्था झाली.
हरारे स्पोर्ट्स क्लबच्या खेळपट्टीवरील दवाचा फायदा यजमानांच्या गोलंदाजांनी उठवला. त्यात आघाडीच्या फलंदाजांच्या चुकांची भर पडली. मात्र झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना दुस-या टप्प्यात दिशा आणि टप्पा राखता आला नाही. यजमानांतर्फे चामू चिभाभा आणि डोनाल्ड टिरिपॅनो (प्रत्येकी २ विकेट) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले.
संक्षिप्त धावफलक : भारत – ६ बाद २५५(रायूडू नाबाद १२४, बिन्नी ७७, चिभाभा २५-२) वि. झिम्बाब्वे – ७ बाद २५१(चिगुंबुरा नाबाद १०४, पटेल ४१-२, बिन्नी ५४-२). निकाल : भारत ४ धावांनी विजयी. तीन लढतींच्या मालिकेत १-० आघाडी. सामनावीर : अंबाती रायुडू.

 

July 10, 2015 in क्रीडा