
गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ टाटा नॅनो कारने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. ड्रायवरने चलाखी दाखवत वेळ असतानाच गाडी रोडच्या बाजुला उभी केली. त्यामुळे या घटनेत कुठलिही जिवीतहानी झाली नाही. मात्र, अचानक नॅनो कारच्या इंजिनकडील भागाने पेट घेतल्याचे ड्रायव्हरकडून सांगण्यात आले. त्यामुळे नॅनो कारबद्दल पुन्हा एकदा भीतीदायक चित्र निर्माण झाले आहे.
आमगाव रोडवरील अदासी फाट्याजवळ पांढऱ्या रंगाची नॅनो कार प्रवास करत होती. मात्र, नॅनोच्या इंजिनकडील भागाने अचानक पेट घेतल्याने गाडी जळून खाक झाली आहे. गाडीने पेट घेतल्याने ड्रायव्हरने गाडी रस्त्याच्या बाजूला लावत अलगदपणे स्वत:ला गाडीतून बाहेर काढले. दरम्यान नॅनो कारने अचानक पेट घेण्याच्या घटनांमुळे नॅनो कारबद्दलचे ग्राहकांचे आकर्षण कमी झाले होते. गरिबांचा सफारी असलेल्या नॅनोच्या सुरक्षिततेबद्दलही अनेक प्रश्न निर्माण झाले होते. मात्र, या प्रकरणाची दखल घेत टाटा कंपनीने नॅनो कारमध्ये विशिष्ट सुधारणा केली. तसेच लाखो ग्राहकांना विशिष्ट कालावधीत घेण्यात आलेल्या नॅनो कारच्या इंजिनमध्ये बदलही करुन दिला. तर काहींना पूर्णपणे नवीन गाड्या देण्यात आल्या. त्यामुळे नॅनोबद्दलची विश्वासर्हता पुन्हा एकदा सामान्य लोकांच्या मनात रुजत आहे. पण, गोंदियात नॅनो कारने पुन्हा पेट घेतल्याने नॅनो कार वापरण्याच्या सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न निर्माण झाले आहेत.
Archive for April 25th, 2015
0
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग
0
नागपुरात भूकंपाचे सौम्य धक्के

नागपूर – उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र झटके जाणवले असून काही ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या भूकंपाचे सौम्य धक्के महाराष्ट्रातील विदर्भात जाणवले आहे. उपराजधानी नागपूर शहरही भूकंपाच्या आवाजाने हादरले. त्यामुळे नागरिकांनी सर्वत्र चर्चा सुरु केली असून हे भूकंपाचेच धक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे.
उत्तर भारतील बिहार, उत्तरप्रदेश, झारखंड येथे ७.५ रिस्टर स्केलचा तीव्र भूकंपाचा झटका बसल्याने देशभरात एकच धांदल उडाली आहे. सुरुवातीला जमिन हादरुन गूढ आवाज झाला. त्यामुळे नागिराकांत भितीचे वातावरण निर्माण झाले. भूकंपाच्या आवाजाने नागरिक घर आणि ऑफिसमधून सैरा-वैरा पळत मोकळ्या जागी येऊन स्वत:चा बचाव करत होते. जवळपास दीड मिनिटे हा भूकंपाचा थरार नागरिकांनी अनुभवला. नेपाळ हे भूकंपाचा केंद्रबिंदू मानण्यात येत असून महाराष्ट्रातील विदर्भातही भूकंपाचा सौम्य हादरा बसला आहे. दरम्यान भूंकपाच्या धक्क्यांनंतर लातुरमधील किल्लारी भूकंपाच्या आठवणी ताज्या करत नागरिकांत चर्चाच-चर्चा सुरु झाली आहे.
0
भूकंपाने उत्तर भारत हादरला , ४ ठार, इमारती कोसळल्या

नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारत आज (शनिवारी) दुपारी पावणे बाराच्या सुमारास भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरला. साधारण दीड ते दोन मिनिटे भूकंपाची धक्के जाणवले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नागपुरसह मुंबईत अनेक भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 7.4 इतकी या भूकंपाची तीव्रता असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.भूकंपात ४ जण ठार झाल्याचे वृत्त आहे
नेपाळची राजधानी काठमांडूपासून 83 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्र आहे. काठमांडूमध्ये काही भागात इमारतींचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. नेपाळच्या इतिहासात हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे बोलले जात आहे. काठमांडूमध्ये फोन सेवा ठप्प झाली आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तान, बांगलादेशातीही भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे.
दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, सिक्कीम, पंजाब, गुजरातमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे. साधारण दीड ते दोन मिनिटे एकापाठोपाठ भूकंपाचे अनेक धक्के जाणवले.नेपाळमध्ये आज दुपारी पावणे बाराच्या सुमारास हाहाकार माजविला आहे. ७.९ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपात ४ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. अनेक मोठ्या इमारती कोसळल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.









