पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for May 22nd, 2014

रेल्वेची टॅक्टरला धडक एक ठार 0

रेल्वेची टॅक्टरला धडक एक ठार

images.jpeg1
गोंदिया – गोंदिया-बालाघाट रेल्वेमार्गावरील गर्रा रेल्वेस्टेशनजवळ गुरुवारी दुपारी १२च्या सुमारास रेल्वेने टॅक्टरला धडक दिली. या अपघातात टॅक्टर चालक गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. टॅक्टर वाळू घेऊन रेल्वे क्रॉसिंग करीत असतानाच अडकला आणि कटगीकडून बालाघाट मार्गे गोंदियाकडे येत असलेल्या रेल्वेने त्याला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, टॅक्टरचे चेसीस, ट्रॉली, इंजीनचे तुकडे झाले. तर काही रेल्वेच्या इंजीनसोबत २०० मीटर दूरपर्यंत फेकले गेले. टॅक्टरमध्ये तीन जण बसले होते. यातील एकाचा मृत्यू झाला तर इतर दोघे जखमी झाले आहेत. घटनेनंतर रेल्वे पोलिस आणि रेल्वेचे अधिकारी घटनास्थळावर दाखल झाले. रेल्वेची या अपघातात कुठलीही हानी झालेली नसून इतर वित्त व जिवित हानी झालेली नाही

May 22, 2014 in मुख्य पान
सोनिया गांधींकडून नरेंद्र मोदींचे अभिनंदन 0

सोनिया गांधींकडून नरेंद्र मोदींचे अभिनंदन

sm
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गुरुवारी नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. सोनिया गांधी यांनी मोदींना पत्र लिहून त्यांचे अभिनंदन केल्याचे अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सूत्रांनी सांगितले.
१६ मे रोजी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपने २८२ जागांवर विजय मिळवत बहूमत मिळवले होते. तर सत्ताधारी काँग्रेस पक्षाला केवळ ४८ जागा मिळाल्या होत्या. भाजपच्या या ऐतिहासिक विजयानंतर भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींचे जगभरातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी अभिनंदन केले होते.

May 22, 2014 in मुख्य पान
सोन्याच्या दरात ८०० रुपयांनी घट 0

सोन्याच्या दरात ८०० रुपयांनी घट

images
नवी दिल्ली- रिझर्व्ह बँकेने सोने आयातीचे निर्बंध शिथिल केल्याच्या दुस-याच दिवशी सोन्याच्या दरात ८०० रुपयांनी घट झाली. या वर्षातील सोन्याच्या किमतीतील दिवसभरातील ही सर्वात मोठी घट आहे. तसेच सोन्याचे दर दहा महिन्यांच्या निच्चांकावर आले आहेत.
नवी दिल्लीत सोन्याच्या दहा ग्रॅमचे दर २८ हजार ५५० इतके झाले आहेत. ऑगस्ट २०१३ नंतरचा हा सर्वात कमी दर आहे. तर मुंबईतही दहा ग्रॅमचा दर २७ हजार ८४० इतका झाला आहे.

May 22, 2014 in रोजगार
लाचखोर पोलीस अटकेत 0

लाचखोर पोलीस अटकेत

23-police-bribe1
यवतमाळ – मर्ग तपासामध्ये अटक करू नये व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्ती टाळण्यासाठी एका आरोपीला २० हजार रुपयाची लाच मागणाºया उमरखेड पोलिस ठाण्यातील पोलिस नाईकास अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज गुरुवारी ही कारवाई केली.
रवी रामचंद्र कपिले असे पोलीस शिपायाचे नाव असून तो उमरखेड पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कर्तव्यावर होता. ८/२०१४ क्रमांकाच्या मर्गचा तपास कपिलेकडे होता. याप्रकरणातील आरोपीवर गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच अटक व गुन्ह्यातील मोटरसायकल जप्ती टाळण्यासाठी २० हजार रुपयाची लाच मागितली होती. या बाबतची तक्रार आरोपीच्या मामाने ३ एप्रिल रोजी यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून ४ एप्रिल रोजी उमरखेड पोलीस ठाण्यात जाऊन पडताळणी केली असता सदर पोलीसाने २० हजार रुपये लाच स्वीकारल्याचे मान्य केले होते. त्यावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २२ मे रोजी दिलेल्या तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी कपिले याच्याविरुद्घ गुन्हा दाखल करून अटक केली.

May 22, 2014 in मुख्य पान
कार झाडावर आदळली, एक ठार,सहा जखमी 0

कार झाडावर आदळली, एक ठार,सहा जखमी

220520142630
यवतमाळ – लग्न समारंभ आटोपून यवतमाळकडे परत येत असताना भरधाव कार झाडावर आदळल्याची घटना आज गुरुवारी सकाळी १०.३० वाजता खानगाव (फाटा) घडली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला असून दोन मुलांसह सहाजण गंभीर जखमी झाले.
आशा अंगद राजाभोज (५८)रा. श्याम सोसायटी, असे मृत महिलेचे नाव आहे. महेंद्र अंगद राजाभोज (४२) रा. श्याम सोसायटी, कविता अंगद राजाभोज (३०), मंजुषा विवेक शाहू (३०)रा. इंदोर, हिमांशू महेंद्र शाहू (७), आयुषी विवेक शाहू (२),वेदायू महेंद्र राजाभोज, अशी जखमींची नावे आहे. महेंद्र राजाभोज हे स्वत: वाहन चालवित होते. त्यांचा अँग्लो हिंदी हायस्कूलजवळ फोटो स्टुडिओ आहे. राजाभोज कुटुंबीय चंद्रपूर येथे लग्नसमारंभासाठी गेले होते. रात्री हा समारंभ आटोपल्यानंतर सकाळी चंद्रपूर येथून एम.एच.०२/पीए-९१९६ क्रमांकाच्या सँट्रो वाहनाने यवतमाळकडे परत येत होते. दरम्यान महेंद्रला रात्रीच्या जागरणामुळे डुलकी येत होती. त्यामुळे काही वेळासाठी वाहन थांबविण्याचा सल्ला कुटुंबियांनी दिला. मात्र यवतमाळ अगदीजवळ असल्याचे सांगून पुढील प्रवासाला निघाले. खानगाव(फाटा) येथे पोहोचत नाही तोच डुलकी आल्याने त्यांचे भरधाव वाहन झाडावर जावून आदळले.

May 22, 2014 in रोजगार
अजय बन्सोड हत्याकांडातील दोन आरोपीस अटक 0

अजय बन्सोड हत्याकांडातील दोन आरोपीस अटक

images
यवतमाळ – पूर्व वैमनस्यातून तलावारीचे वार करून अजय भीमराव बन्सोडचा खून करण्यात आल्याची घटना बुधवारी रात्री पाटीपुरा येथे घडली होती. दरम्यान आज एटीएस पथकाने दोन आरोपींना अटक केली असून उर्वरीत एक आरोपी फरार आहे.
रितेश बाविस्कर, राजा जंगले रा. अशोक नगर असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. घटनेच्या दिवशीच आरोपी सचिन डोंगरे (२४), अनिकेत दिनेश वासनिक दोघेही रा. पाटीपुरा यांना अटक केली होती. दोन्ही आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या खून प्रकरणातील आरोपी नितीन धुळे रा. पाटीपुरा हा फरार असून त्यांचा शोधात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नागपूरला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई एटीएस पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राजेश टाले, सुभाष कामटकर, योगेश डगवार, आशिष चौबे, सुभाष नागदिवे, नितीन इंगोले, साजीद खान, दुषन पोपटकर यांनी केली.

May 22, 2014 in मुख्य पान

राज्यातील ४५ सहाय्यक गटविकास अधिकाºयांना बीडीओपदी पदोन्नती

नागपूर (विशेष प्रतिनिधी) / जिल्हा परिषद व ग्राम पंचायत मधील दूवा असलेल्या पंचायत समितीच्या गट ‘ब’ संवर्गातील सहाय्यक गटविकास अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या ४५ अधिकाºयांना गट ‘अ’ संवर्गात गटकविकास अधिकारी पदी पदोन्नती देण्यात आली.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडीचे ओ.बी.पाटील यांना जिल्ह्यातीलच अंबरनाथ येथे नियुक्ती देण्यात आली आहे. तर मुरबाडचे बाल विकास प्रकल्प अधिकरी एस. एन. फसाटे यांना बुलडाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये बढती देण्यात आली आहे. वाडा पंचायत समितीचे व्ही. के. पिंपळे यांना विक्रमगड मध्ये नियुक्त करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील भिवापूरचे सी.व्ही.आदमने यांना त्याच ठिकाणी बढती देण्यात आली आहे. सिंधुदूर्ग जिल्ह्यातील देवगडचे व्ही.एम.चव्हाण यांना तेथेच नियुक्ती देण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्ह्याचे अनिल अहिर यांना उमरखेडमध्ये तर घाटंजीचे आर. जी. गेडाम यांना घाटंजीतच बढती देण्यात आली आहे. राळेगावचे व्ही. एल. खेडकर यांना यवतमाळच्या गटविकास अधिकारीपदी तर वणीचे राजेश गायनर यांना पाढंरकवडामध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील पातूरचे एम.बी.घसाळकर यांना वाशीम जिल्ह्यातील रिसोडमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील पेठ पंचायत समितीचे सी.एल. पवार यांना जिल्ह्यातीलच देवळा येथे बढती देण्यात आली आहे. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयातील पी.ए.तट्टेना जिल्ह्यातीलच वरूडमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरचे जी. डी. साखरे यांना रत्नागिरी पंचायत समितीमध्ये बढती देण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंजच्या श्रीमती एस. टी. चव्हाण यांना सावनेर बीडीओपदी नियुक्त करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील पेण पंचायत समितीचे के. बी. पाटील यांना पेणमध्येच बढती देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत रोहयोतील एस. एस. भालेराव यांची पुणे जिल्ह्यातील इंदापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील बी. जी. कुरळे यांना रायगड जिल्ह्यातील उरणमध्ये बढती देण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातील आष्टीचे एच. एस. मेहर यांना चंद्रपूरमधील कोरपणा पंचायत समितीमध्ये नियुक्त करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेचे रोहयो विभागातील सहाय्यक गटविकास अधिकारी ए.एम.धारस्कर यांना नंदूरबारमधील अक्राणी-धडगाव पंचायत समितीच्या बीडीओपदी बढती देण्यात आली आहे. साताºयाचे जी. व्ही. बैरागी यांना सोलापूरमधील मोहोळमध्ये बढती देण्यात आली आहे. तर कोरेगाव पंचायत समितीचे व्ही.बी.साबळे यांना खंडाळयात नियुक्त करण्यात आले आहे. सांगोल्याचे एस. बी. माळी यांना वर्ध्यातील आर्वीमध्ये बढती देण्यात आली आहे. सांगलीमधील कवठेमहांकाळचे जी. बी. भोसले यांना येथीलच आटापाडी मध्ये बढती देण्यात आली आहे. गोंदियातील तिरोड्याचे सी.डी.मून यांना जिल्ह्यातीलच आमगावच्या बीडीओपदी नियुक्ती देण्यात आली आहे. कोल्हापूरमधिल आजरा पंचायत समितीचे एच. डी. नाईक यांना राधानगरीमध्ये बढती देण्यात आली आहे. परभणीमधील पाथरीचे टी. जी. जाधव यांना सेलूमध्ये बढती देण्यात आली आहे. नांदेडमधील अर्धापूरचे व्ही.एन.घोडके यांना मुदखेडमध्य तर मुदखेडचे जे. डी. गोरे यांना भोकर येथे, तर जालनामधील अंबडचे बी. बी. कुळकर्णी यांना बदनापूरला नियुक्त करण्यात आले आहे. औरंगाबादमधील सोयगावचे ए. बी. चौलवार यांना जालन्यातील जाफराबादमध्ये बढती देण्यात आली आहे. लातूरमधील अंनतपाळचे एन. एस. दाताळ यांना अहमदपूरमध्ये नियूक्त करण्यात आले आहे. नांदेडमधील हिमायतनगरचे व्ही. यू. सुरोशे यांना परभणीमधील जिंतूरला बढती देण्यात आली आहे. भंडारा जिल्हा परीषदेचे एम. डी. बारापत्रे यांना चंद्रपूरच्या बीडीओपदी नियूक्ती देण्यात आली आहे. रत्नागीरीतील दापोलीचे आर. बी. गुजर यांना अमरावतीमधील चांदूर रेल्वे येथे बढती देण्यात आली आहे. खेडच्या श्रीमती.व्ही.एस. गमरेंना बीडच्या बीडीओपदी बढती देण्यात आली आहे. भंडारा मोहाडीचे एन. जी. वानखडे यांना नागपूरमधील रामटेकमध्ये नियुक्त करण्यात आले आहे. तर सिंधुदूर्गमधील दोडामार्गचे एस.एम.चव्हाण यांना अहमदनगरमधील जामखेड येथे बढती देण्यात आली आहे. वर्ध्याचे बी. एम. मेघावत यांना यवतमाळमधील झरी जामणी येथे नियुक्त करण्यात आले आहे. चंद्रपूरमधील सिंदेवाहीचे बी. बी. गजबे यांना बल्लारपूरमध्ये बढती देण्यात आली आहे. तर लाखणीच्या एन. आर. जमईवार यांना गडचिरोलीमधील वडसा-देसाईगंजमध्ये नियुक्त करण्यात आले आहे. भद्रावतीचे आर. डी. बागडे यांना नागपूरला नियुक्त करण्यात आले आहे. रायगडमधील श्रीवर्धनच्या श्रीमती एस. के. भगत यांना भंडारा जिल्ह्यात पवनीमध्ये नियुक्त करण्यात आले आहे. लातूरचे ए.आर. कुंभार यांना औसामध्ये बढती देण्यात आली आहे. रत्नागिरीचे बी. बी. जाधव यांना नागपूर जिल्ह्यात पारशिवणीमध्ये नियुक्त करण्यात आले आहे. साताºयातील जावळीचे एस.एस. मारकड यांना बुलडाण्यातील नांदूºयाच्या बीडीओपदी बढती देण्यात आली.

 

May 22, 2014 in मुख्य पान