पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for May 21st, 2014

जिल्हा वार्षिक योजनेत तिप्पट वाढ

 

यावर्षी ४१५ कोटींची कामे होणार

यवतमाळ – जिल्हा वार्षिक योजना विकासाला हातभार लावणारी अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत कामांच्या मंजूरीचे अधिकार जिल्ह्याला असल्याने आणि मंजूर कामांना तातडीने निधी उपलब्ध होत असल्याने गेल्याकाही वर्षात सर्वसामान्यांना दिलासा देणारी शेकडो कामे योजनेतून झाली आहे. गेल्या सहावर्षात या योजनेचा विकास आराखडा तिप्पटीने वाढला आहे. योजनेतून गेल्यावर्षी ३५३ कोटींची विकास कामे झाली तर यावर्षी ४१५ कोटींची कामे होणार आहे.

जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींचा समावेश असलेल्या जिल्हा नियोजन समितीकडून दरवर्षी जिल्हा वार्षिक आराखडा तयार होत असतो. या आराखड्यात सर्वसाधारण आराखडा, आदिवासी उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजना अशा तीन उपयोजनांचा समावेश असतो. सन २००८-९ मध्ये या तीनही उपयोजनेंतर्गत जिल्ह्याचा वार्षिक आराखडा ११६.६२ कोटी इतका होता.

पालकमंत्री डॉ. नितीन राऊत व जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या भूमिका व आग्रहामुळे हा आराखडा दरवर्षी सातत्याते वाढत गेला. सन २००९-१० मध्ये जिल्ह्यात या योजनेंतर्गत १५७ कोटी रुपयांचा विकास कामांवर खर्च झाला. सन २०१०-११ मध्ये २०६ कोटी, सन २०११-१२ मध्ये २७२ कोटी, सन २०१२-१३ मध्ये ३१४ कोटी तर गेल्यावर्षी सन २०१३-१४ मध्ये ३५२ कोटी ५३ लाख रुपये या योजनेंतर्गत जिल्ह्यात विविध विकास कामांवर खर्च झाले.

जिल्हा विकास आराखडा हा जिल्ह्याच्या विकासासाठी असलेला अतिशय महत्वाचा आराखडा आहे. त्यामुळे या आराखड्यात सातत्याने वाढ करण्यावर भर राहीला आहे. या आराखड्यात होणारी वाढ जिल्ह्याच्या विकासात भर घालणारी आहे. त्यामुळेच सन २०१४-१५ च्या आराखड्यात वाढ व्हावी म्हणून पालकमंत्री डॉ.नितीन राऊत व जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी अमरावती येथे झालेल्या विभागीय नियोजन बैठकीत या आराखड्यांतर्गत अधिक निधी मिळावा म्हणून वित्तमंत्र्यांकडे आग्रह धरल्याने या वषीर्चा जिल्हा वार्षिक आराखडा ४१६ कोटीवर पोहचला आहे.

जिल्ह्याला मंजूर झालेला हा आराखडा विभागात सर्वात मोठा आराखडा ठरला आहे. या योजनेंतर्गत ग्रामीण भागात विकास कामांवर भर असल्याने रस्ते, ग्रामीण भागात पायाभूत सुविधा, पाणी पुरवठ्याच्या सुविधा, अत्यावश्यक बांधकामे, लहान-मोठे तलाव, जलसंधारणांची कामे, शेतकºयांना व्याज सवलत योजना, शेतकºयांना जोडधंदे आदी स्वरुपाचे शेकडो कामे या योजनेत करण्यात आली आहे.

May 21, 2014 in मुख्य पान

दोघा तरुण भावंडांचा मृत्यू

आर्णी – तालुक्यातील केळझरा (कोमटी) येथील दोन सख्ख्या तरूण भावंडांचे मृतदेह आज सकाळी शेतात आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे. प्रमोद (२४) व प्रवीण उत्तम पवार (२०) अशी मृतकांची नावे असून विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

हे दोघेही भाऊ २० मेच्या रात्री मक्त्याने केलेल्या शेतात जागलीसाठी गेले होते. आज २१ मे च्या सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास त्यांचे मृतदेह भूषण भगत यांच्या शेतात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सर्जेराव गायकवाड यांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी आर्णी येथे पाठविले.

 

आसाममध्ये अपघातात ११ कलाकारांचा मृत्यू 0

आसाममध्ये अपघातात ११ कलाकारांचा मृत्यू

mahad-accident

गुवाहाटी – पश्चिम आसाममधील गोलपारा जिल्ह्यातील धुपधारा येथे बुधवारी पहाटे कलाकारांच्या गाडीला भीषण अपघात झाला. या अपघातात ११ कलाकारांचा मृत्यू झाला असून, दोन जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये उदयोन्मुख गायक सुमन महंताचा समावेश आहे.

पहाटेच्या सुमारास धुपधारा येथील रस्त्यावर कलाकारांना घेऊन जाणारे प्रवासी वाहन आणि ट्रकची समोरासमोर टक्कर झाली. ही टक्कर इतकी जबरदस्त होती की, कलाकारांच्या गाडीतील नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. दोघांचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला.

एका जखमीवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुस-या जखमीची प्रकृती गंभीर असून, त्यांना गुवहाटीच्या वैद्यकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रक चालक ट्रक तेथेच सोडून घटनास्थळावरुन पसार झाला होता. पण नंतर त्याला पोलिसांनी अटक केली.

May 21, 2014 in मुख्य पान
केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी 0

केजरीवाल यांना न्यायालयीन कोठडी

index.jpeg1नवी दिल्ली- दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी १० हजार रुपयांचा जातमुचलका न भरल्याने त्यांना २३ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दिल्लीतील पटीयाला हाऊस न्यायालयाचे महानगर दंडाधिकारी गोमती मनोचा यांनी बुधवारी हा निर्णय दिला.

या वर्षी ३१ जानेवारी रोजी केजरीवाल यांनी भारतातील ‘सर्वाधिक भ्रष्ट’लोकांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते नितीन गडकरी यांचेही नाव होते. त्यामुळे गडकरी यांनी केजरीवाल यांच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता. खोट्या, निराधार, कारस्थानी आणि बदनामीकारक दाव्यांमुळे आपली प्रतिमा मलीन झाली असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले होते.

या याचिकेच्या सुनावणी दरम्यान, जामीनासाठी केजरीवाल यांनी १० हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले. मात्र केजरीवाल यांनी १० हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका भरण्यास नकार दिला. त्यामुळे त्यांना कोठडीत जावे लागले आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी २३ मे ला होणार आहे. तोपर्यंत केजरीवाल यांना तिहार तुरुंगात रहावे लागणार आहे. कोणताही गुन्हा केला नाही, हे एक राजकीय प्रकरण आहे, असे सांगत केजरीवाल यांनी वैयक्तिक जातमुचलका भरण्यास स्पष्ट नकार दिला. तसेच याआधीही अशाप्रकारे न्यायालयात खटले दाखल असून तेथे न्यायालयाने आपल्याला नियमित तारखेला हजर होण्याच्या अटीवर जामीन दिल्याचे केजरीवाल यांनी सांगितले.मात्र आपण एका आप सारख्या जबाबदार पक्षाचे नेतृत्व करता, त्यामुळे आपण आम आदमी प्रमाणे कायदेशीर प्रक्रीया पूर्ण कराव्या, असे निर्देश न्यायालयाने दिले. मात्र तरीही केजरीवाल आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने न्यायालयाने त्यांना २३ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

May 21, 2014 in रोजगार
गुगल जगातील सर्वोत्कृष्ट ब्रँड 0

गुगल जगातील सर्वोत्कृष्ट ब्रँड

indexपॅरिस- जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेल्या गुगलला सर्वोत्कृष्ट ब्रँडचा किताब मिळाला आहे. भांडवलाच्या तुलनेत गुगलने अ‍ॅपलला मागे टाकले.

मिलवर्ड ब्राउन या आघाडीची संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार गुगलची ब्रँड व्हॅल्यू १५८.८४ अब्ज डॉलरवर गेली आहे. गेल्या वर्षभरात कंपनीच्या ब्रँड व्हॅल्यूत ४० टक्क्यांची वाढ झाली असून इतर ब्रँडच्या तुलनेत गुगल महागडा ब्रँड ठरला आहे. गेल्या वर्षभरात गुगलने अनेक नावीन्यपूर्ण गॅजेट्स तंत्रज्ञान जगतात आणली. यामध्ये गुगल ग्लास तसेच गुप्तचर सेवांसाठीची मोठी गुंतवणूक आणि नव्या भागीदारी करण्यात कंपनीने भर दिला असल्याचे मिलवर्ड ब्राउनचे प्रमुख बेनॉइट ट्रान्झर यांनी सांगितले.

गुगल ग्लास या इंटरनेटशी जोडल्या गेलेल्या चष्म्यासाठी कंपनीने लुक्सोटिका या रेबॅन नंतरच्या आघाडीच्या कंपनीशी करार केला. तर इतर उत्पादनांसाठीही गुगलने आघाडीच्या कंपन्यांशी करार केला. यातून ग्राहकांमध्ये गुगलबाबत आश्वासक वातावरण निर्माण झाले असल्याचे ट्रान्झर यांनी सांगितले. दरम्यान, सर्वात महागडा ब्रँड म्हणून गेल्या तीन वर्षापासून आघाडीवर असलेल्या अ‍ॅपलच्या ब्रँड व्हॅल्यूत मात्र २० टक्क्यांची घट झाली आहे. अ‍ॅपलचे बाजारमूल्य १४७.८८ अब्ज डॉलपर्यंत खाली आले आहे. जगातील १०० आघाडीच्या ब्रँडमध्ये पहिल्या १० कंपन्या अमेरिकेच्या आहेत. गुगल, अ‍ॅपलनंतर आयबीएम, मायक्रोसॉफ्ट यांची सर्वोत्तम ब्रँड म्हणून निवड झाली. मायक्रोसॉफ्टने गेल्या वर्षभरात चांगली कामगिरी केली असून कंपनीच्या ब्रँड व्हॅल्यूत २९ टक्क्यांची वाढ झाली. फास्ट फूडमधील आघाडीचा ब्रँड असलेल्या मॅकडोनाल्डची ब्रँड व्हॅल्यू ८५.७१ अब्ज डॉलर असून त्याखालोखाल कोका कोला ब्रँड आहे. कोका कोलाची ब्रँड व्हॅल्यू ८०.६८ अब्ज डॉलर असल्याचे मिलवर्ड ब्राउनने आपल्या अहवालात म्हटले आहे.

May 21, 2014 in मुख्य पान
माओवादी संघटनेच्या पत्रकाने व्यापाºयात दहशत 0

माओवादी संघटनेच्या पत्रकाने व्यापाºयात दहशत

News4

पाच लाखाची मागणी

फुलसावंगी  (यवतमाळ)-  येथील व्यापाºयांच्या दुकानात माओवादी संघटनेचे पत्रके आढळले असून पाच लाखाची मागणी केली आहे. अन्यथा स्वत:च्या जिवित्वास स्वत: जबाबदारी राहील  असेही पत्रकात नमुद केल्याने व्यापाºयात दहशत पसरली आहे.

महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे मोठी बाजारपेठ असून येथील नेहमीप्रमाणे  मंगळवारी  व्यापाºयांनी आपली दुकाने उघडली. तेव्हा बालाजी कृषी केंद्र, पांडे भुसार मार्केट, साई अँग्रो एजन्सी, दत्तकृपा कृषी केंद्र, गौरीशंकर कृषी केंद्र, जयस्वाल भुसार मार्केट या सहा सहा दुकानांमध्ये माओवादी संघटनेच्या नावाने लिहिलेली पत्रके आढळली. या पत्रकात माओवादी संघटना बीट क्र. ३६ चा कमांडर रामक्रिपा बाली याच्या आदेशाने पाच लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. २१ मे रोजी सारकिन्ही येथील बसस्थानकावर पाच लाख रुपये घेऊन येण्याचे या पत्रकात म्हटले आहे. पैसे दिले नाही तर जीवाची जबाबदारी तुमच्यावर राहील, अशी धमकीही दिली असून  ‘जय महाकाल’ असे लिहिलेले आहे. या पत्रकामुळे व्यापाºयात  खळबळ उडाली असून पत्रके नक्षलवाद्यांची आहेत किंवा अज्ञात समाजकंटकाने हा खोडसाळपणा करुन व्यापाºयांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला हे गुढ अजूनही कायम आहे. तसेच महागाव तालुक्याच्या सिमेवरील जंगलामध्ये खरच नक्षल सुरु झाली काय अशी चर्चाही नागरिकांमध्ये सुरु आहे. याप्रकरणी व्यापाºयांनी महागाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून अज्ञात व्यक्तीविरुद्घ खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

May 21, 2014 in मुख्य पान
सुगंधीत तंबाखूसह १७ लाखाचा ऐवज जप्त 0

सुगंधीत तंबाखूसह १७ लाखाचा ऐवज जप्त

IMG-20140521-WA0005 copyयवतमाळ – यवतमाळातून पांढरकवड्याकडे चोरट्या मार्गाने नेल्या जात असलेल्या  सुगंधीत तंबाखूसह तीन आरोपींना मोहदा येथे सापळा रचून जेरबंद केले. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केली. यात सुगंधीत तंबाखूसह १७ लाखाचा ऐवज जप्त करण्यात आला.

राज्यात गुटखाबंदी असून परराज्यातून तंबाखूजन्य पदार्थाची खुलेआम आयात होत आहे. विशेष म्हणजे अन्न व औषधी प्रशासन मंत्री ना. मनोहर नाईक यांचा हा गृह जिल्हा आहे. महिनाभरात पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे मंत्र्याच्या जिल्ह्यातच गुटखाबंदीचा बोजवारा उडाल्याचे स्पष्ट होते. यवतमाळ येथून पांढरकवड्याकडे दोन वाहनातून सुगंधीत तंबाखू नेल्या जात असल्याची टिप विशेष पथकाला मिळाली. त्यावरून मोहदा येथे त्यांनी सापळा रचला. बोलेरो व टाटा मॅजिक हे दोन्ही वाहन मोहद्यात पोहोचताच एका वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यात सुगंधीत तंबाखू आढळून आला. तर एका वाहनाचा पाठलाग करून पांढरकवडा नजीक पकडण्यात आले. दोन्ही वाहनात सुगंधी तंबाखू आढळून आला. या तंबाखूची किंमत ११ लाख १ हजार ७५० रुपये असून १ लाख २५ हजाराची रोकड व दोन वाहनही जप्त केले. एकूण ही कारवाई १६ लाख २६ हजार ७५० एवढी आहे.  ललित जोधवानी रा.सिंधी कॅँम्प, संदीप राठोड रा. वाघापूर, मुनेश्वर वाट रा. मोहदा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. ही कारवाई विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक राजू वटाने, गजानन डोंगरे, विशाल भगत, भोजराज करपते, गणेश देवतळे यांनी केली.

May 21, 2014 in मुख्य पान
  पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून , दोन आरोपींना अटक 0

पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून , दोन आरोपींना अटक

images

यवतमाळ – पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून करण्यात आल्याची घटना काल रात्री ९ वाजता दरम्यान महात्मा फुले (पाटीपुरा) चौकात घडली.अजय भीमराव बनसोड (२८)रा. सेजल रेसिडेंन्सी, अंबिकानगर यवतमाळ, असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी तत्काळ शोध मोहिम राबवून सचिन डोंगरे (२४), अनिकेत दिनेश वासनिक दोघेही रा. पाटीपुरा यांना अटक केली. तर रितेश बाविस्कर रा. अशोकनगर,  राजा विशाल कोल्हे, नितीन धुळे रा. पाटीपुरा हे आरोपी फरार आहे.

या खूनप्रकरणाचा म्होरक्या रितेश हा पाटीपुºयात बल्ली नावाने प्रसिद्ध आहे. अजय व बल्लीमध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी वाद झाला होता. तसेच खटके उडत होते. याचा वचपा काढण्यासाठी पाचही आरोपींनी अजयला संपविण्याचा कट रचला. काल मंगळवारी रात्री दरम्यान अजय बनसोड हा बाहेरुन परतत असताना धबा धरुन बसलेल्या पाचही जणांनी धारदार शस्त्राने त्याचावर हल्ला चढविला. लगेच अजयला रक्ताच्या थारोळ््यात सोडून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची वार्ता परिसरात पसरताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळ गाठून अजयला कै.वसंतराव नाईक वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करताच मृत घोषित केले. यामुळे पाटीपुरा भागात काहीवेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी ज्योती अजय बनसोड (२४) हिने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यात पाचही आरोपींनी कट रचून खून केल्याचे तक्रारीत नमूद केले. त्यावरून पोलिसांनी बल्ली बाविस्कर, राजा कोल्हे, नितीन धुळे,अनिकेत वासनिक, सचिन डोंगरे यांच्याविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. घटना घडताच जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पोलीस पथकाला सूचना देत आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश दिले. पथकाने रात्री दरम्यान शोध मोहिम राबवून दोघांना अटक केली. नेमका खून कोणत्या कारणातून करण्यात आला याचा शोध शहर पोलीस घेत आहे.

May 21, 2014 in मुख्य पान