
नेर – तथागत भगवान गौतम बुद्घाने ज्या प्रमाणे राजाची गादी सोडून मानव घडविण्यासाठी जिवन खर्ची घातले असून त्यांचे विचार तळागळात पोहचविण्याची गरज आहे. असे प्रतिपादन आ. संजय राठोड यांनी केले.
स्थानिक भिमनगरात बौद्घ पोर्णिमे निमित्य आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. सर्वप्रथम भगवान गौतम बुद्घाच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन केले. पुढे बोलताना आ. राठोड म्हणाले की, गौतम बुद्घाने सांगितल्या प्रमाणे धर्म आणि सत्य यात संघर्ष असेल तर सत्याचे अनुसरण करा असे आवाहन केले. यावेळी नगराध्यक्ष पवन जयस्वाल, संजय दारव्हटकर, नामदेव खोब्रागडे, विनोद जयसिंगपूरे, दिपक मिसळे, अशोक फुलझेले, प्रा. सागर गावंडे, प्रा. नाजुक धांदे, गंगाधन मिसळे, सिद्घरर्थ मिसळे, सुलोचना भोयर, नितीन कराळे उपस्थित होते.
Archive for May 14th, 2014
0
गौतम बुद्घाचे विचार तळागळात पोहविण्याची गरज- आ. राठोड
0
डॉ. आंबेडकरांचा जाती निर्मूलनाचा लढा उच्च मूल्यांवर आधारीत- अरुंधती रॉय

पांढरकवडा – उच्च-नीचतेला व असमानतेला धर्माची साथ अथवा मान्यता मिळाल की, शोषक व्यवस्था निर्माण होत असते. आज दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, स्त्रीया आणि कामगार अशाच व्यवस्थेच्या मोठ्या प्रमाणात बळी होत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ‘जाती निर्मूलन’ हा ग्रंथ आणि त्याला महात्मा गांधी यांनी दिलेले प्रत्यूत्तर वाचल्यानंतर खोलात जावून संशोधन केले. आणि माझ्या हातून ‘डॉक्टर आणि संत’ हे प्रस्तावना पुस्तक लिहील्या गेले. जाती अस्तित्वाचे महात्मा गांधी यांनी समर्थन केले. उलट डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाती निर्मूलनाच्या लढ्याला उच्च मानवी मुल्यांचे अधिष्ठान दिले, असे विचार आंतरराष्टÑीय ख्यातीच्या व बुकर आणि मॅगसेसेन पुरस्कार प्राप्त लेखिका अरुंधती रॉय यांनी व्यक्त केले.
येथील सामाजिक कार्यकर्ते प्रा. हरिश्चंद्र भेले, डॉ. लिला भेले यांच्या निवासस्थानी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. आधुनिक झगमगाटाच्या वातावरणातही लेखकांना लोकांच्या मनात जागा असल्याबद्दल समाधान व्यक्त करुन अरुंधती रॉय म्हणाल्या की, द. आॅफ्रिकेतील महात्मा गांधीच्या आंदोलना संदर्भात इतिहास लेखनातून आणि पाठ्यपुस्तकातून चुकीचे सांगितल्या जात आहे. परिणामी अनेक आंदोलना बाबत गांधी-आंबेडकर यांच्यातील खरा वैचारिक संघर्ष पुढे आला नाही. सुरुवातीला प्रा. हरिश्चंद्र भेले यांनी प्रास्ताविक केले. डॉ. लिला भेले, डॉ. अजित चाहल, प्राचार्य डॉ. रमजान विराणी, अॅड. पंकज शेटे, अॅड. माणिक चौधरी, प्रा. झिलपिलवार, प्रा. राहुल दखणे, प्रभुतींनी अरुंधती रॉय यांचे स्वागत केले. पांढरकवडा या आदिवासी बहुल परिसरासाठी हा एैतिहासीक क्षण असल्याचे उपस्थित मान्यवरांनी उद्गार काढले. यावेळी सुनिल सरदार, डॉ. ग्रँड उपस्थित होते.
0
नाशिकमध्ये मुलीवर सामूहिक बलात्कार

नाशिक (पीटीआय) – नाशिकच्या मंगलवाडी झोपडपट्टीत एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कार करणा-यांमध्ये मुलीचा भाऊ आणि काकाचाही समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.
पिडीत मुलगी घरात एकटी असल्याचा फायदा उचलून २७ एप्रिल आणि आठ मे ला चौघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. आधी या मुलीला मारहाण करण्यात आली त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. पिडित मुलीच्या आईचे वर्षभरापूर्वी निधन झाले आहे. मुलीचे वडिल मजूर असून, ते कामावर गेल्यानंतर या चौघांनी बलात्कार केला.पिडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर सरकारवाडा पोलिसांनी मंगळवारी तिघा आरोपींना अटक केली. राजू दारुप्पा (२२), नरेश भंडारी (२२), प्रभाकर हरिजन (२२) अशी आरोपींची नावे आहेत. तिघेही मगंलवाडी झोपडपट्टीतच रहातात. पोलिस मुलीच्या भावाचा राजु हुनमंता मालाला (२२) शोधत आहेत. पोलिसांनी आयपीसीच्या विविध कलमांखाली चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
0
हैदराबादमध्ये संचारबंदी, दोघांचा मृत्यू

हैदराबाद (पीटीआय) – दोन गटांमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारानंतर हैदराबादमधील राजेंद्रनगरमध्ये अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांच्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला.
बुधवारी पहाटे धार्मिक झेंडा जाळण्यावरुन या हिंसाचाराला सुरुवात झाली. बहादूरपूरामधील सिख चवानी भागात हा हिंसाचार झाला. झेंडा जाळण्याच्या घटनेसाठी दोन युवकांना जबाबदार धरुन, एका समाजाच्या गटाने या युवकांवर हल्ला केला. त्यानंतर या भागातील तणाव वाढला.
राजेंद्रनगरमध्ये काही घरांवर हल्ले झाले असून, या भागात जाळपोळीच्या घटना घडल्याचे वृत्त आहे. सायबराबादचे पोलिस आयुक्त सी.व्ही.आनंद आणि अन्य वरिष्ठ अधिका-यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
मतमोजणीच्यावेळी सुरक्षेसाठी आलेल्या पोलिस आणि निमलष्करी दलाच्या सशस्त्र तुकडया या भागात तैनात करण्यात आल्या आहेत. वातावरणात तणाव असला तरी, परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
0
तीन दिवस आधीच दाखल होणार मान्सून!

पुणे (पीटीआय) – मान्सून आपल्या नियमीत वेळेच्या तीन दिवस आधी म्हणजे १७ मे रोजीच अंदमान बेटावर पोहचण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण मान्सून २० मे रोजी अंदमान बेटावर दाखल होते. मात्र यावेळी तो आपल्या नियोजीत वेळेच्या तीन दिवस आधी अंदमान बेटावर पोहचण्याची शक्यता असल्याचे भारतीय हवामान खात्याने म्हटले आहे.
जर मान्सूनच्या पुढील प्रवासाला अनुकुल वातावरण मिळाले तर तो नियमीत वेळेत भारतात दाखल होऊ शकतो. सध्या दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सूनसाठी अनुकुल वातावरण आहे. त्यामुळे १७ मे पर्यंत बंगालच्या दक्षिण पूर्व सागरात दाखल होऊ शकतो असे आयएमडीने म्हटले आहे.
सर्वसाधारणपणे मान्सून एक जून रोजी केरळमध्ये दाखल होते. त्यानतंर १५ जुलैपर्यंत तो संपूर्ण देश व्यापतो. यावर्षी मान्सूनवर ‘एल निनो’ या घटकाचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे मान्सून सरासरीच्या ९५ टक्केच असण्याची शक्यात हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
ई-फायलींगच्या माहितीसाठी प्रकाशक संपादक कार्यशाळा
वाशीम : प्रसार माध्यमातील दैनिके व नियतकालीकांच्या वार्षिक विवरणीच्या लेखा परिक्षणासाठी रजिस्ट्रॉर ऑङ्ग न्युजपेपर्स कडून ऑनलाईन सुविधा उपलब्ध झाली असून हे लेखा परिक्षण ई-ङ्गायलींगच्या माध्यमातून सुरु करण्यात आले आहे. एप्रिल ते मार्च या कालावधीतील वार्षिक विवरणी लेखा परिक्षकांच्या तपासणीसह आरएनआय कार्यालयाला ३१ मे पर्यत ई-ङ्गाईलींगच्या माध्यमातुन कसे पाठवावे याबाबतची माहिती अद्यापही अनेक प्रकाशक व संपादकांना नाही. त्यामुळे नियमित कागदपत्रांची पुर्तता न करु शकणार्या यापैकी अनेक वृत्तपत्रांची नोंद आरएनआय कार्यालयाला होत नाही. व याचा ङ्गटका प्रकाशकांना बसतो. त्यासाठी आरएनआय कार्यालयाने ई-ङ्गायलींगच्या माहितीसाठी दि. २० ते ३१ मे २०१४ च्या दरम्यान आरएनआय च्या दिल्ली येथील मुख्य कार्यालयामध्ये ई-ङ्गायलींग ङ्गॅसिलिटेशन कॅप (कार्यशाळा) चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत वार्षिक विवरणी इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन कशी भरावी याबाबतची सखोल माहिती देण्यात येणार आहे. तरी दैनिके व नियतकालीकांच्या प्रकाशक व संपादकांनी या कार्यशाळेला उपस्थित राहून ऑनलाईन ई-ङ्गायलींगची माहिती जाणून घ्यावी असे आवाहन रजिस्ट्रॉर ऑङ्ग न्युजपेपर्स ङ्गॉर इंडिया नवी दिल्लीचे सहाय्यक प्रेस रजिस्ट्रॉर एस.डी.सुरेकर यांनी संकेतस्थळावरुन केले आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी आरएनआय डॉट एनआयसी डॉट कॉम या संकेतस्थळावर किंवा ०११-२६१०७५०४, २६१०८४३२, २६१६२६३२ या क्रमांकावर संपर्क साधावा.











