
गुरगाव – गुरगाव येथे सीमाशुल्क अधिकाऱ्याच्या पत्नीची तीन अज्ञात इसमांनी घरात घुसून गोळ्या घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. सावित्रीदेवी असे मृत महिलेचे नाव आहे.
गुरगाव पोलिसांनी ही माहिती दिली आहे. गुरगावमधील सेक्टर ३१ मध्ये ही घटना घडली. सोमवारी दुपारी तोंडाला रुमाल बांधलेल्या तीन इसमांनी सावित्री देवींच्या घरात प्रवेश केला आणि काही कळण्याच्या आत गोळीबार केला. गंभीर जखमी झालेल्या सावित्री देवी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराआधीच त्यांचे निधन झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
Archive for July 29th, 2014
0
गुरगावात घरात घुसून हत्या
0
बस दरीत कोसळून २० ठार

शिमला – हिमाचल रोड ट्रान्स्पोर्टची बस दरीत कोसळून मंगळवारी २० जण ठार, तर सात जण जखमी झाले. येथून ६५ किलोमीटरवर असलेल्या कतारघाटात मंगळवारी दुपारी हा अपघात झाला. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
शिमल्याहून निघालेली बस सवेराखूदला निघाली होती. बसमध्ये ३० प्रवासी होते. बसंतपूर किंजल महामार्गावरील घाटात बस दरीत कोसळली. आतापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बसच्या चक्काचूर झालेल्या सांगाड्यात आणखी काही मृतदेह अडकले असल्याचे शिमल्याचे पोलिस अधीक्षक डी. डब्ल्यू. नेगी यांनी सांगितले. अपघात होताच ड्रायव्हरने उडी मारून स्वतःचे प्राण वाचविले. जखमींना येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली.
0
मुंबईत अतिवृष्टीचा इशारा

मुंबई – मुंबईत दुपारपासून पावसाचा जोर वाढलेला असताना येत्या २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आपत्कालिन व्यवस्थापन विभागासह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दरम्यान, ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सुर्या आणि वैतरणा नद्यांना पूर आला असून पूरात दोघे जण वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतीय हवामान खात्याच्या विभागीय केंद्राने जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करताना मुंबईला सतर्क राहण्याची सूचना दिली आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामानात मोठे बदल झाले असून महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागाला अतिवृष्टीचा तडाखा बसू शकतो, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.
मुंबईत येत्या २४ तासांत ७ ते १४ सेंटीमीटर पाऊस कोसळेल तर हेच प्रमाण ठाणे जिल्ह्यासह कोकणात २४ सेंटीमीटरपर्यंत जाऊ शकतो, असे आयएमडीचे मुंबईतील संचालक व्ही. के. राजीव यांनी सांगितले. गेल्या २४ तासांत सांताक्रूझमध्ये ४८.३ मिलीमीटर तर कुलाब्यात २६.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
0
पुसदमध्ये २० वाहनांची तोडफोड ;शहरात तणावपूर्ण शांतता

पुसद – एका सामाजिक कार्यक्रमानंतर पोलीस अधिकारी व राजकीय नेत्यात झालेल्या किळकोळ वादामुळे आक्रमक झालेल्या जमावाने दगडफेक करीत अनेक वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलीस प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्यानंतर तणावपूर्ण शांतता आहे.
आज सकाळी शिवाजीनगरात एका सामाजिक कार्यक्रमादरम्यान नगर परिषद उपाध्यक्ष डॉ. मोहम्मद नदीम व साहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्यात किरकोळ वाद झाला. यामुळे ४०० ते ५०० जणांचा जमाव पोलीस ठाण्यावर गेला. पोलीस अधिकाºयावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी पाटील यांनी सदर साहाय्यक पोलीस निरीक्षकाची बदली तत्काळ कंट्रोल रुमला केल्याचे सांगितले. यावर मोर्चेकºयांचे समाधान झाल्याने ते माघारी फिरले. काही दूर येत नाही तोच अचानक दुचाकी,चारचाकी वाहनांवर दगडफेक सुरू केली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी परिस्थितीतीवर नियंत्रण मिळविले. या घटनेचे वृत्त शहरात पसरताच व्यापाºयांनी लागलीच आपली प्रतिष्ठाने बंद केली. या दगडफेकीत अनेक दुचाकी, चारचाकी वाहनांचे नुकसान झाले असून, वाहनधारकांनी पुसद पोलिसात तक्रार दिली आहे. तोडफोड करणाºयांना अटक करण्याची मागणी शिवसेना व भाजपाच्या वतीने करण्यात आल्यानंतर व्यापाºयांनी पुन्हा आपली दुकाने बंद केली. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक जे.बी. डाखोरे यांनी पुसद गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.
0
सोनाक्षी खेळणार कबड्डी!

सामान्य लोक कांदे-बटाटे, सेल फोन किंवा कार खरेदी करतात, परंतु ‘दबंग’गर्ल सोनाक्षी सामान्य नाही. तिचं कोणतंही काम असामान्य असतं. अभिनयापासून राजकारणाचं ‘बाळकडू’ प्यायलेल्या सोनाक्षीने कबड्डीचा संघ खरेदी केला आहे.
यावर सोनाक्षीचं म्हणणं असं आहे की, एखादा सेलिब्रेटी खेळाशी जोडला जातो, तेव्हा त्या खेळाची लोकप्रियता वाढण्यास मदत होते. म्हणूनच ९ ऑगस्टला सुरू होणा-या ‘वर्ल्ड कबड्डी लीग’मध्ये ब्रिटनच्या ‘द हायर ग्रुप’ यांच्यासोबत मिळून ‘युनायटेड सिंग्ज’ नावाचा संघच तिने खरेदी केला आहे. ही लीग लंडनमध्ये खेळवली जाणार आहे.आपल्या देशात क्रिकेटला जास्त महत्त्व दिलं जात असल्याने इतर खेळ दुर्लक्षित राहतात. म्हणूनच क्रिकेटसारखं इतर खेळांना प्रोत्साहन देण्याची वेळ आली आहे.कबड्डी हा असा खेळ आहे, जो आपण लहानपणी खेळायचो. हा एक भारतीय खेळ आहे. याची पाळंमुळं येथे रुजलेली आहेत. त्यामुळे मी या खेळाला मोठय़ा स्तरावर घेऊन जाणार आहे. यासाठी वल्र्ड कबड्डी लीगसारखा चांगला प्लॅटफॉर्म असूच शकत नाही, असंही सोनाक्षी सांगते. ‘मी वल्र्ड कबड्डी लीगचा भाग बनण्यासाठी उत्सुक आहे. अशा प्रकारचा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. लीगमध्ये सहभागी होण्यासाठी शूटिंगचं वेळापत्रकही बनवलं आहे. यापूर्वी अक्षय कुमार आणि हनी सिंगनेही वर्ल्ड कबड्डी लीग संघ खरेदी केले आहेत. आता बघू या.. सोनाक्षीची एंट्री कशी होते ते!









