
गडचिरोली, दि. २५ – गडचिरोलीतील माजी जिल्हा परिषद सदस्य आणि काँग्रेस नेते बापू तलांडी यांची रविवारी सकाळी हत्या करण्यात आली आहे. गडचिरोलीतील निमलगुडा या गावात राहणा-या बापू तलांडी यांना रविवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गाठले. यानंतर गोळी झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या हल्ल्यानंतर निमलगुडा गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Archive for May 25th, 2014
0
गडचिरोतीत काँग्रेस नेत्याची हत्या
0
सहा पर्यटकांना जलसमाधी

रत्नागिरी, दि. २५ – रत्नागिरीतील दापोली येथे पर्यटनासाठी आलेल्या सहा पर्यटकांना समुद्रात जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली. हे सर्व पर्यटक पुण्यातील असून मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
श्रृती डांगे (वय १३), संगीता ओझा (३४ वर्ष) आणि पवन (वय ६ वर्ष) अशी या तिघा मृतांची नावे आहेत. पुण्यातील दत्तवाडी परिसरात राहणारे चार कुटुंब उन्हाळी सुट्टीत पर्यटनासाठी दापोलीत आले होते. आंजर्ले – हरणे समुद्रातील अडखळ खाडीत हे पर्यटक पोहण्यासाठी उतरले होते. मात्र पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने नऊ जण पाण्यात बुडू लागले. या घटनेनंतर स्थानिकांनी नऊपैकी तिघांना यशस्वीरित्या पाण्यातून बाहेर काढले. मात्र उर्वरित सहा जणांना जलसमाधी मिळाली. सहा पैकी तिघा जणांचे मृतदेह सापडले असून उर्वरित तिघा जणांचा शोध सुरु आहे. या घटनेनंतर पुण्यातील दत्तवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
0
कुख्यात डोमाची दगडाने ठेचून हत्या

नागपूर : पाचपावली बारईपुरा येथील कुख्यात गुंड डोमा याची त्याच्याच जुन्या मित्राने मारहाणीपासून वाचण्यासाठी दगडाने ठेचून हत्या केली. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. आरोपी रोशन तोटे याला पोलिसांनी अटक केली आहे.
मृत उमेश ऊर्फ डोमा शामराव चामटकर आणि आरोपी रोशन तोटे हे बारईपुरा पाचपावली येथे एकाच वस्तीत जवळपासच राहतात. दोघे जुने मित्र आहेत. परंतु डोमा नेहमीच रोशनला मारहाण करीत असे. शुक्रवारी सकाळीसुद्धा डोमाने रोशनला मारहाण केल्याची चर्चा आहे. उमेश ऊर्फ डोमा काही वर्षांंंंपूर्वी अवैध दारू विक्रीशी जुळला होता. त्याच्याविरुद्ध खुनी हल्ल्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. परंतु सध्या तो चकना चौक येथील एका गॅरेजमध्ये काम करीत होता. शनिवारी दुपारी १.३0 वाजताच्या सुमारास रोशन घरी परतत होता. त्यावेळी डोमा आपल्या घराजवळच डोक्याखाली दारूची रिकामी शिशी ठेवून झोपला होता. डोमाला पाहून रोशन दुसरीकडे जाऊ लागला. डोमाची त्याच्यावर नजर गेली. त्याने त्याला आवाज दिला परंतु रोशन पळू लागला. रोशनला पळताना पाहून डोमाने त्याला दारूची शिशी फेकून मारली. रोशन खाली पडला त्याला मार लागला. रोशन पडल्याचे पाहून डोमा त्याला पकडण्यासाठी पोहचला. परंतु रागाच्या भरात रोशनने दगड उचलून त्याच्या डोक्यावर वार केला. तसेच तुटलेली काचेची शिशी त्याच्या पोटात खुपसली. जखमी अवस्थेत त्याला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. उमेशच्या भावाने दिलेल्या तक्रारीनुसार होळीच्या दिवशी आणि शनिवारी सकाळी उमेशचे रोशनसोबत भांडण झाले. या कारणावरून आरोपी रोशनने उमेशचा पाठलाग करून त्याला दगडाने मारून खाली पाडले. त्यानंतर पुन्हा दगडाने ठेचले. पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.
0
१६ जून पासून मतदार नोंदणी अभियान

नागपूर – लोकसभा निवडणुकीच्या वेळी अनेक मतदारांची नावे वगळण्यात आल्याने एकच गोंधळ उडाला होता. यात दोष कुणाचा, यावरून प्रशासन आणि मतदारांमध्ये चांगलेच वाद झाले. या वादावर कुठलाच तोडगा न निघता प्रकरण शांतही झाले. आता लवकरच विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील. याची तयारी म्हणून येत्या १६ जूनपासून मतदारनोंदणी अभियानाला सुरुवात होणार आहे.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन गद्रे यांनी नुकतीच नागपूरला येऊन उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेतली. मतदार नोंदणी अभियानाबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. मतदार नोंदणीची मोहीम राबविताना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. मतदारांनीही अधिक जागरूक राहून आपले नाव नोंदवावे आणि यादीत आहे की नाही हे तपासावे याबाबतच्या वारंवार सूचनाही देण्यात येणार आहेत. यापूर्वी राबविलेल्या मतदार नोंदणी अभियानात नागपुरातील सहा विधानसभा मतदारसंघांतील मतदार मोठ्या संख्येने कमी झाले. यात निधन झालेले, नावे पुन्हा पुन्हा असलेले, दुसऱ्या मतदारसंघात बदलून गेलेल्या मतदारांसह गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत असलेले मतदारही कमी झाले. १ जानेवारी २०१२ मध्ये दक्षिण-पश्चिम मतदारसंघात ३ लाख ५७ हजार ११५ मतदार होते. त्यानंतर १ जानेवारी २०१४ रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीत मतदार कमी होऊन ३ लाख १३ हजार ३५९ झाले. याचा अर्थ ४३ हजार ७५६ मतदार कमी झाले. हेच चित्र दक्षिण, पूर्व, मध्य, पश्चिम, उत्तर या मतदारसंघांतही पाहायला मिळाले. सध्या नागपुरात सहा विधानसभा मतदारसंघांत एकूण १८ लाख ९९ हजार ४०० मतदार आहेत. त्यामुळे विधानसभेच्यावेळी मतदारांनी आता अधिक जागरूक राहून आपले नाव नोंदवून घेण्याची गरज आहे. विधानसभा क्षेत्रातील कमी झालेल्या मतदारांचा फटका संबंधित उमेदवारालाही बसू शकतो. त्यामुळे उमेदवारांनीही अचूक मतदार याद्या तयार व्हाव्यात, यासाठी सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.
0
बनावट पासवर प्रवास करणारा युवक गजाआड

कळंब -अपंग, जेष्ठ नागरीक असल्याचे खोटे पुरावे सादर करुन बनावट पास काढणारी टोळी सक्रीय झाली आहे. अशाच प्रकारातून दुसºया व्यक्तीच्या नावावर बनावट पास तयार करुन एक युवक एसटी बसमध्ये प्रवास करत असल्याचे आज उघड झाले. चालक व वाहकाने बस पोलिस ठाण्यात लावुन या युवकाला पोलिसांच्या स्वाधिन केले.
मुन्ना उर्फ निलेश बन्सीलाल कोठारी (२९) रा. कात्री असे आरोपीचे नाव आहे. आशिष झलके रा. कात्री या युवकाच्या नावाने बनावट पास काढून त्यावर स्वत:चे छायाचित्र लावले. यवतमाळ येथील आयटीआयमध्ये शिक्षण घेत असल्याचे पासवर नमुद केले. आज सकाळी उमरखेड -नागपूर या बसमध्ये तो यवतमाळ वरुन कात्री येथे जात होता. यावेळी वाहक गोविंद पिराजी चनेबोइनवाड (३८) रा. उमरखेड यांनी त्याला तीकीट काढण्याबाबत विचारणा केली. त्यावर मुन्नाने पास असल्याचे सांगितले. यावेळी वाहकाने पास चालत नसल्याचे सांगताच सदर युवकाने वाद करुन मारहाण केली. त्यामुळे वाहक व चालकाने बस पोलीस ठाण्यात नेऊन मुन्नाला पोलिसांच्या स्वाधिन केले. पोलिसांनी कसुन चौकशी केली असता, पास बनावट असल्याची कबुली दिली. याप्रकरणी पोलिसांनी मुन्ना कोठारी याच्याविरुद्घ गुन्हा दाखल केला. राज्य शासनाकडून एसटी प्रवासाबाबत विशेष सवलत देण्यात आली आहे. मात्र निव्वळ आपल्या फायद्यासाठी अनेक नागरिक खोटी कागदपत्रे तयार, पुरावे सादर करुन ही सवलत पास मिळवित आहे. त्यामुळे महाराष्टÑ राज्य एसटी महामंडळाला लाखोंचा चुना लावत आहे.
0
शिवेसना उपतालुका प्रमुखाच्या खूनातील तीन आरोपी गजाआड

यवतमाळ – येथील शिवसेना उपतालुका प्रमुख रामनारायण उर्फ दादू इंद्रजित मिश्रा (४०)रा. उमरसरा यांच्या खून प्रकरणातील तीन आरोपींना उपविभागीय पोलिस अधिकाºयांच्या पथकाने अटक केली.
विठ्ठल मारोतराव ढोणे (३४), जगदिश पुरुषोत्तम दांडगे, मारोती आसेवार (३५) सर्व रा. संकटमोचन, उमरसरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. विठ्ठल व मारोती हे दोघेही शासकीय कंत्राटदार असून मिश्रा यांनी वरिष्ठांकडे कामाच्या गुणवत्तेसंदर्भात तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे कामांचे बिल अडकलयाने वचपा काढण्याच्या उद्देशाने त्याचा खून केल्याची पोलिसांनी सांगितले. काल मध्यरात्री विठ्ठल ढोणे व जगदिश दांडगे हे दोघे बसने यवतमाळात येत असल्याची ‘टिप’ उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाला मिळाली. त्यावरून बसस्थानक परिसरात सापळा रचण्यात आला. पोलिसांनी लगेच जगदिशला अटक केली. मात्र विठ्ठल पोलिसांना चकमा देवून अॅटोने मुलकीकडे निघून गेल्याची माहिती जगदिशने पोलिसांना दिली. त्यावरून पथकाने लगेच अॅटोचा पाठलाग करून विठ्ठलला अटक केली. त्यापाठोपाठ मारोती आसेवार यालाही अटक करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेश रणधीर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अजय ढोले, इक्बाल शेख, विजय जाधव, गजानन धात्रक यांनी केली.
0
भरधाव ऑटोची डिझायर कारला धडक
हिंगोली अकोला राज्य महामार्गावर हिंगोली नाका ते अकोला नाका दरम्यान जड वाहनंाची वाहतुक मोठ्या प्रमाणात वाढली असून ही वाहतुक बायपासमार्गे शहराच्या बाहेरुन वळविण्यसाठी बायपास सुरु करण्याची मागणी सातत्याने होत आहे. जेणेकरुन शहराच्या अंतर्गत भागातून होणार्या वाहतुकीचा ताण कमी होईल. या महामार्गावर सातत्याने होणार्या लहानमोठ्या अपघातामध्ये महामार्गावर दुतर्ङ्गा वाढलेले अतिक्रमणही कारणीभूत आहे. तसेच हिंगोली नाका चौक, पुसद नाका चौक, बस स्टॅन्ड चौक, अकोला नाका चौक आदी भागात वाहतुक पोलीसांची ड्युटी असली तरी पोलीस वाहतुकीकडे लक्ष न देता केवळ वाहनधारकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसुल करण्यातच जास्त लक्ष देतात. पुसद नाका चौक तसेच पोस्ट ऑङ्गीस चौकामध्ये पोलीसांच्या डोळ्यादेखत मोठ्या प्रमाणात अवैध वाहतुक धुमधडाक्यात सुरु आहे. या अवैध वाहनामध्ये नियमापेक्षा दुप्पट तिप्पट संख्येने प्रवासी भरुन भरधाव वेगाने वाहतुक केली जात असल्यामुळे हे ही अपघातांचे एक प्रमुख कारण आहे.










