पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for April 28th, 2015

 सालेकसा तालुक्यात सापडले नक्षली साहित्य 0

सालेकसा तालुक्यात सापडले नक्षली साहित्य

styvpf
गोंदिया – सालेकसा तालुक्यातील सालईटोला गावाच्या लिलुकुचा वन परिक्षेत्रात मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य सापडले आहे. गोंदिया नक्षल सेल आणि सालेकसा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन जंगल परिसर पिंजून काढण्यात आला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य मिळाले.
सालईटोलाच्या लिलुकचुवा वनक्षेत्रामध्ये एका ड्रममध्ये घालून हे साहित्य पुरले होते. यामध्ये नॉन इलेक्ट्रिक २७ नग डेटोनेटर ४८ नग, काळ्या रंगाची स्फोटक पावडर ५०० ग्रॅम, पांढऱ्या रंगाची स्फोटक पावडर १०० ग्रॅम, सिल्वर रंगाची स्फोटक पावडर १० ग्रॅम, सिल्वर रंगाची स्फोटक कांडी १०० ग्रॅम – २ नग, नियोडाईन, एक वॉकमन, एक कॅसेट, प्लास्टिक बॉक्स, कॅम्पस ट्रेकिंग बुटाच्या ६ जोड्या, तुरटी सारखा दिसणारा पदार्थ १०० ग्रॅम या गोष्टींचा समावेश आहे. एखादी घातपाताची कारवाई करण्यासाठी हे साहित्य पुरुन ठेवल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे

९ हजार एनजीओंचे परवाने रद्द 0

९ हजार एनजीओंचे परवाने रद्द

download
नवी दिल्ली, दि. २८ – परदेशातून देणग्या स्वीकारणा-या गैरसरकारी संस्थांवर (एनजीओ) मोदी सरकारने कारवाईचा धडाका सुरु केला असून सोमवारी रात्री सरकारने तब्बल ८,९७५ एनजीओंचे परवाने रद्द केले आहेत. मोदी सरकारच्या या आक्रमक पवित्र्यांनी एनजीओ चालवणा-यांचे धाबे दणाणले आहेत.
काही दिवसांपूर्वी मोदी सरकारने ग्रीनपीस संघटनेच्या विदेशातून मिळणा-या मदतीवर निर्बंध घातले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने भारतातील १०, ३४३ एनजीओंना नोटीस पाठवत २००९ -१०, २०१० -११ आणि २०११ -१२ या आर्थिक वर्षातील रिटर्न सादर करायला सांगितले होते. यात परदेशातून मिळालेल्या देणगीचा नेमका आकडाही समजणार होता. यातील फक्त २२९ एनजीओंनी त्यांचा वार्षिक लेखाजोखा गृहमंत्रालयाला सादर केला आहे. गृहमंत्रालयाच्या नोटिसीला उत्तर न देणा-या ८, ९७५ एनजीओंचे परवाने रद्द करण्यात आल्याची घोषणा मंगळवारी रात्री उशीरा करण्यात आली. यातील ५१० एनजीओ अशा आहेत ज्यांना नोटीस पाठवण्यात आली मात्र ती कोणीच स्वीकारली नसल्याने नोटीस परत आली.