पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for July 6th, 2014

वैद्यकीय अधिका:यांनी कामावर हजर व्हावे, अन्यथा मेस्मा अंतर्गत कारवाई 0

वैद्यकीय अधिका:यांनी कामावर हजर व्हावे, अन्यथा मेस्मा अंतर्गत कारवाई

doctor_0515-0911-0722-3611_SMU
मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागातील संपात सहभागी झालेल्या वैद्यकीय अधिका:यांनी 6 जुलै रोजी सकाळी कामावर हजर व्हावे अन्यथा त्यांच्यावर जीवनावश्यक सेवा अनुरक्षण कायद्याअंतर्गत (मेस्मा) कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक यांनी शनिवारी दिला. मात्र या इशा:याला न जुमानता महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेने (मॅग्मो) आमच्या पाचही मागण्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळत नाही, तोवर असहकार आंदोलन सुरूच राहील, असे स्पष्ट केले आहे.
आपल्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय संघटनेने (मॅग्मो) 1 जुलैपासून संप पुकारला असून, या संपात राज्यातील सुमारे 12 हजार वैद्यकीय अधिकारी सहभागी झाले आहेत. या संपामुळे शासकीय रुग्णालयांत दाखल होणा:या रुग्णांचे हाल होत आहेत. शासनाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. यासंदर्भात पत्रकार परिषदेत श्रीमती सौनिक म्हणाल्या, की संपकरी डॉक्टरांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून, त्यांच्या मागण्या शासनस्तरावर विचाराधीन आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी राज्यातील रुग्णांना वेठीस न धरता तातडीने कामावर हजर व्हावे व चर्चेतून प्रश्न सोडवावेत.
विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर कंत्रटी पद्धतीने डॉक्टरांच्या नेमणुका करण्यात
येणार आहेत, असेही श्रीमती सौनिक
यांनी या वेळी सांगतली. या वेळी राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे प्रकल्प संचालक डॉ. गोविंदराज, आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
मॅग्मोचे अध्यक्ष डॉ. राजेश गायकवाड यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता ते म्हणाले, आमच्या संघटनेने राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिका:यांशी संवाद साधला आहे. मात्र त्यापैकी कोणीही दाद दिलेली नाही. वैद्यकीय अधिका:यांची नाराजी अद्याप कायम आहे. त्यामुळे पाचही मागण्या मान्य झाल्याशिवाय हे असहकार आंदोलन मागे घेण्यात येणार नाही.
एकाची प्रकृती खालावली
दरम्यान, संपकरी डॉक्टरांच्या असहकार आंदोलनामुळे राज्यातील आरोग्यसेवा कोलमडून पडली आहे, तर दुसरीकडे
संपकरी डॉक्टरांपैकी आझाद मैदानातील एका डॉक्टरची प्रकृती खालावत

असल्याने तेथेही डॉक्टरांना तैनात करण्यात आले आहे.

इंधन दरवाढ विरोधात रॅली.. 0

इंधन दरवाढ विरोधात रॅली..

Congress activist protesting
इंधन दरवाढ विरोधात कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी रविवारी वाहनांची धक्का रॅली काढून मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला.

तामिळनाडूत भिंत कोसळून ११ ठार 0

तामिळनाडूत भिंत कोसळून ११ ठार

collapse-of-a-wall-of-Byculla-Station-e1355304223220
चेन्नई – तामिळनाडूमधील तिरुवेल्लर जिल्ह्यात भिंत कोसळून झालेल्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे.  मृतांमध्ये चार महिला आणि मुलांचा समावेश आहे.
‘शनिवारी झालेल्या मोठ्या पावसामुळे ही वीस फूट उंच भिंत कोसळली. यामध्ये ११ जण ठार झाले. ठार झालेल्यांमध्ये नऊ आंध्र प्रदेशमधील तर इतर तामिळनाडू येथील रहिवासी आहेत’,अशी माहिती तिरुवेल्लर जिल्हाधिकारी के. वीरा. राघव यांनी दिली. या प्रकरणी ज्या कंपनीसाठी ही भिंत उभारण्यात येत होती त्या कंपनीच्या मालकांना अटक करण्यात आली आहे. रामनाथन आणि बाळू अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
दरम्यान, तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी मृत व्यक्तींना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच या प्रकरणी दोषी असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी पोलिसांना दिले.आठवड्याभरापूर्वीच चेन्नईमधील ११ मजली इमारत कोसळून झालेल्या अपघातात ६१ जणांना आपला जीव गमवावा लागला होता.

मुरुड समुद्रात बुडून सहा जणांचा मृत्यू 0

मुरुड समुद्रात बुडून सहा जणांचा मृत्यू

IMG-20140706-WA0007

अलिबाग- अलिबाग येथे पर्यटनासाठी आलेल्या सहा पर्यटकांचा रविवारी मुरुड येथील समुद्रकिनारी बुडून मृत्यू झाला. हे सर्व पर्यटक मुंबईतील चेंबूर येथील रहिवासी आहेत.
समुद्रात पोहोयला गेले असताना ही दुर्घटना घडली. या सर्व सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
चेंबूर येथील घाटलागाव परिसरातील १५ जण अलिबाग येथे पर्यटनासाठी आले होते. ते सर्वजण पोहण्यासाठी समुद्रात गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील  सहाजण बुडाले. यात विनोद झलाई, दिनेश पवार, दिलीप गोले, संजय पांचाळ, शंकर चव्हाण आणि रोहित झाला यांचा मृत्यू झाला. हे सर्वजण ४० ते ४५ वयोगटातील आहेत.