पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March, 2015

विहिरीत गुदमरून पाच जणांचा मृत्यू, कारेगाव गावावर शोककळा 0

विहिरीत गुदमरून पाच जणांचा मृत्यू, कारेगाव गावावर शोककळा

wadki 1

यवतमाळ, दि. ३१ – राळेगाव तालुक्यातील कारेगाव वडगाव येथे पाणीपुरवठा करणाºया सार्वजनिक पाणवठ्याच्या विहिरीत गाळ काढणाºया पाच जणांचा विहीरीत गुरमरून मृत्यू झाला. आज ३१ मार्च रोजी ही घटना घडली असून दोन जणांना वाचविण्यात यश आले आहे.

गणेश राजेश्वर नंदूरकर (२४), विजय पुरुषोत्तम नंदूरकर (४५), शंकर रमेश जोगी (२८), आशीष उर्फ पिंटू तुकाराम मडावी (२८), भुपेश कवडू कुडमेथे (३२) असे विहिरीत गुदमरून मृत्यू पावलेल्यांची नावे आहे. सार्वजनिक विहिरीत गेल्या कित्येक दिवसांपासून गाळ साचल्याने त्या विहिरीचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा दाखला प्रयोेगशाळेने ग्रामपंचायतीला दिला होता. त्यामुळे ग्रामसेविका वंजारी यांनी गावातील गणेश नंदूरकर, शंकर जोगी यांना या विहिरीतील गाळ काढण्याचे काम गुत्त्याने दिले. आज मंगळवारी या मजुरांनी विहिरीतील गाळ काढण्यासाठी पाणी उपसायला आॅईल इंजीन लावले होते. विहिरीचे अर्धे तोंड आधीच सिमेंटच्या छताने झाकण्यात आले होते. त्यामुळे आतमध्ये प्राणवायू कमी प्रमाणात जात असताना हे मजूर गाळ काढण्या कामी लागलेत. जोमात काम सुरू असतानाच अचानकपणे या खोल विहिरीत इंजीनचा धूर सर्वत्र व्यापल्याने तिथे कार्बनडाय आॅक्साईडने जागा घेतली. परिणामी, या मजुरांना आॅक्सीजन न मिळाल्याने गुदमरून आरडाओरडही केली. त्यांचा आवाज ऐकून वाचविण्यासाठी विजय नंदूरकर, भुपेश कुडमेथे, ग्रा. पं. चपराशी असलेल्या आशीष मडावी याने धाव घेऊ न विहिरीत उतरले. मात्र तिथे निर्माण झालेल्या विषारी वायूने या तिघांचाही बळी घेतला. त्यात सुदैवाने रामू देवराव बावणे (३०) व प्रफुल हिवरकर (२२) या मजुराला सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र त्याचीही प्रकृती अतिशय गंभीर असून उपचारार्थ त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल केले आहे. या मजुरांवरील आपत्तीची माहिती मिळताच राळेगावचे तहसीलदार सुरेश कव्हळे, बीडीओ विनोद खेडकर, वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार अमोल माळवे आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी घटनास्थळी धावून गेले. त्यांनी सर्वतोपरी या मजुरांना वाचविण्यासाठी प्रयत्न केले. जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडूनही तिथे मदतकार्यास पथक रवाना करण्यात आले होते.

March 31, 2015 in मुख्य पान
आईनेच केला प्रियकराच्या मदतीने मुलीचा खून 0

आईनेच केला प्रियकराच्या मदतीने मुलीचा खून

images..
मुंबई- मानखुर्दमध्ये निर्दयी आईनेच आपल्या आठ वर्षीय मुलीची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी आईला अटक केली असून प्रियकर मात्र फरार झाला आहे.
उषा भोले (२८) ही महिला दोन वर्षांपासून आपल्या पतीपासून विभक्त रहाते. मानखुर्द येथील लल्लूभाई कंपाऊंड परिसरात ती मुलगी तनिषा (८) आणि १२ वर्षांच्या मुलासह राहत होती. दरम्यान तीचे अविनाश फुलपगारे याच्याशी अनैतिक संबंध होते. तिच्याच घरी तो राहत होता. रविवारी रात्री दारुच्या नशेत घरी आलेल्या अविनाशने तनिषाला घराबाहेर जाण्यास सांगितले. मात्र, ती घराबाहेर गेली नाही, त्यामुळे रागाच्या भरात त्याने तिचे डोके जमिनीवर आपटले. त्यात ती बेशुद्ध झाली. नंतर कोणाला संशय येवू नये म्हणून तिला जवळच्या शताब्दी रुग्णालयामध्ये दाखल केले. यावेळी ती मृत असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.त्यानंतर त्या मुलीच्या वडीलांना कळवण्यात आले. वडीलांनी पोलिसांजवळ हत्येचा संशय व्यक्त केला. त्यावरून शताब्दी रुग्णालयामधून या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यातील अहवालानुसार, तनिषाला मारहाण करुन तिची हत्या केल्याचे निदर्शनास आले.पोलिसांनी उषा भोले हिला अटक केली असून तिचा प्रियकर अविनाश हा फरार झाला आहे. त्याच्या पोलीस कसून शोध घेत आहेत.

March 30, 2015 in मुख्य पान
नागपूर कारागृहातून ५ आरोपी फरार 0

नागपूर कारागृहातून ५ आरोपी फरार

images
नागपूर, दि. ३१ – नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पाच आरोपी पळून गेले असून तीन आरोपींवर मोक्का कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल आहे. मंगळवारी सकाळी ७.३०च्या सुमारास हे पाचही आरोपी गज कापून फरार झाल्याचे समोर येत आहे. बिशनसिंग धुमाळ, मोहम्मद साहिब सलमी खान, सत्येंद्र उर्फ राहुल गुप्ता, प्रेम उर्फ नेपाळी शालीग्राम आणि आकाश उर्फ गोलू ठाकूर अशी या आरोपींची नावे आहेत.या पाचही आरोपींवर १५ ते २० गंभीर गुन्ह्यांची नोंद असून तिघांवर तर मोक्का लावण्यात आला आहे. अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेल्या कारागृहातून हे आरोपी फरार झाल्याने पोलिस प्रशासनावर दबाव निर्माण झाला आहे. दरम्यान याप्रकरणी जेलचे अधीक्षक वैभव कांबळे यांना निलंबित करण्यात आले आहे.

 

March 30, 2015 in महाराष्ट्र
मोबाइलचा स्फोट, मुलाचा मृत्यू 0

मोबाइलचा स्फोट, मुलाचा मृत्यू

download (1)
पुरुलिया : पश्चिम बंगालच्या पुरुलिया जिल्ह्यातील चिरुडीह गावात चार्जवर ठेवण्यात आलेल्या मोबाइलचा स्फोट होऊन त्यात एका सात वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. कुटुंबातील एका सदस्याने आपला मोबाइल चार्जिंगसाठी ठेवला होता. इयत्ता पहिलीत शिकणारा हा मुलगा या फोनजवळ आला आणि काही क्षणांतच फोनचा स्फोट झाला. या स्फोटामुळे निघालेल्या आगीत मुलाचे शरीर भाजले. त्यात त्याचा मृत्यू झाला. स्फोट झालेला मोबाइल फोन चिनी बनावटीचा असल्याचे तपासात आढळले आहे.

March 30, 2015 in मुख्य पान
बाबरी मशीदप्रकरणी आडवाणींना सुप्रीम कोर्टाची नोटीस 0

बाबरी मशीदप्रकरणी आडवाणींना सुप्रीम कोर्टाची नोटीस

images (1)
वी दिल्ली, दि. ३१ – बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्यासह २० जणांना मंगळवारी नोटीस पाठवली. तसेच न्यायालयाने या प्रकरणात क्लीन चीट देणा-या केंद्रीय अन्वेषण विभागालाही (सीबीआय) नोटीस पाठवत चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.
बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी अलाहबाद उच्च न्यायालयाने २०१० साली लालकृष्ण आडवाणींसह मुरली मनोहर जोशी, राजनाथ सिंग, उमा भारती, साध्वी ऋतुंभरा, कल्याण सिंह आणि विहिंपचे काही नेत अशा २० जणांना आरोपातून मुक्त केले होते. मात्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात फैजाबाद येथील रहिवासी हाजी मोहम्मद अहमद यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ‘सीबीआय आडवाणींसह भाजपच्या इतर नेत्यांना वाचवायचा प्रयत्न करत आहे’ असे त्या याचिकेत म्हटले होते. त्या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने आडवाणींसह इतर २० नेते व सीबीआयला नोटीस पाठवून चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे. बाबरी मशीद ज्यावेळी पाडण्यात आली त्यावेळी हाजी मोहम्मद यांचे घर उध्वस्त करण्यात आसले होते. त्यांनी न्यायालयात आपल्याला एक पीडित म्हणून बाजू मांडण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

March 30, 2015 in मुख्य पान
युवतीचा मृतदेह आढळला, खुनाचा संशय 0

युवतीचा मृतदेह आढळला, खुनाचा संशय

2014-07-04~nnd1_ns
पाटणबोरी (यवतमाळ), दि. ३० – येथील मुख्यरस्त्याच्या कडेला इंदिरानगरातील २२ वर्षीय युवती योगीता नागोराव सिडाम हीचा मृतदेह घरापासून ५०० मीटर अंतरावर खुनी नदीच्या पात्रात आढळला. ३० एप्रिल रोजी या युवतीचे लग्न ठरले होते. त्यापूर्वीच तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज पहाटे ३.३० पासून घरातून प्रात: विधीसाठी गेली होती. मात्र सकाळी शोधाशोध घेतली असता तिचा मृतदेह नदीच्या पात्रात आढळला. घरापासून मुख्यरस्ता पार केल्यानंतर नाल्याच्या काठावर टेंभा, युवतीचे कपडे जळालेल्या अवस्थेत दिसले. नाल्याच्या पात्रात दगडावर रक्त सांडलेले आढळून येत आहे. नाल्याच्या पात्रातून नदीकडे जाणाºया रस्त्यावर रक्ताचे थेंब व रक्त सांडलेले दिसत आहे. यावरून युवतीचा खून झाल्याचा संशय पोलिसांना आहे. युवतीला जाळल्यानंतर वरून नाल्यात दगडावर फेकले असावे नंतर दूरवर खुनी नदीच्या पात्रात मृतदेह फेकला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे. पांढरकवडा उपविभागीय पो. अ. भालचंद्र महाजन व पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला असून, सर्व बाजुने बारीक सारीक बारकावे तपासून पाहिल्या जात आहे.

March 30, 2015 in विदर्भ
विनापरवाना अन्न विक्री संस्थांकडून 60 लाखाचा दंड वसूल 0

विनापरवाना अन्न विक्री संस्थांकडून 60 लाखाचा दंड वसूल

01_07_2012-01cha12-c-2
यवतमाळ दि. 30 : खाद्य पदार्थाची शुध्दता तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने वर्षभर ठिकाणीकाणी धाडी टाकून पदार्थांच्या तपासण्या व नमुने घेतल्या जाते. गेल्या वर्षी वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या धाडी व कार्यवाहीत विनापरवाना आणि कायद्याचे उल्लंघ करणाऱ्या अन्न विक्री संस्थांकडून 60 लाख 31 हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.
खाद्य पदार्थांची शुध्दता अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मानकाप्रमाणे असणे आवश्यक आहे. अनेकदा अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशान पदार्थांमध्ये भेसळ करून नागरीकांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रकार अन्न निर्माते व विक्री संस्थांकडून होतो. यावर आळा घालण्यासाठी ठिकठिकाणी पदार्थांच्या तपासण्या केल्या जातात. भेसळ असल्याची शंका असल्यास नमुने घेऊन तपासणी साठी पाठविले जाते. बरेचदा भेसळीसंदर्भात नागरीकांच्याही तक्रारी असतांना अशा तक्रारीवरून अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने धाड घालून पदार्थांची शुध्दता तपासली जाते.
अनेकदा विक्री परवाना नसतांना विविध खाद्य पदार्थांचे दुकान लागवे जाते. या दुकानांवर नियमितपणे कार्यवाही करण्यात येते. ज्या दुकानांकडे परवाना नाही त्यांना दंड आकारला जातो. शिवाय त्यांना अभिलेखे संगणकीकृत करून अधिकृत परवाना घेण्याबाबत प्रवृत्त केले जाते. जिल्ह्यात अशा परवाना नसलेल्या आणि कायद्याचे उल्लंघन करीत असलेल्या संस्थांवर मोठ्या प्रमाणात कार्यवाही करण्यात आली आहे.
गेल्या वर्षात नोंदणी किंवा परवाना नसलेल्या आणि कायद्याचे उल्लंघ केल्याप्रकरणी जिल्ह्यात एकून 404 ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या. तर 163 ठिकाणी अन्नांचे नमुने घेण्यात आले. विविध 35 ठिकाणी धाडी व जप्तीची मोहिम राबविण्यात आली. या सर्व कार्यवाहीत एकून 60 लाख 31 हजाराचा दंड वसूल करण्यात आला. विविध 34 प्रकरणात न्यायालयात खटले दाखल करण्यात आले असून यातील 5 प्रकरणांची न्यायालयस्तरावर अंतीम टप्प्यात आहे. जिल्ह्यात अन्न निर्मितीच्या 71 तर विक्रीच्या 11324 संस्था कार्यरत आहे. गेल्यावर्षी 6173 विक्री संस्थांची नोंदणी करून त्यांना परवाने देण्यात आले आहे. या संस्थांकडून नोंदणी शुल्कापोटी 56 लाखाचा महसूल शासनास प्राप्त झाला आहे.
औषध विक्रीचे 81 परवाने रद्द
गेल्यावर्षात जिल्ह्यात अन्न व औषध विभागाच्यावतीने 358 औषधी आस्थापनांच्या तपासण्या करण्यात आल्या. यापैकी कायद्यातील तरतुदींची पुर्तता न करणाऱ्या 81 आस्थापनांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहे. तसेच 26 परवाने काही काळासाठी निलंबित करण्यात आले होते. ठिकठिकाणी 22 औषधांचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले होते. त्यापैकी 5 अप्रमाणित आढळून आल्याने त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही व न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहे.

 

March 30, 2015 in विदर्भ
लहान मुलांच्या कार्यक्रमात मंत्र्याच्या कमरेला पिस्तुल 0

लहान मुलांच्या कार्यक्रमात मंत्र्याच्या कमरेला पिस्तुल

gun-adbas
मुंबई – भाजपा नेते आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन कमरेला पिस्तुल लावून लहान मुलांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याच्या मुद्यावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात राज्य सरकारला चांगलच धारेवर धरल.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभा आणि विधानपरिषदेत हा मुद्दा लावून धरत महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली. गिरीश महाजन रविवारी जळगावमध्ये मूकबधीर मुलांच्या कार्यक्रमाला गेले होते. त्यावेळी त्यांनी कमरेला पिस्तुल लावल होत. कॅमे-याने महाजन यांचे हे पिस्तुल टिपले.
यावरुन विरोधकांनी सोमवारी सत्ताधा-यांची कोंडी केली. अशा प्रकारे महाजन यांच्या पिस्तुल लावण्यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीने केली.
या घटनेचा निषेध म्हणून विरोधकांनी प्रश्नोत्तराच्या तासावरही बहिष्कार घातला. यावर गिरीश महाजन यांनी आपण स्वसंरक्षणासाठी पिस्तुल बाळगत असल्याचा दावा केला. ते पिस्तुल माझ्याकडे होते. मात्र त्याने मी कुठलाही हिंसाचार केलेला नाही. मी फक्त स्वसंरक्षणासाठी पिस्तुल बाळगतो असा खुलासा महाजन यांनी केला.
महाजन यांच्याकडे गेल्या दोन दशकापासून पिस्तुल बाळगण्याचा परवाना आहे. त्यांनी कायदा मोडलेला नाही. विरोधक या विषयावरुन निरर्थक वाद निर्माण करत आहेत असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजन यांचा बचाव केला. गिरीश महाजन महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांना पोलिसांची विशेष सुरक्षा व्यवस्था आहे असे असताना त्यांना वेगळे पिस्तुल बाळगण्याची गरजच काय ? हा प्रश्न निर्माण होतो

 

March 30, 2015 in मुख्य पान
जम्मू काश्मीरमध्ये पुराचा धोका, दरड कोसळून १० ठार Comments Off on जम्मू काश्मीरमध्ये पुराचा धोका, दरड कोसळून १० ठार

जम्मू काश्मीरमध्ये पुराचा धोका, दरड कोसळून १० ठार

2015-03-30~jammu_ns

श्रीनगर, दि. ३० – गेल्या वर्षी आलेल्या महाकाय पुरातून सावरत असलेल्या जम्मू काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा पुराचे संकट निर्माण झाले आहे. झेलम नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शहरातील अनेक भागांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली असून भूस्खलानाच्या घटनांनी महामार्गावरील वाहतूकही खोळंबली आहे. रविवारी दरड कोसळल्याने १८ घरांसह ४४ इमारतींचे नुकसान झाले. अद्याप या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सोमवारी पहाटे सहाच्या सुमारास झेलम नदीने धोक्याची पातळी ओलांडली. दक्षिण काश्मीर व श्रीनगर येथे झेलम नदीने अनुक्रमे २२.४ फूट व १८.८ फूटांची पातळी गाठली आहे. नदीने २३ फूटांची पातळी ओलांडल्यास पुन्हा हाहाकार माजेल अशी भीती वर्तवली जात आहे. जम्मू काश्मीरमधील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्र सरकारने बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या ९५ जवानांना जम्मू काश्मीरमध्ये पाठवले आहे. पावसामुळे जम्मू काश्मीरमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी सकाळी बडगाम जिल्ह्यात चार घरांवर दरड कोसळल्याने दहा जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगा-याखाली आणखी २० जण अडकले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येही जम्मू काश्मीरला पुराचा तडाखा बसला होता. त्यावेळी जम्मू काश्मीरचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले व शेकडो लोकांना जीवही गमवावा लागला होता.

March 30, 2015 in मुख्य पान
पं. मालवीय यांना मरणोत्तर 'भारतरत्न' प्रदान 0

पं. मालवीय यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ प्रदान

images (3)
नवी दिल्ली, दि. ३० – हिंदू महासभेचे नेते व बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे संस्थापक पंडित मदन मोहन मालवीय यांना आज मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवनात पार पडलेल्या या सोहळ्यात मालवीय यांच्या कुटुंबियांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, यांच्यासह केंद्रीय मंत्री उपस्थित होते. पंडित मदन मोहन मालवीय यांच्यासोबत माजी पंतप्रधान अटलबिहापरी वाजपेयी यांनाही ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झाला होता. राष्ट्रपतींनी नुकताच हा पुरस्कार वाजपेयी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पुरस्कार प्रदान केला.
आज सकाळी पार पडलेल्या या सोहळ्यात पद्म पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, प्रकाशसिंह बादल वस्वामी राम भद्राचार्य यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. तर पत्रकार रजत शर्मा यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तर बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, गीतकार प्रसून जोशी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

March 30, 2015 in मुख्य पान
नेर तालुक्यातील ६ गावांना तंटामुक्त पुरस्कार 0

नेर तालुक्यातील ६ गावांना तंटामुक्त पुरस्कार

31

नेर ,दि. ३० – तालुक्यातील सहा गावाला १३ लाखाचे तंटामुक्त गाव निवडीचा पुरस्कार उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे यांचे उपस्थितीत देण्यात आला.
या वेळी मंचावर ठाणेदार गणेश भावसार, तंटामुक्त समितीचे सदस्य गजानन काळे, किशोर वंजारी इत्यादीची उपस्थित होते. याच सोहळ््यात तंटामुक्त पुरस्कार गावाकºयांना वेळोवेळी मदत करून पुरस्कारापर्यंत नेऊन ठेवणे गोपनिय विभागाचे पोलिस शिपाई गणेश इसळ यांचाही सत्कार करण्यात आला. बाणगाव, बाळेगाव, पांढरी, पाथ्रड (गोळे), लोणी व कोलुरा या गावांना यावर्षी हा पुरस्कार देण्यात आला. तालुक्यात ७ वर्षात ३० गावांना तंटामुक्त पुरस्कार मिळाला असून, यात वाई (ई), सातेफळ, धनज, शहापूर, माणिकवाडा, ब्राम्हणवाडा (पुर्व), मांगलादेवी, उमरणे, दगडधानोरा, चिकनी (डोमगा), पिप्री(कलगा), मोझर, सावरगाव (काळे), अडगाव, व्याहळी, कारखेडा, शिरसगाव, घारेफळ, चिचगाव या गावाचा समावेश आहे. तालुक्यातील १८ गावांनी परिश्रम घेवून पुरस्कार प्रवाहात सहभागी होण्याची गरज असल्याचे मत गटविकास अधिकारी गौतम भगत यांनी व्यक्त केले. यावेळी तालुक्यातील पोलीस पाटील ग्रामसेवक, सरपंच, ग्रा.प. सदस्य, तंटामुक्त समितीचे सदस्य, अध्यक्ष इत्यादीची उपस्थिती होती. यावेळी गणेश इसळ, बाणगावचे सरपंच अनिल राठोड, राजेंद्र गोळे उपस्थित होते.

March 30, 2015 in विदर्भ
 हर्षवर्धन तायडे यांची निवड 0

हर्षवर्धन तायडे यांची निवड

download

नेर , दि. ३० – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तालुका प्रतिनिधीपदी युवा नाट्य कलाकार प्रा. हर्षानंद तायडे यांची निवड करण्यात आली. ही नियुक्ती अभानापचे कार्यवाहक श्रीकांत भाडेयांनी केली आहे. आपल्या निवडीचे श्रेय जेष्ट नाट्य दिग्दर्शक दिलीप पुरी, बापूराव रंगारी, माणिकराव ढोरे, श्रीकांत भाडे यांना देत आहे. त्याच्या नियुक्तीबबद्दल गौतम बोरकर, अविनाश बनसोड, बासीद खान, फिरोज पठाण, नवनाथ दरोई, प्रा. एस.यु. ोके, सुनील आडे, राजा श्रीवास्तव, मिलींद चिरडे, अक्षर रंगारी, राहुल हळदे, संदिप मिसळे, राहुल तायडे, राजेश खोडके, सुषका कदम, निता ढोरे यांनी कौतुक केले.

March 30, 2015 in विदर्भ
आगीत झेरॉक्स सेंटर खाक 0

आगीत झेरॉक्स सेंटर खाक

IMG-20150329-WA0170
दिग्रस, दि. २९ – झेरॉक्स सेंटरला लागलेल्या आगीत मशिनसह दस्तऐवज जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी ११ वाजता दरम्यान पंचायत समिती परिसरात घडली. यात तीन लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
पंचायत समिती बाजुला समृद्धी झेरॉक्स न्यू क्रांती बचत पुरूष गटाद्वारे चालविल्या जात होते. या ठिकाणी ४ झेरॉक्स मशीन, १ लॅमिनेशन मशीन व इतर कागदपत्रे आगीत जळून खाक झाली. या बाबतची तक्रार दिग्रस पो. स्टे. ला गजानन भोगराज राठोड यांनी दिली आहे.
आग लागल्याची घटना काही नागरिकांच्या लक्षात येताच पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रफुल्ल व्यवहारे, नवलकुमार ठोंबे, अशोक जाधव, किशोर कांबळे, संजय पोटे, पकंज ढोले, सुर्वे, महल्ले, ठेकेदार, इम्रान पटेल, रावत इंजिनिअर, ग्रामसेवक मंगल अंबोरे आदींनी पुढाकार घेतला. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असून ही आग नेमकी कशी लागली हे कळू शकले नाही.

 

March 29, 2015 in विदर्भ
राज्यात गार, पावसाची शक्यता 0

राज्यात गार, पावसाची शक्यता

images
पुणे – थंडी, ऊन, पाऊस असा तिन्ही ऋतूंचा एकत्रित खेळ सुरू असलेल्या राज्यावर शनिवारी गारांचा मारा झाला. पुण्यासह राज्याच्या विविध भागांमध्ये गारांसह जोरदार पाऊस पडला. पुढील दोन दिवसात राज्यात कोकण वगळता अन्यत्र काही ठिकाणी पावसाची तर तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
अफगाणिस्तान व पाकिस्तानच्या उत्तर भागात हवेच्या वरच्या थरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. पाकिस्तानकडून वाहणारे थंड व कोरडे वारे आणि अरबी समुद्राकडून वाहणारे बाष्पयुक्त वारे यांचा संयोग होऊन राज्यात पाऊस होत आहे. काही ठिकाणी गारांसह पाऊस होत आहे. तर तामिळनाडू ते मध्य महाराष्ट्र व कर्नाटकच्या काही भागात हवेच्या वरच्या थरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. यामुळे राज्यासह काही भागात सध्या पाऊस होत आहे.
मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्राचा काही भाग तसेच मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाच्या सरींनी हजेरी लावली. यापैकी काही ठिकाणी गारांसह पाऊस झाला. पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसराला वादळी पावसाने झोडपले. तसेच काही ठिकाणी गारपीट झाली. सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाला प्रारंभ झाला. त्यामुळे अनेकांची धांदल उडाली. कोल्हापुरात विजांचा कडकडाट व गारांसह झालेल्या वळवाच्या पावसाने शनिवारी सायंकाळी शहराला जवळपास तासभर झोडपले. सांगली, सातारा जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले मात्र पाऊस पडला नाही.

लाचखोर श‌िपायाच्या घरात १० लाखांची रोकड 0

लाचखोर श‌िपायाच्या घरात १० लाखांची रोकड

images (1)
ठाणे – वाहनचालकाचे लायसन्स परत देण्याच्या बदल्यात तेराशे रुपयांची लाच घेणारा व‌िरारच्या वाहतूक शाखेचा श‌िपाई शंकर तनपुरे (३०) याच्या घर झडतीत चक्क १० लाख ७० हजार रुपयांची रोकड आढळून आली आहे. २७ मार्च रोजी लाचलुचपत प्रत‌िबंधक व‌िभागाच्या पालघरच्या पोल‌िसांनी तनपुरे याला अटक केली होती. तनपुरे यांनी तक्रारदाराकडे वाहनचालक लायसन्स परत देण्याच्या बदल्यात लाच घेतली होती. अटक झाल्यावर त्याच्या घराच्या झडतीत पोल‌िसांना १० लाख ७० हजार रुपयांची रोकड आढळली. ही रोकड त्याने कशी म‌िळवली, याचा पोल‌िस शोध घेत आहेत.

 

March 29, 2015 in महाराष्ट्र
ऑस्ट्रेलिया पुन्हा विश्वविजेते 0

ऑस्ट्रेलिया पुन्हा विश्वविजेते

australia-team
मेलबर्न – फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही आघाड्यांवर उत्कृष्ट कामगिरी करत रविवारी मेलबर्नच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाने आपणच जगज्जेते असल्याचे पुन्हा सिद्ध केले. अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सात विकेट राखून पराभव करत ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वविजेतेपदावर मोहोर उमटवली.
मेलबर्न मैदानावरील हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत ऑस्ट्रेलियाने दिमाखात विश्वचषक उंचावला. यासोबतच ऑस्ट्रेलियन संघाने कर्णधार मायकेल क्लार्कला एकदिवसीय क्रिकेटमधून विजयी निरोप दिला. पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठणा-या न्यूझीलंड संघाकडून त्यांच्या देशवासीयांना मोठी अपेक्षा होती. मात्र न्यूझीलंडच्या संघाने अपेक्षाभंग केला. ऑस्ट्रेलियाला पराभूत करत न्यूझीलंड इतिहास रचणार असे वाटत होते. न्यूझींलंडचे हे स्वप्न अधुरेच राहिले.
विश्वचषकात पहिल्या सामन्यापासून न्यूझीलंडने विजयाची मालिका कायम ठेवली होती. मात्र त्याला खिंडार पाडली ती ऑस्ट्रेलियाने. जगज्जेतेपद मिळवण्यासाठी न्यूझीलंडने ठेवलेले १८४ धावांचे सोपे आव्हान ऑस्ट्रेलियाने सात विकेट राखून पूर्ण केले आणि सहज विजय मिळवला.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या तोफखान्यासमोर न्यूझीलंड संघाने शरणागती पत्करल्याने त्यांचा डाव अवघ्या १८३ धावांत संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान दोन गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. कर्णधार क्लार्कने आपल्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात शानदार ७४ धावांची खेळी केली आणि एकदिवसीय क्रिकेटला निरोप दिला.
दुस-याच षटकांत आरोन फिंचच्या रुपाने न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. मात्र त्यातून सावरत डेविड वॉर्नर आणि स्टीव्हन स्मिथने दुस-या विकेटसाठी ६१ धावा केल्या. ४५ धावांवर वॉर्नरला बाद करण्यात यश मिळाले. त्यानंतर कर्णधार क्लार्क आणि स्मिथ या जोडगोळीने ११२ धावांची खेळी केली आणि ऑस्ट्रेलियाचा विजय सुकर केला. क्लार्कनंतर खेळण्यासाठी मैदानात आलेल्या वॉटसनने स्मिथच्या साथीने विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ४५ षटकांत १८३ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी सोपे आव्हान ठेवले. जेम्स फॉकनर आणि मिचेल जॉन्सनच्या अचूक मा-यासमोर न्यूझीलंडच्या सरस फलंदाजांनी अक्षरक्ष: लोटांगण घातले. यंदाच्या विश्वचषकातील न्यूझीलंडचा दमदार फॉर्म पाहता ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी मोठे आव्हान ठेवेल असे वाटले होते. मात्र मेलबर्नच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्याची संधीच दिली नाही.
न्यूझीलंडच्या ग्रँट एलियटने ८३ धावा करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला बाकी खेळाडूंची अपेक्षित साथ लाभली नाही. न्यूझीलंडचे तब्बल सहा फलंदाज केवळ एक अंकी धावसंख्या करुन बाद झाले.
न्यूूझीलंडच्या ब्रँडेन मॅकक्युलमने नाणेफेक जिंकली आणि अपेक्षेप्रमाणेच प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. मैदानावर फलंदाजीस उतरलेल्या न्यूझीलंडला पहिल्याच षटकांत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी जोरदार धक्का दिला. कर्णधार ब्रँडन मॅकक्युलम भोपळा न फोडताही परतला. विश्वचषकात द्विशतकी कामगिरी करणारा मार्टिन गप्टिल मोठी खेळी करेल असे वाटत असताना मॅक्सवेलने त्याला अवघ्या १५ धावांत तंबूत धाडले. तर विल्यमसन्स केवळ १२ धावा करुन बाद झाला.
त्यानंतर न्यूझीलंडच्या ग्रँड एलियटने केलेल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर संघाचा डाव सावरला. एलियटने ५१ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. पहिले तीन विकेट झटपट गमावल्यानंतर एलियट आणि टेलरने मैदानावर जोडी जमवत संघाचा डाव सावरला. मात्र टेलर बाद झाल्यानंतर मात्र न्यूझीलंड संघाला गळतीच लागली. कोरे अँडरसन आणि ल्युके राँचीला शून्यावर बाद करण्यात ऑसी गोलंदाजांना यश आले. तर व्हेटोरीने केवळ नऊ धावा केल्या. एकीकडे बाकीच्या फलंदाज झटपट गाशा गुंडाळत असताना ग्रँट मैदानावर दुस-या बाजूला एकाकी किल्ला लढवत होता. ग्रँटने ८१ चेंडूत ८३ धावा केल्या संघाला दीडशे पार नेले. न्यूझीलंडची ३५ व्या षटकांत तीन बाद १५० ही धावसंख्या होती. त्यानंतर पुढील ३३ धावांत ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचे तब्बल सात गडी बाद केले. आणि न्यूझीलंडचा डाव १८३ धावांत संपुष्टात आला.

 

सायनाने प्रथमच जिंकली इंडिया ओपन सुपरसिरीज 0

सायनाने प्रथमच जिंकली इंडिया ओपन सुपरसिरीज

Yonex Sunrise India open
नवी दिल्ली- अव्वल रँकिंग निश्चित करणारी पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू ठरल्यावर सायना नेहवालने रविवारी आणखी एक इतिहास घडवला. इंडिया ओपन सुपरसिरीज बॅडमिंटन स्पर्धा जिंकणारी सायना पहिली भारतीय ठरली. याबरोबरच सायनाने तिचा अव्वल रॅँकिंगचा आनंद द्विगुणित केला.
सायनाच्या अव्वल रॅँकिंगवर अधिकृतपणे गुरुवारी शिक्कामोर्तब होईल. तत्पूर्वी, सायनाने रविवारी अंतिम फेरीत तिसरी सीडेड थायलंडच्या रॅचनॉक इंटॅनॉनचा २१-१६, २१-१४ असा सलग दोन गेममध्ये पराभव केला.
सुरुवातीपासून राखलेले वर्चस्व सायनाने जेतेपदावर शिक्कामोर्तब होईपर्यंत कायम ठेवले. २०११पासून इंडिया ओपनला सुपरसिरीजचा दर्जा मिळाला आहे. मात्र तेव्हापासून महिला एकेरी, पुरुष एकेरी किंवा दुहेरी अशा कोणत्याही प्रकारात भारतीयाने घरच्या प्रेक्षकांसमोर अंतिम फेरीही गाठली नव्हती.सायनाचीही या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कामगिरी याआधी म्हणजे गेल्यावर्षी गाठलेली उपांत्यपूर्व फेरी होती. यंदा मात्र सुरुवातीपासून सायनाने प्रभावी खेळ केला.

फलोत्पादन अभियानाच्या शेडनेटने आणली समृध्दी , काकडी, टोमॅटोचे उत्पादन 0

फलोत्पादन अभियानाच्या शेडनेटने आणली समृध्दी , काकडी, टोमॅटोचे उत्पादन

unnamed
यवतमाळ, दि. २९ आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने कृषी उत्पादनात कमालीची वाढ होवू शकते, हे आता जवळजवळ प्रत्येकच शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी अत्याधुनिक साधनांसह शेडनेटसारख्या बाबींचा वापर करतांना दिसत आहे. बाभुळगाव तालुक्यातील बोरगाव भिलुक्षा या गावातील एका शेतकऱ्याने राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातुन उभारलेल्या शेडनेटने आपल्या शेतात समृध्दीचा मळा फुलविला आहे.
निसर्गाचा लहरीपणा आणि सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे पारंपारिक पिकांना मोठ्याप्रमाणावर फटका सहन करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळवून देणाऱ्या भाजीपाला पिकाशिवाय पर्याय राहिलेला नाही, हीच बाब बाभुळगाव तालुक्यातील बोरगाव भिलुक्षा येथील शेतकरी प्रमोद डफळे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आपली शेती फळपिकाकडे वळविली. डफळे हे उच्च शिक्षीत शेतकरी असून आपल्या शेतीसच त्यांनी शिक्षणाची जोड दिली आहे. आत्मा योजनेतंर्गत राबविल्या जाणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी फळपिकांचा अभ्यास दौरा केला होता. त्याप्रमाणे फळपिक घेण्याचे त्यांनी ठरविले होते. त्यासाठी शेडनेट चांगले माध्यम असल्याने त्यांनी आपल्या 30 आर क्षेत्रावर शेडनेटची उभारणी केली.
सन 2012 मध्ये कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन अभियानातंर्गत शेडनेटसाठी त्यांना 50 टक्के अनुदान मिळाले. शेडनेटमुळे पिकांना लागणारे वातावरण नियंत्रित करता आले. खुप जास्त व कमी तापमान तसेच पावसापासून पिकांचे संरक्षण करण्यासोबतच हंगामाशिवायही शेडनेटमुळे पिके घेता येणे शक्य झाल्याने त्याच आर्थिक समृध्दीकडे वाटचाल करीत आहे.
श्री.डफळे यांनी पहिल्यावेळी शेडनेटमध्ये टोमॅटोचे उत्पादन घेतले. त्यानंतर त्यांनी काकडीची लागवड केली. सध्या काकडी पिकाचे दुसरे उत्पादन ते घेत आहे. या पिकासाठी त्यांना 50 हजाराचा खर्च आला तर 15 दिवसात त्यांना 1 लाख 25 हजाराचे उत्पन्न मिळाले. दोन महिन्यामध्ये त्यांना काकडी पिकापासून एकूण 3 लाख 50 हजार रुपये इतके उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. काकडीचे उत्पादन ते यवतमाळच्या बाजारपेठेत करतात. काकडीसोबतच डाळींब, संत्रा व चारापिकेही ते घेतात. त्यांच्याकडे 30 जनावरे असून त्यात 15 जरसी गायींचा समावेश आहे. काकडीच्या यशस्वी प्रयोगानंतर कारले व पालकाचे उत्पादन शेडनेटमध्ये घेणार असल्याचे ते सांगतात.

ग्रामपंचायत निवडणूकीत आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन - राहुल रंजन महिवाल 0

ग्रामपंचायत निवडणूकीत आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन – राहुल रंजन महिवाल

images-13
यवतमाळ , दि. २९ : जिल्ह्यातील मे व आगस्ट या महिन्यांमध्ये मुदत संपत असलेल्या ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक तथा पोटनिवडणूक होत आहे. या निवडणूकीत लोकसभा, विधानसभा निवडणूकांच्या धर्तीवर आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन केले जावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी म्हणाले.
जिल्ह्यात मुदत संपत असलेल्या 663 ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक तर 81 ठिकाणी रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीप्रसंगी ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मल्लिनाथ कलशेट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, डॅा.शरद कुलकर्णी, निवडणूक उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जलसंपदाचे अधिक्षक अभियंता श्री.काटपल्लीवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, दत्तात्रय गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विनय ठमके, पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालींदर पठारे आदी उपस्थित होते. सदर ग्रामपंचायत निवडणूका 2011 च्या जनगणनेनूसार घेण्यात येत असून यासाठी इलेक्टॅानिक मतदान यंत्र वापरण्यात येत आहे. निवडणूकीनिमित्त लावण्यात आलेली आचारसंहिता सार्वत्रिक निवडणूकीसाठी ग्रामपंचायतीच्या संपुर्ण क्षेत्रात तर पोटनिवडणूकीसाठी प्रभागाच्या क्षेत्रात लागू राहतील, असे बैठकीत सांगण्यात आले.

March 29, 2015 in विदर्भ
बंदीजणांच्या पुनर्वसनासाठी स्वयंरोजगारावर भर - पालकमंत्री संजय राठोड 0

बंदीजणांच्या पुनर्वसनासाठी स्वयंरोजगारावर भर – पालकमंत्री संजय राठोड

_DSC0514
यवतमाळ , दि. २९ : कळत न कळत अनेकांकडून गुन्हा घडत असतो. अशा गुन्ह्यात काहींना बंदी व्हावे लागते. परंतु हे बंदीही शेवट माणूसच असतात. बंदी मुक्त झाल्यानंतर अशा व्यक्तींना समाजाकडून वाईट वागणूक मिळण्याची शक्यता असते. या व्यक्तींकडे वेगळया नरजेतून न पाहता स्वयंरोजगारांच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे व त्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
जिल्हा मध्यवर्ती कारागृहात महिला व बालविकास विभागाच्यावतीने कारागृहातून मुक्त झालेल्या बंद्यांना त्यांच्या पुनर्वसनासाठी अर्थसहाय्यचे वितरण पालकमंत्र्यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास कारागृहाचे अधीक्षक श्रीकृष्ण भुसारी, परमानंद अग्रवाल, तुरुंग अधिकारी श्री.भांबरे, शोभा बाविस्कर, ॲड.विनीत ठाकरे आदी उपस्थित होते.
यावेळी कारागृहातून मुक्त झालेले वसंत नारायण मिलमिले, दिपक नारायण ससाने, चंद्रशेखर नारायण मुंदे, सलीम शाह मज्जीद शाह, सुरेश विठ्ठलराव एकोणकार यांना प्रत्येकी पाच हजार रूपयाच्या अर्थसहाय्यचे वितरण करण्यात आले. शासनाच्यावतीने बंदीबांधवांच्या पुनर्वसनासाठी देण्यात येत असलेली पाच हजाराची रक्कम कमी असून ही रक्कम वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे श्री.राठोड म्हणाले. तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर बंदीबांधवांना पुनर्वसनासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, ते शासन व स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी अभ्यास करणार असल्याचेही पालकमंत्री म्हणाले.
एखादी व्यक्ती कारागृहात असतांना त्यांचे कुटुंब अडचणी असते. अशा कुटुंबांना मदत देण्यासंदर्भातही विचार केला जाणार आहे. कारागृहात बंदी मुक्त वातावरणात राहिल्या पाहिजे. त्यासाठी आवश्यक सुविधा उभारण्यावर भर राहणार असून कारागृह प्रशासनाने त्याबाबतीत अवगत करावे. बंद्यांना अडचणी असल्यास त्यांनी हक्काने सांगाव्यात. त्याची दखल घेतली जाईल, असेही पालकमंत्री म्हणाले.
यावेळी परमानंद अग्रवाल यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक कारागृह अधीक्षक श्रीकृष्ण भुसारी यांनी तर संचलन धनंजय नंदपटेल यांनी केले. यावेळी पालकमंत्र्यांनी कारागृहातील स्वयंपाकगृहास भेट देवून तेथील भोजनव्यवस्थेची तसेच त्याच्या दर्जेची पाहणी केली. तसेच बंदी वास्तव्यास असलेल्या बॅरेक्स व तेथील सुविधांची माहिती घेतली. कार्यक्रमास जवळपास 250 ते 300 कैदी बांधव उपस्थित होते.

March 29, 2015 in विदर्भ